शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

पालघरवासीयांची घरीच राहण्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:04 IST

ट्रेन बंदमुळे निर्णय : अवघ्या दोन बस सोडल्या

पालघर : जिल्ह्यातील बहुतांशी चाकरमानी हे मुंबई-ठाणे येथे नोकरीनिमित्त जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या उपनगरी लोकल सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील चाकरमान्यांनी सोमवारी मुंबईत जाणे टाळल्याने अवघ्या दोन एसटी बस मंत्रालय आणि बोरिवलीसाठी सोडण्यात आल्या.

लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईत सोमवारपासून खाजगी व सरकारी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवारी मुंबई-ठाणे भागांतील कार्यालये गाठण्यासाठी महामार्गावर गाड्यांची तर बस पकडण्यासाठी एकच गर्दी जमल्याने चित्र सर्वत्र दिसून येत होते.पालघर जिल्ह्यातून मुंबई, ठाणे व गुजरात राज्यात सरकारी कार्यालयात व खाजगी आस्थापनात नोकरीनिमित्त जाण्यासाठी ७५ टक्के (डहाणू ते वैतरणादरम्यान दररोज सुमारे दीड लाख) चाकरमानी हे रेल्वे गाड्यांचा वापर करतात. परंतु, सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने ९५ टक्के चाकरमान्यांनी आपल्या घरीच राहणे पसंत केले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षकासह अन्य कार्यालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्यातच राहत असल्याने बाहेरून येणाºया कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे.तसेच २२ मे पासून शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आधीच सुरुवात झाल्याने सोमवारी कार्यालयात येण्यासाठी कुठे गर्दी जमणे, लांबच लांब रांगा लागल्याच्या घटना कुठे घडल्या नसल्याचे पाहावयास मिळाले.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार