शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

पालघर न.प.चे सफाई कामगार वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:18 IST

मूलभूत सुविधाही नाही : चांगले राहणीमान तर दूरच राहिले

पालघर : नगर परिषदेने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सोयीसुविधा पासून दूर ठेवले आहे. कामगारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, असे शासनाचे धोरण असले तरी पालघर नगरपरिषद मात्र ते धोरण या सफाई कामगारांना बाबतीत पाळत नसल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेने आपल्याच सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांत साधी निवासस्थाने तर सोडाच,पण जगण्यासाठी हव्या असलेल्या मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाहीत.

नगरपरिषद हद्दीत बोईसर रस्त्यावरील गोठणपूर भागात मागील ४० वर्षांपासून नगरपरिषदेची आरोग्य कर्मचाºयांची वसाहत आहे. ग्रामपंचायत काळापासून हे सफाई कर्मचारी या सेवेत आहेत. १९९८ मध्ये नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर या कर्मचाºयाना नगरपरिषदे मध्ये सामावून घेण्यात आले. या वसाहतीत एकूण अकरा खोल्या असून यामध्ये हे कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह अत्यंत दयनीय अवस्थेत दाटीवाटीने राहत आहेत. ग्रामपंचायतीच्या काळात बांधलेल्या या वसाहतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भिंती ना तडे जाऊन त्या कोसळण्याच्या अवस्थेत उभ्या आहेत. तुटलेले दरवाजे,अस्वच्छ ,दुरावस्था झालेली स्नानगृहे, शौचालये अशा अवस्थेत हे सफाई कर्मचारी येथे राहत आहेत.

सफाई कर्मचाºयांना चांगले राहणीमान आणि सोयीसुविधा पुरविण्यास नवनिर्वाचित नगराध्यक्ष या नात्याने मी प्रयत्नशील राहील. -डॉ. उज्ज्वला काळे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष

गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या जीर्ण वसाहतीत राहत आहेत आता या वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. प्रशासनाने आम्हा कर्मचाऱ्याकडे जातीने लक्ष देऊन आमच्या समस्या सोडवाव्यात. - हसमुख सोलंकी, सफाई कर्मचारी

ही दुरवस्था बघता घरातील बारीकसारीक दुरु स्ती स्वखर्चाने पदरमोड करून करावी लागते. लोकप्रतिनिधी पाहणी करून गेले मात्र आश्वासना पलीकडे काहीच दिलेले नाही. - मधु बरिया, सफाई कर्मचारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर