शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:28 IST

संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलास

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/वसई : संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, बोईसर या परीसराची स्थिती बरी होती. या मुसळधार पावसाचे पाणी मुंबई, अहमदाबाद मार्गावर साचून प्रदीर्घ काळ भीषण वाहतूककोंडी झाली. अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. सोमवार रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई या शहरांसह ग्रामीण भागात व नवघर एसटी स्टँडवर पाणी तुंबले होते. पापडी-बंगली रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन विभागाने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुुरु झाली. गेले अनेक दिवस गायब झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी दुपारी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून पुन्हा झोडपून काढले. पावसाच्या तडाख्याने वसईतील सखल भागात पाणी तुंबले होते. विरार पश्चिमेला विवा कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी साचून राहिले होते. नालासोपारा सेंट्र्ल पार्क रस्ता पाण्याखाली गेला होता. ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाणी साचून राहिले होते.मुंबई अहमदाबाद हायवेवर ससूपाडा नजिक हायवेवर दोन्ही दिशेला पाणी तुंबले होते. तर पाण्याच्या प्रवाहालाही प्रचंड वेग होता. त्यामुळे हायवेवरील वाहतूक धिम्या गतीने जात होती. दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरही वाहतूक कोंडी झाली होती. गेल्याच आठवड्यात वसई वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी हायवेवर याठिकाणी पाणी साचून रहात असल्याने फुटलेला जुना पाईप बदलून नवीन पाईप टाकून घेतला होता. त्यानंतरही पाण्याचा निचरा होत नाही. डोंगरातून पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची सोय नाही. रस्त्यापलिकडे पूर्वी पावसाचे पाणी साचून राहण्यासाठी मोकळी जागा होती. पण, त्याठिकाणी आता मातीचे मोठे भराव झाल्याने पावसाळी पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. बारा गावांचा संपर्क तुटलातानसा नदीला आलेल्या पूरामुळे भाताणे-पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई तालुक्यातील बारा गावांचा संपर्क तुटला आहे. रात्रीपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने तानसा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पूलापलिकडील भाताणे, नवसई, थळ््याचा पाडा, आडणे, जांभुळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा या बारा गावांचा संपर्क तुटला आहे. या बारा गावातील गावकऱ्यांना दूरवरच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.यामुळे एस.टी. आणि काळी-पिवळी याद्वारे होणारी वाहतूक थांबली आहे. त्याचा फटका चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना बसला आहे.