शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:28 IST

संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलास

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/वसई : संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, बोईसर या परीसराची स्थिती बरी होती. या मुसळधार पावसाचे पाणी मुंबई, अहमदाबाद मार्गावर साचून प्रदीर्घ काळ भीषण वाहतूककोंडी झाली. अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. सोमवार रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई या शहरांसह ग्रामीण भागात व नवघर एसटी स्टँडवर पाणी तुंबले होते. पापडी-बंगली रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन विभागाने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुुरु झाली. गेले अनेक दिवस गायब झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी दुपारी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून पुन्हा झोडपून काढले. पावसाच्या तडाख्याने वसईतील सखल भागात पाणी तुंबले होते. विरार पश्चिमेला विवा कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी साचून राहिले होते. नालासोपारा सेंट्र्ल पार्क रस्ता पाण्याखाली गेला होता. ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाणी साचून राहिले होते.मुंबई अहमदाबाद हायवेवर ससूपाडा नजिक हायवेवर दोन्ही दिशेला पाणी तुंबले होते. तर पाण्याच्या प्रवाहालाही प्रचंड वेग होता. त्यामुळे हायवेवरील वाहतूक धिम्या गतीने जात होती. दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरही वाहतूक कोंडी झाली होती. गेल्याच आठवड्यात वसई वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी हायवेवर याठिकाणी पाणी साचून रहात असल्याने फुटलेला जुना पाईप बदलून नवीन पाईप टाकून घेतला होता. त्यानंतरही पाण्याचा निचरा होत नाही. डोंगरातून पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची सोय नाही. रस्त्यापलिकडे पूर्वी पावसाचे पाणी साचून राहण्यासाठी मोकळी जागा होती. पण, त्याठिकाणी आता मातीचे मोठे भराव झाल्याने पावसाळी पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. बारा गावांचा संपर्क तुटलातानसा नदीला आलेल्या पूरामुळे भाताणे-पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई तालुक्यातील बारा गावांचा संपर्क तुटला आहे. रात्रीपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने तानसा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पूलापलिकडील भाताणे, नवसई, थळ््याचा पाडा, आडणे, जांभुळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा या बारा गावांचा संपर्क तुटला आहे. या बारा गावातील गावकऱ्यांना दूरवरच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.यामुळे एस.टी. आणि काळी-पिवळी याद्वारे होणारी वाहतूक थांबली आहे. त्याचा फटका चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना बसला आहे.