शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही अनेक गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 04:15 IST

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

- रवींंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी अवस्था असलेल्या मोखाडा तालुक्यात लहान-मोठी पाच धरणे असताना धामणी, शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे व गोळ्याचापाडा, नावळ्याचापाडा, दापटी -१, दापटी-२, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा, कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंडाचीवाडी ठाकुरपाडा पोऱ्याचा पाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशा २४ पाड्यासह एकूण ३१ गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.गेल्या वर्षी जवळपास याच कालावधीमध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती व नगरपंचायतीच्या टंचाईग्रस्त गावपाड्यांसह ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा पावसाने उशिरापर्यंत जरी मुक्काम ठोकला असला तरी उशिरा का होईना, पण तालुक्यात पाणीटंचाईने डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे येणारे दोन महिने उष्णतेचे असल्याने पाणीटंचाई समस्या कठीण होऊन बसणार आहे. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी मोठमोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे. या धरणावर करोडोचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल- मे मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासीना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० - २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले आहेत.दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील पाणीटंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहचवले आहे. परंतु लगतच्या गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते.पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले, मात्र याचा फायदा नेमका किती झाला, याचे उत्तर आजही प्रशासणाकडे नाही. कारण प्रातिनिधिक स्वरुपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचापाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला आहे.ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, बंधारे, नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी खर्च झाला आहे.मोखाडा तालुका हा टंचाईग्रस्त तालुका असून दरवर्षीच टंचाईग्रस्त गावपाड्यांचा शंभरचा आकडा पार करावा लागतो. टँकरच्या नावाखाली दरवर्षी करोडोचा खर्च देखील होतो. यामुळे मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याची गरज आहे. -सारिका निकम, सभापती, मोखाडा पंचायत समिती

टॅग्स :palgharपालघर