शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही अनेक गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 04:15 IST

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

- रवींंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी अवस्था असलेल्या मोखाडा तालुक्यात लहान-मोठी पाच धरणे असताना धामणी, शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे व गोळ्याचापाडा, नावळ्याचापाडा, दापटी -१, दापटी-२, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा, कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंडाचीवाडी ठाकुरपाडा पोऱ्याचा पाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशा २४ पाड्यासह एकूण ३१ गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.गेल्या वर्षी जवळपास याच कालावधीमध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती व नगरपंचायतीच्या टंचाईग्रस्त गावपाड्यांसह ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा पावसाने उशिरापर्यंत जरी मुक्काम ठोकला असला तरी उशिरा का होईना, पण तालुक्यात पाणीटंचाईने डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे येणारे दोन महिने उष्णतेचे असल्याने पाणीटंचाई समस्या कठीण होऊन बसणार आहे. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी मोठमोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे. या धरणावर करोडोचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल- मे मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासीना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० - २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले आहेत.दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील पाणीटंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहचवले आहे. परंतु लगतच्या गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते.पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले, मात्र याचा फायदा नेमका किती झाला, याचे उत्तर आजही प्रशासणाकडे नाही. कारण प्रातिनिधिक स्वरुपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचापाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला आहे.ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, बंधारे, नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी खर्च झाला आहे.मोखाडा तालुका हा टंचाईग्रस्त तालुका असून दरवर्षीच टंचाईग्रस्त गावपाड्यांचा शंभरचा आकडा पार करावा लागतो. टँकरच्या नावाखाली दरवर्षी करोडोचा खर्च देखील होतो. यामुळे मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याची गरज आहे. -सारिका निकम, सभापती, मोखाडा पंचायत समिती

टॅग्स :palgharपालघर