शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही अनेक गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 04:15 IST

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

- रवींंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी अवस्था असलेल्या मोखाडा तालुक्यात लहान-मोठी पाच धरणे असताना धामणी, शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे व गोळ्याचापाडा, नावळ्याचापाडा, दापटी -१, दापटी-२, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा, कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंडाचीवाडी ठाकुरपाडा पोऱ्याचा पाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशा २४ पाड्यासह एकूण ३१ गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.गेल्या वर्षी जवळपास याच कालावधीमध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती व नगरपंचायतीच्या टंचाईग्रस्त गावपाड्यांसह ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा पावसाने उशिरापर्यंत जरी मुक्काम ठोकला असला तरी उशिरा का होईना, पण तालुक्यात पाणीटंचाईने डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे येणारे दोन महिने उष्णतेचे असल्याने पाणीटंचाई समस्या कठीण होऊन बसणार आहे. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी मोठमोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे. या धरणावर करोडोचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल- मे मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासीना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० - २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले आहेत.दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील पाणीटंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहचवले आहे. परंतु लगतच्या गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते.पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले, मात्र याचा फायदा नेमका किती झाला, याचे उत्तर आजही प्रशासणाकडे नाही. कारण प्रातिनिधिक स्वरुपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचापाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला आहे.ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, बंधारे, नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी खर्च झाला आहे.मोखाडा तालुका हा टंचाईग्रस्त तालुका असून दरवर्षीच टंचाईग्रस्त गावपाड्यांचा शंभरचा आकडा पार करावा लागतो. टँकरच्या नावाखाली दरवर्षी करोडोचा खर्च देखील होतो. यामुळे मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याची गरज आहे. -सारिका निकम, सभापती, मोखाडा पंचायत समिती

टॅग्स :palgharपालघर