शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

भातशेती संकटात!

By admin | Updated: August 25, 2015 22:43 IST

पालघर तालुक्यातील पूर्व मनोर परिसर आदिवासी भाग असल्याने पावसाळी भातशेती ही त्यांची अन्नदाता ठरते. मात्र यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने काही गावात शेती होऊ शकली नाही

मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व मनोर परिसर आदिवासी भाग असल्याने पावसाळी भातशेती ही त्यांची अन्नदाता ठरते. मात्र यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने काही गावात शेती होऊ शकली नाही तर काही भागात उशीरा शेती करण्यात आली. त्यामुळे यंदा दर्जेदार पीक येण्याची शक्यता कमी दिसत आहे. मनोर परिसरातील सावरे, ऐंबुरे, ढेकाळे, हलोली, दुर्वेस, निहे, नागझरी, मासवण, धुकटन, सावरखंड, पोळे, केव असे शंभर सव्वाशे गावे दऱ्याखोऱ्यात डोंगराच्या बाजूला वसलेले असून ८० टक्के आदिवासी, २० टक्के कुणबी व इतर समाजाचे बांधव या परिसरात राहत असून भातशेती हीच त्यांनी उपजिवीका आहे. यंदा जया, सुमा, रत्ना, एक काडी, कर्जत (३), असे विविध जातीचे बी-बियाणे पेरून ५० टक्के शेतकऱ्यांनी श्ोती केली. परंतु एक महिना पाऊस उशीरा पडल्याने काही शेतकरी लागवडीपासून वंचित राहीले.ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, तलाव, नदीकाठी शेती होती त्यांनी पंप लावून पेरणी केली होती. परंतु गरीब शेतकऱ्यांनी शेती केलीच नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी भातशेती लागवड केली आहे. त्यांना वेळेवर पाऊस न पडल्याने व हवामानात बदल झाल्याने त्यांनी लावलेल्या रोपांची वाढ झालीच नाही. या वातावरणामुळे पिकांवर रोग पडला असून भातशेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे. याबाबत पालघर जिल्ह्याचे कृषी अधिक्षक डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही.कृषीविभागाकडून सावरे ऐंबुरे परिसरातील शेतकऱ्यांना इंधनपंप, बांधबंदीस्ती, बंधारे, बांधण्यात आले त्यामुळे तेथील अनेकांनी बंधाऱ्याच्या पाण्यावर भात लागवड केली. या काळात भात बियाणे कृषी खात्याकडून मोफत वाटप करण्यात आले त्यामुळे यंदा कृषी विभागाकडून आम्हाला भरपूर मदत मिळाली आहे. परंतु निसर्गाच्या वातावरणामुळे पुढे शेतीवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. असे सावरे ऐंबुर गावचे शेतकरी कुमार पाटील यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)शेतीचाच आधार...मनोर परिसरात रोजगाराचा बोजवारा आहे. त्यामुळे येथील लोकांना पावसाळी शेतीवर अवलंबून राहावे लागते. भातशेतीतून भाताची विक्री केली जाते. त्यातून आलेल्या पैशातून आलेल्या पाहुण्यांची उठबस, स्वागत केले जाते. तसेच पावली पेंढा सणासुदीत विक्री करून सण साजरे केले जातात. मूळ उपजिविकेचा गाभा ही भातशेती आहे मात्र निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे पीकावर बाधा येते अशी परिस्थिती सध्या मनोर परिसरात आहे. त्यामुळे बळीराजा सैरभैर झाला आहे.