शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

भातशेती संकटात!

By admin | Updated: August 25, 2015 22:43 IST

पालघर तालुक्यातील पूर्व मनोर परिसर आदिवासी भाग असल्याने पावसाळी भातशेती ही त्यांची अन्नदाता ठरते. मात्र यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने काही गावात शेती होऊ शकली नाही

मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व मनोर परिसर आदिवासी भाग असल्याने पावसाळी भातशेती ही त्यांची अन्नदाता ठरते. मात्र यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने काही गावात शेती होऊ शकली नाही तर काही भागात उशीरा शेती करण्यात आली. त्यामुळे यंदा दर्जेदार पीक येण्याची शक्यता कमी दिसत आहे. मनोर परिसरातील सावरे, ऐंबुरे, ढेकाळे, हलोली, दुर्वेस, निहे, नागझरी, मासवण, धुकटन, सावरखंड, पोळे, केव असे शंभर सव्वाशे गावे दऱ्याखोऱ्यात डोंगराच्या बाजूला वसलेले असून ८० टक्के आदिवासी, २० टक्के कुणबी व इतर समाजाचे बांधव या परिसरात राहत असून भातशेती हीच त्यांनी उपजिवीका आहे. यंदा जया, सुमा, रत्ना, एक काडी, कर्जत (३), असे विविध जातीचे बी-बियाणे पेरून ५० टक्के शेतकऱ्यांनी श्ोती केली. परंतु एक महिना पाऊस उशीरा पडल्याने काही शेतकरी लागवडीपासून वंचित राहीले.ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, तलाव, नदीकाठी शेती होती त्यांनी पंप लावून पेरणी केली होती. परंतु गरीब शेतकऱ्यांनी शेती केलीच नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी भातशेती लागवड केली आहे. त्यांना वेळेवर पाऊस न पडल्याने व हवामानात बदल झाल्याने त्यांनी लावलेल्या रोपांची वाढ झालीच नाही. या वातावरणामुळे पिकांवर रोग पडला असून भातशेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे. याबाबत पालघर जिल्ह्याचे कृषी अधिक्षक डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही.कृषीविभागाकडून सावरे ऐंबुरे परिसरातील शेतकऱ्यांना इंधनपंप, बांधबंदीस्ती, बंधारे, बांधण्यात आले त्यामुळे तेथील अनेकांनी बंधाऱ्याच्या पाण्यावर भात लागवड केली. या काळात भात बियाणे कृषी खात्याकडून मोफत वाटप करण्यात आले त्यामुळे यंदा कृषी विभागाकडून आम्हाला भरपूर मदत मिळाली आहे. परंतु निसर्गाच्या वातावरणामुळे पुढे शेतीवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. असे सावरे ऐंबुर गावचे शेतकरी कुमार पाटील यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)शेतीचाच आधार...मनोर परिसरात रोजगाराचा बोजवारा आहे. त्यामुळे येथील लोकांना पावसाळी शेतीवर अवलंबून राहावे लागते. भातशेतीतून भाताची विक्री केली जाते. त्यातून आलेल्या पैशातून आलेल्या पाहुण्यांची उठबस, स्वागत केले जाते. तसेच पावली पेंढा सणासुदीत विक्री करून सण साजरे केले जातात. मूळ उपजिविकेचा गाभा ही भातशेती आहे मात्र निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे पीकावर बाधा येते अशी परिस्थिती सध्या मनोर परिसरात आहे. त्यामुळे बळीराजा सैरभैर झाला आहे.