शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

गतवर्षीच्या पुरामुळे आमचे बालपण हरवले; सहाय्यक आयुक्तांना चिमुरडयांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:46 IST

दरम्यान चूळणे येथील शिक्षिका मॉनिका कोलासो आयोजित मुलांच्या कार्यशाळेचा एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यालयाला आपल्या परिसरातील बाळ गोपांळाची मोठी समस्या कोणती व ती सोडविण्यासाठी कोणाकडे भेट देणे आवश्यक आहे.

आशिष राणे वसई : महापालिकेच्या नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग अंतर्गत शहरी व साधारण ग्रामीण भाग असलेल्या चुळणे गाव व भाबोळा परिसरातील शेजोळच्या बाळ- गोपाळांनी गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे गावात आलेले पुराचे पाणी आणि त्यामुळे झालेले अतोनात हाल ऐकवण्यासाठी थेट महापालिकेत पोहचून मोठे नागरिक असो वा राजकारणी तर स्वत: दस्तुरखुद्द स्थानिक नगसेवकांलाही लाजवेल असा ‘दे धक्काच’ दिला आहे .गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील शाळा, घरं, समाज मंदिर मुळातच संपूर्ण गाव हा दहा ते बारा दिवस पाण्याखाली व अंधारमय होता आणि यंदा पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये याकरता त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी येथील चुळणे गावातील १७ विद्याथ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी थेट महापालिकेच्या नवघर माणिकपूरचे सहाय्यक आयुक्त गिलसन घोनसालवीस यांच्या दालनात पोहचून त्यांना त्यांच्या समस्यांचे एक निवेदन देऊ केले असल्याची माहिती थॉमस डाबरे यांनी लोकमत ला दिली आहे.

दरम्यान चूळणे येथील शिक्षिका मॉनिका कोलासो आयोजित मुलांच्या कार्यशाळेचा एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यालयाला आपल्या परिसरातील बाळ गोपांळाची मोठी समस्या कोणती व ती सोडविण्यासाठी कोणाकडे भेट देणे आवश्यक आहे. या निमित्ताने दि.२१ मे मंगळवारी या १७ बाळ -गोपाळांनी नवघर माणिकपूर शहर एच प्रभाग समिती कार्यालयाचे सहा. आयुक्त गिलसन घोन्सालविस यांची भेट घेतली व गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत यावर सविस्तर चर्चा केली. एकूणच आपल्या गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत आणि त्यांची सोडवणूक स्थानिक प्रशासन म्हणून कशा प्रकारे करते याउलट त्यात आपली जबाबदारी काय असली पाहिजे याची नेमकी माहिती मुलांनाही होणे गरजेचे असल्याचे सांगत मुलांना त्यांच्या विद्यार्थी दशेच्या काळात यांचे आकलन व जाणीव होण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होती.त्यानुसार चुळणे गावातील सामाजिक कार्यकर्ते थॉमस डाबरे व शिक्षिका लुबिना घोन्सालविस या दोघांच्या सहकार्याने ही भेट घडवून आणली होती. यावेळी झालेल्या तासाभराच्या भेटीत सर्व मुलांनी सहाय्यक आयुक्तांना चूळणे व भाबोळा परिसरात गेल्या वर्षी पुराच्या पाण्यामुळे आलेले आपले गंभीर अनुभव कथन केले.काय म्हटले आहे मुलांनी निवेदनातआम्ही पावसाचा आनंद घेऊ शकत नाही. शाळेत जाऊ शकत नाही, कारण शाळेतही पाणी साचते. व्यवस्थित खेळू , बागडू शकत नाही. कुठे जाऊ शकत नाही. तसेच प्रामुख्याने हे पाणी गटार व घाणीचे असल्याने त्यामध्ये जीव जंतू असू शकतात अणि ते आरोग्यास अपायकारक आहे. गावातील नालेसफाई, गटारे ,कचरा यांची नीट सफाई होऊन गाव स्वच्छ ठेवावा यासाठी अधिकारी म्हणून जातीने लक्ष घालावे .

वास्तविक निवेदन, चर्चा, उपाय भेटी ही सर्व कामे लोकप्रतिनिधी व मोठ्यांची, नागरिकांची मात्र यंदा प्रथमच असे चित्र महापालिकेत पाहायला मिळाले, वास्तविक आपली तरूण पिढी सरकारी दफ्तरी पाय टाकायला तयार नसते पण आज चक्क वसई विरार महापालिकेत विद्यार्थी दशेत असलेल्या या बाळगोपाळांनी महापालिका इमारतीत आनंदाने इकडे तिकडे हिंडून कामकाज समजावून घेतले आणि त्यावेळी बच्चे कंपनीला पहिल्यादांच कार्यालयात पाहून येथील कर्मचारी सुध्दा खुश तर झाल्याचे दिसले. मात्र दुसरीकडे हा क्षण सर्वानाच लाजवेल असा होता.