शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विक्रमगडमधील फक्त १३७८ मजुरांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 03:39 IST

रोहयोचे धोरण नापास : पाच हजारांपेक्षा जास्त मजूर कुटुंबांची नोंद; शासनाचे धोरण आदिवासींची कुचंबणा करणारे

संजय नेवे विक्रमगड : ग्रामिण व आदिवासी भागातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार हमीच्या योजना सुरु असल्या तरी प्रत्यक्ष रोजगार फक्त १३७८ मजुरांना मिळाला आहे. नोंदणी पाच हजारापेक्षा जास्त मजूर कुटुंबाचीं असताना रोजगाराची उपलब्धता फारच तोकडी असल्यामुळे ‘मागेल त्याला काम अन् पंधरा दिवसात दाम’ या ब्रिदवाक्याला हरताळ फासला जात आहे.

तालुक्यात रोजगार हमीची २१९ कामे सुरू तर फक्त २१३२ मजूरांना यंदा रोजगार मिळाला आहे. महात्मा गाधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावपाडयासह मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.शंभर दिवस पुरेल एवढे प्रत्येकाला मिळेल हा उद्देश असला तरी तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीत पैकी सवादे, कासा, साखरे, दादडे, वेढेचरी, बोराडे, खडकी, जाभे, वेहलपाडा, आलोंडा, बाधन केगवा आदी ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलाची व शोषखड्ड्यांची एकुण १३९ कामे सुरू आहेत. मात्र, इतर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अजून कोणतीच कामे सुरू नसल्याने मजूराचे स्थलांतर सुुरु आहे.या घरकुलाच्या कामामुळे फक्त ७५४ मजूरांना काम मिळाले आहेत. शेतीची कामे संपली आहेत व रोजगाराच्या शोधात मजूर शहराकडे वळला आहे. रोहयोची कामे वेळेत सुरु झाली तरच मजूरांचे स्थालातर होणार नाही . तसेच, रोजगार हमीची कामे देखील होतील. मात्र धोरणात्मक त्रुटीमुळे किंवा प्रशासकीय अम्मलबजावणीतील दोषांमुळे रोजगार हमी नावालाच दिसत आहे. स्थलांतरामुळे कुपोषण तसेच अशिक्षितपणा वाढत आहे. नवीन अध्यादेश प्रमाणे २५ ते २६ कामे नविन सुरू करता येतील असे असताना मात्र त्याची अजून कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाही.

तालुक्यात फक्त २१३२ मजूरांना प्रत्यक्ष काम मिळाले आहे अजून रोजगार मिळाला नसल्याने बाकीच्या मजुरांनी काय करायचे असा सवाल मजूरानी केला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थंलातर होत असून हे रोखण्यासाठी या रोजगाराचे नियोजन करून रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या यंत्रणेवर आहे. पंरतु यंत्रणाच हात झकटण्याचे काम करीत असल्याचा आरोप तालुक्यातील अनेक गाव-पाड्यातून होत आहे. या घरकुलाच्या कामामुळे फक्त ७५४ मजूरांना काम मिळाले आहेत. काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अजून कोणतीच कामे सुरू नसल्याने मजूराचे स्थलांतर सुुरु आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार