शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी एक तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:31 IST

कुपनलिकेचे थेंब थेंब पाणी : कुयलू येथील महिलांनी मांडली कैफियत

- वसंत भोईर

वाडा : तालुक्यातील कुयलू ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गाव पाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एक हंडाभर पाण्यासाठी एक तासाचा कालावधी कुपनलिकेला लागत असल्याची कैफियत येथील महिलांनी मांडली. पाणी पुरवठा विभागाकडून टॅकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो कमी प्रमाणात व गढूळ येत असल्याने कुयलूवासियांचे हाल संपता संपत नाही.

या ग्रामपंचायतीची लोकसंख्या १८०० च्या आसपास आहे. एक गाव व अधिक पाडे आहेत. कुयलू या मुख्य गावाची ५०० च्या आसपास लोकसंख्या असून या गावात दोन विहीरी आहेत. मात्र, या विहीरीतील पाणी आटल्याने या गावाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावासाठी शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, चार पाच दिवसांतून एकदा टँकरने पाणी येते. तेही एका विहीरीत टाकले जाते.

टँकरने टाकलेले पाणी गढूळ असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापरत नसल्याने महिलांची पायपीट सुरुच आहे. टँकरने ज्या विहीरीमध्ये पाणी टाकते ती अतिशय खोल असल्याने पाणी काढताना महिलांची दमछाक होत असल्याचे गायत्री मेणे या महिलेने सांगितले. विहिरीजवळ असलेली एकमेव कुपनलिका सुरू असून तिला थेंब थेंब पाणी येते. एक पाण्याचा हंडा भरण्यासाठी एक तास लागतो, अशी माहिती उर्मिला हरड यांनी दिली.

कुपनलिकेला पाणी कमी असल्याने ती हपसण्यासाठी शारिरीक त्रासही सहन करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील एक विहीर असून या विहिराला जलपर्णीनी विळखा घातला आहे. पाण्यानेही तळ गाठला आहे. तसेच, विहीरही नादुरुस्त असल्याने विहिरीत कोणी उतरत नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.अर्धा किमी अंतरावरून डोक्यावर पाणी आणणे शक्य नसल्याने आम्ही २०० लिटरची पाण्याची टाकी ३५ रूपयाला विकत घेतो, अशी माहिती वयोवृद्ध महिला मंजुळा भोईर यांनी दिली.

याच ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत धावरपाडा असून येथे ३५ घरे असून १५० च्या आसपास लोकसंख्या आहे. या पाड्यात चार दिवसातून एकदा टँकरने पाणी येत असल्याची माहिती येथील ग्रामस्थ हरिश्चंद पतंगराव यांनी दिली. या पाड्यात असलेल्या कुपनलिकेतील पाणी आटल्याचेही त्यांनी सांगितले. चार पाच दिवसांचे पाणी प्यावे लागत असल्याने काही आजार होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.अंघोळ कपडे धुण्यासाठी एका किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर जावे लागत असल्याचे जर्नादन कोम यांनी सांगितले. या टंचाईमुळे दिवस-रात्र महिलांचा वेळ पाणी भरण्यासाठी जात असल्याने त्यांचा रोजगारही बुडत आहे.शासनाने टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो नियमाप्रमाणे दिला जात असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.अनेक दिवसांचे पाणी आरोग्याला धोकाशासनाच्या नियमाप्रमाणे प्रति माणसी २० लिटर पाणी देण्याचा शासनाचा नियम आहे. या नियमामुळे कमी लोकसंख्या असलेल्या पाड्यात टँकर येण्यासाठी चार ते पाच दिवस लागत असल्याने अनेक दिवसांचे पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टँकरने आणलेले पाणी हे स्वच्छ असून याच पाण्याचा वापर अनेक गावपाड्यात केला जात आहे.-अरूण भांड, ग्रामसेवककुयलू ग्रामपंचायत