शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! तब्बल १२६ वीजचोर पकडले, धानिवबाग, वाकणपाडा परिसरात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:02 IST

१२६ वीज चोरणा-या आरोपींनी ७७ हजार ९२० युनिटची वीजचोरी करून तब्बल १८ लाख ८५ हजार ५४२ रुपयांचे महावितरणचे नुकसान केले आहे.

नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वीजचोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असून रात्रीच्या सुमारास वीज खांबावर आकडा टाकून वीजचोरी केली जाते. अनेक तक्रारींनंतर महावितरणच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नालासोपारा शहरातील धानिवबाग आणि वाकणपाडा परिसरात धाडी टाकून वीजचोरीचा पर्दाफाश करत तब्बल १२६ जणांविरु द्ध सोमवारी वसई पोलीस ठाण्यात ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.या वीजचोरांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्च अधिकाºयांनी भरारी पथक तयार करून त्या पथकाद्वारे कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग आणि वाकणपाडा या परिसरातील चाळींमध्ये काळ्या रंगाच्या दोन छेडा असलेल्या सुमारे १० ते ३० मीटर लांबीच्या वायरने चाळीच्या किंवा त्यांच्या परिसरातून जाणाºया इनकमिंग वायरवर टेप करून टेपिंग पद्धतीने विनामीटर आपल्या घर किंवा कार्यालयातील विद्युत उपकरणांना जोडून महावितरणची वीजचोरी केली जात असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी अधिकारी निकुंज बाबूलाल वैष्णव (३२) यांनी ३ तक्र ारी देत १२६ जणांवर वसई पोलीस ठाण्यात सोमवारी ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या १२६ वीज चोरणाºया आरोपींनी ७७ हजार ९२० युनिटची वीजचोरी करून तब्बल १८ लाख ८५ हजार ५४२ रुपयांचे महावितरणचे नुकसान केले आहे.नालासोपारामध्ये सर्वात जास्त होते वीजचोरीवसई तालुक्यात सर्वात जास्त वीजचोरी नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन, गावराई पाडा, वालई पाडा, मोरेगाव, नागिनदास पाडा, आचोळे डोंगरी, विरार पूर्वेकडे कातकरी पाडा, चंदनसार, मनवेलपाडा, कारगिल नगर, वसई पूर्वेकडे भोयदा पाडा, नवजीवन, सातीवली, वालीव तर नायगांव पूर्वेकडील जुचंद्र, टाकी पाडा या विभागात होते. या विभागात अनधिकृत बांधकामे मोठ्या जोमाने सुरु असल्यामुळे आणि वीजचोरी करणाºया टोळ्या याच विभागात कार्यरत असून या इमारतींतील लोकांना चोरीची वीज वापरण्यास देतात. संध्याकाळ झाली की विजेच्या खांबावर आकडे टाकून वीजचोरी केली जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार