शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

आता मच्छीमार सापडले दुहेरी कात्रीत

By admin | Updated: July 22, 2015 03:33 IST

आॅगस्टच्या पहिल्या तारखेपासून मासेमारीचा मुहूर्त असला तरी, हवामान खात्याने वादळीवऱ्यांसह लाटांचे संकट येणार असल्याचे भाकित केले

हितेन नाईक ,पालघरआॅगस्टच्या पहिल्या तारखेपासून मासेमारीचा मुहूर्त असला तरी, हवामान खात्याने वादळीवऱ्यांसह लाटांचे संकट येणार असल्याचे भाकित केले आहे. यापाश्वभुमिवर विक्रमगड, जव्हार येथील बोटीत काम करणाऱ्या आदिवासी खलाशी कामगारांनी शेतीच्या कामांना सुरूवात केली आहे. दरम्यान, उपजीविकेच्या बाबतीत एकीकडे जीवाचे संकट तर दुसरीकडे हेच खलाशी लावणीची कामे करतात. मात्र पावसाने नुकतीच पुन्हा सुरूवात केल्याने ती कामे सुद्धा अपूर्ण आहेत. त्यामुळे जायचे कुठे या दुहेरी कात्रीत पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सापडला आहे.पालघर, ठाणे जिल्ह्यासह गुजरात मधील दमण, मरोली, जाफराबाद आदी भागातील मच्छीमारांनी एकत्र येत मत्स्य उत्पादक व मत्स्य संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पावले टाकीत १० जून पासून सुरू होणारी पावसाळी मासेमारी बंदी १५ मे पासूनच अंमलात आणली. अशावेळी युतीच्या केंद्र व राज्य सरकारने १० जून ते १५ आॅगस्ट या पावसाळी बंदी कालावधीत वाढ करण्याऐवजी पूर्व किनारपट्टीभागात १५ एप्रिल ते १४ जून तर पश्चिम किनारपट्टीवरील भागात १ जून ते ३१ जुलै अशी पावसाळी बंदीची घोषणा केली. पालघर तालुक्यातील सातपाटी, एडवण, दातिवरे, वडराई, टेंभी, मुरबे, नवापुर, उच्छेळी, दांडी भागातील सुमारे दीड हजार मासेमारी नौकामध्ये मनोर, विक्रमगड, जव्हार, डहाणू, तलासरी भागातील ५ ते ७ हजार आदिवासी कामगार काम करीत आहेत. यावर्षी जूनमध्ये योग्य वेळी सुरू झालेल्या पावसाने मागील २० दिवसापासून दडी मारल्याने पेरणी खोळंबली होती. परंतु सोमवारपासून वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पुन्हा पेरणीच्या कामाला सर्वत्र सुरूवात होणार आहे. त्यामुळे मासेमारीला जाण्यासाठी खलाशी उपलब्ध होणे कठीण आहे.३१ जुलै पासूनच मासेमारीला परवानगी देऊन शासनाने मच्छिमाराना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे काम केल्याची भावना जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य सुभाष तामोरे यांनी व्यक्त केली आहे. आॅगस्ट १९८९ साली मुंबईतून मासेमारीसाठी गेलेल्या ७९ ट्रॉलर्सना जलसमाधी मिळून ३०५ खलांशांचा मृत्यू झाला होता. या सर्व खलाशांचे मृतदेह मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातपाटी आदी भागातील किनारपट्टीवर लागले होती. त्यामुळे याच घटनेची पुनरावृत्ती करावयाची आहे काय? असा सवाल महाराष्ट्र कृती समितीचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.