शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

आता मच्छीमार सापडले दुहेरी कात्रीत

By admin | Updated: July 22, 2015 03:33 IST

आॅगस्टच्या पहिल्या तारखेपासून मासेमारीचा मुहूर्त असला तरी, हवामान खात्याने वादळीवऱ्यांसह लाटांचे संकट येणार असल्याचे भाकित केले

हितेन नाईक ,पालघरआॅगस्टच्या पहिल्या तारखेपासून मासेमारीचा मुहूर्त असला तरी, हवामान खात्याने वादळीवऱ्यांसह लाटांचे संकट येणार असल्याचे भाकित केले आहे. यापाश्वभुमिवर विक्रमगड, जव्हार येथील बोटीत काम करणाऱ्या आदिवासी खलाशी कामगारांनी शेतीच्या कामांना सुरूवात केली आहे. दरम्यान, उपजीविकेच्या बाबतीत एकीकडे जीवाचे संकट तर दुसरीकडे हेच खलाशी लावणीची कामे करतात. मात्र पावसाने नुकतीच पुन्हा सुरूवात केल्याने ती कामे सुद्धा अपूर्ण आहेत. त्यामुळे जायचे कुठे या दुहेरी कात्रीत पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सापडला आहे.पालघर, ठाणे जिल्ह्यासह गुजरात मधील दमण, मरोली, जाफराबाद आदी भागातील मच्छीमारांनी एकत्र येत मत्स्य उत्पादक व मत्स्य संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पावले टाकीत १० जून पासून सुरू होणारी पावसाळी मासेमारी बंदी १५ मे पासूनच अंमलात आणली. अशावेळी युतीच्या केंद्र व राज्य सरकारने १० जून ते १५ आॅगस्ट या पावसाळी बंदी कालावधीत वाढ करण्याऐवजी पूर्व किनारपट्टीभागात १५ एप्रिल ते १४ जून तर पश्चिम किनारपट्टीवरील भागात १ जून ते ३१ जुलै अशी पावसाळी बंदीची घोषणा केली. पालघर तालुक्यातील सातपाटी, एडवण, दातिवरे, वडराई, टेंभी, मुरबे, नवापुर, उच्छेळी, दांडी भागातील सुमारे दीड हजार मासेमारी नौकामध्ये मनोर, विक्रमगड, जव्हार, डहाणू, तलासरी भागातील ५ ते ७ हजार आदिवासी कामगार काम करीत आहेत. यावर्षी जूनमध्ये योग्य वेळी सुरू झालेल्या पावसाने मागील २० दिवसापासून दडी मारल्याने पेरणी खोळंबली होती. परंतु सोमवारपासून वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पुन्हा पेरणीच्या कामाला सर्वत्र सुरूवात होणार आहे. त्यामुळे मासेमारीला जाण्यासाठी खलाशी उपलब्ध होणे कठीण आहे.३१ जुलै पासूनच मासेमारीला परवानगी देऊन शासनाने मच्छिमाराना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे काम केल्याची भावना जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य सुभाष तामोरे यांनी व्यक्त केली आहे. आॅगस्ट १९८९ साली मुंबईतून मासेमारीसाठी गेलेल्या ७९ ट्रॉलर्सना जलसमाधी मिळून ३०५ खलांशांचा मृत्यू झाला होता. या सर्व खलाशांचे मृतदेह मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातपाटी आदी भागातील किनारपट्टीवर लागले होती. त्यामुळे याच घटनेची पुनरावृत्ती करावयाची आहे काय? असा सवाल महाराष्ट्र कृती समितीचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.