शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

एनएचएसआरसीएल करणार दीड लाख कांदळरोपांची लागवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 03:57 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी लोकमत ला दिली आहे.

- आशिष राणेवसई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी लोकमत ला दिली आहे.दरम्यान त्यासाठी बुलेट ट्रेन मार्गावरील प्रस्तावित ठाणे स्थानक परिसराची पुनर्रचना करण्यात आली असून त्यायोगे कांदळवनांचे रक्षण करण्यात येणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी यां सदर्भात सांगितले की, ‘मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वन्यजीव आणि सीआरझेड परवानग्या प्राप्त करण्यात आल्या आहेत.वनांबाबतच्या परवानगीला मात्र एक अट ठेवण्यात आली आहे. बुलेट ट्रेन मार्गावरील प्रस्तावित ठाणे स्थानक रचनेचा पुनर्आढावा घेऊन तेथे सद्य:स्थितीत असलेल्या कांदळवनांवर होणाºया परिणामांची तीव्रता कमी करावी, असे आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून करण्यात आले होते. त्यानुसार आम्ही या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला. प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गावर असलेल्या ठाणे स्थानकाचे स्थान अबाधित ठेवून स्थानक परिसराची पुनर्रचना करण्यावर भर देण्यात आला आहे,यासंदर्भात जपानी अभियंत्यांशी चर्चा करून पुनर्आराखडा तयार करण्यात आला. यावेळी ते पुढे म्हणाले की, ठाणे स्थानक परिसरातील प्रस्तावित पार्किंग आणि प्रवासी आगमन-निर्गमन या दोन ठिकाणांची पुनर्रचना करण्यात आली.त्यानुसार नष्ट होणा-या ३२ हजार ४४ कांदळवनांच्या बदल्यात आम्ही तब्बल एक लाख ६० हजार कांदळवनांची नव्या ठिकाणी लागवड करणार आहोत.या सगळ्या प्रक्रि येचा खर्च एनएचएसआरसीएल करणार आहे. त्यासाठी आवश्यक रक्कम कांदळवन विभागाकडे सोपवली जाणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यामुळे पर्यावरणाचे विशेषत: मत्स्य प्रजोत्पदनाचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होणार आहे.- आधीच्या आराखड्यात ही दोन्ही ठिकाणे कांदळवन क्षेत्रात येत होती. मात्र, त्यांचे स्थान आता बदलण्यात आले आहे. प्रस्तावित ठाणे स्थानक परिसरामुळे १२ हेक्टर कांदळवन क्षेत्रावर परिणाम होत होता. आराखड्याच्या पुनर्रचनेमुळे बाधित होणारे क्षेत्र केवळ तीन हेक्टरच असणार आहे.- संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्पा दरम्यान ५३ हजार कांदळवनां ऐवजी आता केवळ ३२ हजार ४४ कांदळवनांवरच परिणाम होणार असून २१ हजार कांदळवने सुरक्षित राहणार आहेत.त्यांनी ही बाधित होणा-या ३२ हजार कांदळवनांची भरपायी आम्ही करणार आहोत. एकास पाच या प्रमाणे आम्ही कांदळवनांची लागवड ही करणार आहोत असे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार