शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

डहाणूमध्ये राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

By admin | Updated: November 2, 2015 01:27 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने सामान्यजणांना जगणे मुश्किल झाले आहे. डाळी, कांद यांसह विविध वस्तुंच्या वाढत्या महागाईने

डहाणू : ऐन दिवाळीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने सामान्यजणांना जगणे मुश्किल झाले आहे. डाळी, कांद यांसह विविध वस्तुंच्या वाढत्या महागाईने जनता त्रस्त असून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. या हल्लाबोल आंदोलनाचे नेतृत्व आ. आनंदभाई ठाकूर यांनी केले.केंद्रात तसेच राज्यात भाजपाची सत्ता येवून वर्ष लोटले तरी आजपर्यंत जनतेला अच्छे दिन आले नाहीत. शिधावाटप दुकानातील धान्य तसेच रॉकेल गायब झाले आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या आदिवासींना खुल्या बाजारातून महागडे धान्य खरेदी करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसमोर दैनंदिन राहाटगाडा हाकायचा तरी कसा असा सवाल ठाकूर यांनी यावेळी केला. पक्षाच्यावतीने पारनाका ते तहसीलदार कार्यालय असा लॉँगमार्च करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने डहाणूचे तहसीलदार प्रितीलता कौरथी यांना निवेदन देवून जनतेची भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची मागणी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश पारेख, माजी नगराध्यक्ष मिहिर शाह, युवक अध्यक्ष करण ठाकूर, शहर अध्यक्ष शमी पीरा, रमेश कर्णावट, नगरसेवक शशीकांत बारी, माजी सभापती सुरेंद्र पाटील, नगराध्यक्ष रमिला पाटील, नगरसेवीका रेणुका राकामुथा, इ. शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)