शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

डहाणूमध्ये राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

By admin | Updated: November 2, 2015 01:27 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने सामान्यजणांना जगणे मुश्किल झाले आहे. डाळी, कांद यांसह विविध वस्तुंच्या वाढत्या महागाईने

डहाणू : ऐन दिवाळीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने सामान्यजणांना जगणे मुश्किल झाले आहे. डाळी, कांद यांसह विविध वस्तुंच्या वाढत्या महागाईने जनता त्रस्त असून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. या हल्लाबोल आंदोलनाचे नेतृत्व आ. आनंदभाई ठाकूर यांनी केले.केंद्रात तसेच राज्यात भाजपाची सत्ता येवून वर्ष लोटले तरी आजपर्यंत जनतेला अच्छे दिन आले नाहीत. शिधावाटप दुकानातील धान्य तसेच रॉकेल गायब झाले आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या आदिवासींना खुल्या बाजारातून महागडे धान्य खरेदी करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसमोर दैनंदिन राहाटगाडा हाकायचा तरी कसा असा सवाल ठाकूर यांनी यावेळी केला. पक्षाच्यावतीने पारनाका ते तहसीलदार कार्यालय असा लॉँगमार्च करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने डहाणूचे तहसीलदार प्रितीलता कौरथी यांना निवेदन देवून जनतेची भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची मागणी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश पारेख, माजी नगराध्यक्ष मिहिर शाह, युवक अध्यक्ष करण ठाकूर, शहर अध्यक्ष शमी पीरा, रमेश कर्णावट, नगरसेवक शशीकांत बारी, माजी सभापती सुरेंद्र पाटील, नगराध्यक्ष रमिला पाटील, नगरसेवीका रेणुका राकामुथा, इ. शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)