शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

नायगाव उड्डाणपूल रखडला

By admin | Updated: June 11, 2017 02:49 IST

पश्चिमेकडील गावांना हायवे आणि नायगाव पूर्वेकडील गावांना पश्चिमेला जोडणारा महत्वाचा नायगाव रेल्वे उड्डाणपूल रखडला आहे. एक वर्षांची मुदतवाढ येत्या ३० तारखेला

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पश्चिमेकडील गावांना हायवे आणि नायगाव पूर्वेकडील गावांना पश्चिमेला जोडणारा महत्वाचा नायगाव रेल्वे उड्डाणपूल रखडला आहे. एक वर्षांची मुदतवाढ येत्या ३० तारखेला संपुष्टात येत आहे तरी काम अद्यापही अर्धवट आहे. दुसरीकडे, पूलाच्या गर्डरला दोनवेळा तडे गेल्याने दर्जाबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येते.वसई तालुक्यातील महत्वाची सर्वच कार्यालये कोर्ट, पंचायत समिती, तहसिल कचेरी, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, आरटीओ केंद्र वसई गावात अर्थात नायगावच्या पश्चिम भागात आहेत. मात्र, नायगाव ला रेल्वे उ्ड्डाणपूल नसल्याने नायगाव पश्चिमेकडील अनेक लहान मोठ्या गावातील गावकऱ्यांना सरकारी कामाकाजासाठी वसई रेल्वे उड्डाणपूलावरुन ये-जा करावी लागते. दुसरीकडे, नायगाव पश्चिमेकडे असलेल्या सर्वच गावातील गावकऱ्यांना ठाणे, मुंबई आणि त्यापलिकडे ये-जा करायची असेल तर ती वसई रेल्वे स्टेशनवरील उड्डाणपूलावरून करावी लागते. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा वाया जात आहे. यावर उपाय म्हणून नायगाव रेल्वे उड्डाणपूलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल झाल्या नंतर नायगाव पश्चिमेकडील गावकऱ्यांना अवघ्या काही मिनिटातच मुंबई-अहमदाबाद हायवेवर पोहोचता येणार आहे. त्यानंतर मुंबई, ठाण्यासह इतर ठिकाणी सहजपणे प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर नायगाव पूर्वेकडील गावकऱ्यांना सरकारी कार्यालयांमध्ये अवघ्या दहा-पंधरा मिनिटात विनासायास ये-जा करता येणार आहे. प्रारंभी तिवरांची झाडे आणि मिठागरांची जमीन यामुळे पूल अ़नेक वर्ष रखडून पडला होता. शेवटी एमएमआरडीएने पुढाकार घेऊन नायगाव-जुचंद्र-बापाणे रस्ता उड्डाणपूलासह मंजूर केला. उड्डाणपूलासह ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी एमएमआरडीएने १०८ कोटी ५ लाख रुपये खर्चाचे काम २० डिसेंबर २०१३ रोजी सिम्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर ला दिले आहे. हे काम करण्यासाठी अंतिम मुदत ३० जून २०१६ होती. मात्र, पूलाचे काम रखडल्याने ३० जून २०१७ पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्येही हे काम होणार नाही हे आता स्पष्ट झाल्याने ते होणार तरी कधी असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. दोनदा गर्डर बदलले दर्जाबद्दल संशयमुदतवाढ संपायला आता अवघे काही दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र, उड्डाणपूलाचे निम्म्याहून अधिक काम अद्याप अपूर्ण आहे. पूलाचे काम पूर्ण होण्यास आणखी किमान एक वर्ष लागणार असल्याची माहिती जाणकार देत आहेत. त्यातच गेल्या सहा महिन्यात पूलाच्या गर्डरला दोन वेळा तडे गेले होते. दोन्ही वेळा गर्डर बदलण्यात आले. त्यामुळे आता पूलाच्या कामाच्या दर्जाविषयी शंका व्यक्त केली जात आहे.