शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या मृत्युचे गूढ वाढले

By admin | Updated: January 16, 2016 00:22 IST

रविवारी रात्री विरारमधील दोन विद्यार्थ्यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची नोंद करताना दोघांच्या अपघातामधील अंतरात तब्बल ४० मिनिटांची तफावत दाखवण्यात आली आहे.

- शशी करपे,  वसई रविवारी रात्री विरारमधील दोन विद्यार्थ्यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची नोंद करताना दोघांच्या अपघातामधील अंतरात तब्बल ४० मिनिटांची तफावत दाखवण्यात आली आहे. भार्इंदरला दोघेही गेले असताना मृतदेह मात्र नारंगी आणि वैतरणा दरम्यान आढळून आले होते. तर दोन्ही मुले केळवा येथे गेल्याचे जबरदस्तीने लिहून घेतल्याचा आरोप करीत मुलांच्या नातेवाईकांनी मृत्युबाबतच संशय व्यक्त केला आहे. विरारमधील जितेन यादव (१६) आणि विकी झा (१६) हे दोन मित्र रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. विकी मित्राच्या वाढदिवसासाठी भार्इंदरला जातो सांगून घराबाहेर पडला होता. जितेन वही आणायला मित्राकडे जातो सांगून घराबाहेर पडला होता. दोघेही रात्री उशिरा घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरु केला होता. रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह नारंगी आणि वैतरणा दरम्यान रेल्वे रुळावर आढळल्याचे सांगून अपघाती मृत्युची नोंद केली होती. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. पोलीस डायरीत विकीचा अपघात ७ वाजून १० मिनिटाने झाल्याची तर जितेनचा ७ वाजून ५० मिनिटांनी अपघात होऊन मृत्यु झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्युचे कारण समजून येईल. दोन्ही मुलांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जातील. तसेच त्यांच्या मित्रांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.