शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावर महापालिकेने खर्च केले ८१७ करोड; वसई-विरार महापालिका नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:21 IST

स्वच्छता अभियानाला अपयशी करीत आहेत कंत्राटदार

नालासोपारा : दरवेळी या ना त्या आरोपामुळे किंवा कारणामुळे सदैव चर्चेत असलेली वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिसरात अनिधकृत बांधकामे, नाल्यांची किंवा गटारांची साफ सफाई न होणे, रस्त्याच्या कडेला असलेले कचºयाचे ढीग, फूटपाथावरील तुटलेली गटारांची झाकणे यासर्व बाबींवर करोडो रुपये खर्च करते पण परिस्थिती जशीच्या तशीच आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेने हद्दीमध्ये साफसफाई करण्यासाठी मागील पाच वर्षामध्ये ८१७ करोड ८ लाख ३१ हजार रुपये केल्याचे कळते. या केलेल्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. जर महानगरपालिकेने सर्वत्र साफसफाई केली असती तर हे कचºयाचे ढीग सर्वत्र दिसले नसते, महानगरपालिकेने हा खर्च फक्त कागदावरच केला असून स्वच्छ भारत अभियानांतर्गत येणारा निधी महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदार गिळून हडप करीत असल्याचा धक्कादायक आरोप सामान्य नागरिकांनी केला आहे. तर देशामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सर्व्हेक्षणांमध्ये वसई विरार महानगरपालिका तिसºया नंबरवर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऊन आणि उकाडयामध्ये रस्त्याच्या किनाºयालगत कचºयाच्या ढिगाºयातून येणाºया दुर्घगंधीच्या उग्र वासामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. या कचºयाच्या समस्यांचे छायाचित्रावरून स्वच्छ भारत अभियानात वसई विरार शहर महानगरपालिका नापास झाली आहे.

याबाबतीत स्थानिक नागरिकांशी विचारणा केल्यावर सांगितले की, कचरा उचलणारे येतात पण एका किंवा दुसºया विभागातून कचºयाची गाडी भरली की, परत येतच नाही. त्यामुळे कचºयाचे ढीग जमतात.कुठे आहेत कचºयाचे ढीग आणि घाणीचे साम्राज्यनालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन, गावराई पाडा, जीवन नगर, गौराई नाका, धानिवबाग, वाकणपाडा, नवजीवन, वालीव, धुमाळ नगर, सातीवली, भोयदापाडा तसेच विरार पूर्वेकडील चंदनसार, कातकरी पाडा, फुलपाडा, सहकार नगर कारिगल नगर, मोरेंगाव, अलकापुरी, वसई, नवजीवन, शांति नगर, रिचर्ड कम्पाउंड, गोलानी, खैरपाडा, फादरवाडी, गोखिवरे, वंसत नगरी, अग्रवाल, लिंक रोड, चिंचपाड़ा, वसई पश्चिमेकडील भाजी मार्केट, अंबाडी रोड, पापडी, वसई कोळीवाडा अश्या अनेक परिसरात कचºयाचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य आजही पडून आहे.मोठे मोठे गाजर दाखवून महानगरपालिका आल्यावर सुविधा मिळणार असे सांगितले पण प्रत्यक्षात उलटेच अनुभवायला मिळत आहे. या कचºयाच्या गाड्या कचरा उचलल्यावर दुर्गंधी आणि घाण वास पसरू नये म्हणून काही उपाययोजना करत नाही. - हेमंत रोखीत,संतप्त नागरिककेंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेला करोडो रुपयांचा निधी दिला पण यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कंत्राटदार आणि संबंधित महानगरपालिका अधिकारी करोडो रुपयांची हेराफेरी केली आहे.- राजकुमार चोरघे, आरोपकर्तेआरोपामध्ये काहीही तथ्य नाही. कोणीही यावे आणि चौकशी करावी. - महादेव जवादे, शहर अभियंता, महानगरपालिका