शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:07 IST

जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

पालघर : जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.पावसामुळे मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या किनारा हॉटेलसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. त्याचा परिणाम दृतगती महामार्गावरील वाहतुकीवर झाला. जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणूत अनेक गावांचा संपर्क तुटला. तारापूरसह परिसरात संततधार कायम आहे. डहाणूत अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. तलासरीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती आहे.वसई, विरार, नालासोपारा शहरातील सखल भागात पाणी साचले. पूर्वेतील तानसा नदीवरील पांधरतारा, मेढे, शिरवली हे तीन पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, जांबुलपाडा, थाल्याचा पाडा, आडणे, भिनार, मेढे, अंबोडे, वडघर, कळभोण आदी गावांसह अनेक आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ससुरपाडा येथे पाणी आल्याने या मार्गाला नदीचे स्वरूप आले.वसई पूर्वेच्या सातिवली गावात रविवारी रात्री संरक्षक भिंत कोसळून शेजारच्या चार घरांची पडझड झाली. यात तीन पुरु ष व एक महिला असे जखमी झाली. नूरजहाँ अन्वर शेख, दीपक काठायत, वसंतलाल खैरनार, आणि हाथ गुलामभाई अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार झाल्यावर या सर्व कुटुंबाना सातिवली आद्योगिक वसाहतीतील काही गाळ्यांमध्ये हलविण्यात आले आहे.पुरात वाहून मृत्यूपारोळ : विरार येथील स्कूल व्हॅनचे चालक प्रकाश बाळू पाटील (४४) यांना पुराच्या पाण्यात पडलेल्या विद्यार्थ्यांना वाचविताना जीव गमवावा लागला. सोमवारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना पोहोचवताना विरार नारिंगी भागामध्ये पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची व्हॅन कलंडली. त्यात दोन विद्यार्थी पडल्याने त्यांना वाचविताना पाटील वाहून गेले.