शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:07 IST

जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

पालघर : जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.पावसामुळे मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या किनारा हॉटेलसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. त्याचा परिणाम दृतगती महामार्गावरील वाहतुकीवर झाला. जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणूत अनेक गावांचा संपर्क तुटला. तारापूरसह परिसरात संततधार कायम आहे. डहाणूत अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. तलासरीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती आहे.वसई, विरार, नालासोपारा शहरातील सखल भागात पाणी साचले. पूर्वेतील तानसा नदीवरील पांधरतारा, मेढे, शिरवली हे तीन पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, जांबुलपाडा, थाल्याचा पाडा, आडणे, भिनार, मेढे, अंबोडे, वडघर, कळभोण आदी गावांसह अनेक आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ससुरपाडा येथे पाणी आल्याने या मार्गाला नदीचे स्वरूप आले.वसई पूर्वेच्या सातिवली गावात रविवारी रात्री संरक्षक भिंत कोसळून शेजारच्या चार घरांची पडझड झाली. यात तीन पुरु ष व एक महिला असे जखमी झाली. नूरजहाँ अन्वर शेख, दीपक काठायत, वसंतलाल खैरनार, आणि हाथ गुलामभाई अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार झाल्यावर या सर्व कुटुंबाना सातिवली आद्योगिक वसाहतीतील काही गाळ्यांमध्ये हलविण्यात आले आहे.पुरात वाहून मृत्यूपारोळ : विरार येथील स्कूल व्हॅनचे चालक प्रकाश बाळू पाटील (४४) यांना पुराच्या पाण्यात पडलेल्या विद्यार्थ्यांना वाचविताना जीव गमवावा लागला. सोमवारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना पोहोचवताना विरार नारिंगी भागामध्ये पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची व्हॅन कलंडली. त्यात दोन विद्यार्थी पडल्याने त्यांना वाचविताना पाटील वाहून गेले.