शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

सातपाटी बंदरातील गाळ काढला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:16 IST

सातपाटी खाडीत साचलेला गाळ काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, तत्पूर्वी बोर्डाच्या अधिकाºयांची आणि संबंधितांची एक बैठकही घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम

- हितेन नाईकपालघर : सातपाटी खाडीत साचलेला गाळ काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, तत्पूर्वी बोर्डाच्या अधिकाºयांची आणि संबंधितांची एक बैठकही घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सीईओ अतुल पाटणे यांनी दिली. ऐन हंगामात मासेमारीला जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहिसरच्या आ. मनीषा चौधरी यांनी पाटाणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.सातपाटी मच्छिमार बंदरातील नौकायन मार्गात साचलेला गाळ काढण्यासंदर्भातल्या समस्येविषयी मच्छिमार संस्थानी केलेल्या विनंतीनुसार ही बैठक शुक्रवारी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाºयांसमवेत मंत्रालयात झाली.गेल्या ८ ते १० वर्षापासून सातपाटीतील मच्छिमारांना गाळाच्या समस्येने ग्रासले असून मच्छीमार संस्थानी केलेल्या विनंतीनुसार जिल्हा नियोजन समितीने वेळोवेळी निधी उपलब्ध करून देऊनही आजपर्यंत योग्य पद्धतीने काम न झाल्याने गाळाच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. १ आॅगस्टला मासेमारीला सुरुवात झाली तरी नौका खाडीतील गाळा मुळे अडकून पडत असून मासेमारीला जाऊ शकलेल्या नाहीत. ५ दिवसांचा कालावधी या समस्येमुळे फुकट गेल्याने या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न मच्छिमार उपस्थित करू लागले आहेत.गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मच्छिमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या दोन्ही संस्थानी सुचविल्याप्रमाणे जेटी सभोवती चार ठिकाणी नौका येण्याजाण्याच्या मार्गातील गाळ तात्पुरता स्वरूपात युद्ध पातळीवर काढण्याच्या कामाला मंजूरी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे हे काम त्वरीत सुरू करण्याचे आदेश पाटणे यांनी संबंधित अधिकाºयांना आदेश दिले. या बैठकीस कॅ. खत्री मच्छिमार नेते नरेंद्र पाटील, राजेंद्र मेहेर, किशोर मेहेर, विलास मेहेर इ. मान्यवर उपस्थित होते. आता प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कधी होते? व मच्छीमारी निर्विघ्न कधी सुरू होते. याकडे मच्छीमार समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.- उच्चतम भरती शिवाय मासेमारी करून बंदरात परत येताना मच्छिमारांना बोटी रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून ५ ते ७ नॉटीकल मैलावर किंवा जेटीपासून १५० ते २०० मीटर दूर खाडीपात्रात नांगरून ठेवाव्या लागतात. खाडीपात्रात पावसाळ्यात येणाºया पूरजन्य स्थितीचा त्यांना सामना करावा लागतो. तसेच ३ ते ४ दिवस बोटी किनाºयावर लागत नसल्याने मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .