शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटी बंदरातील गाळ काढला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:16 IST

सातपाटी खाडीत साचलेला गाळ काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, तत्पूर्वी बोर्डाच्या अधिकाºयांची आणि संबंधितांची एक बैठकही घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम

- हितेन नाईकपालघर : सातपाटी खाडीत साचलेला गाळ काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, तत्पूर्वी बोर्डाच्या अधिकाºयांची आणि संबंधितांची एक बैठकही घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सीईओ अतुल पाटणे यांनी दिली. ऐन हंगामात मासेमारीला जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहिसरच्या आ. मनीषा चौधरी यांनी पाटाणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.सातपाटी मच्छिमार बंदरातील नौकायन मार्गात साचलेला गाळ काढण्यासंदर्भातल्या समस्येविषयी मच्छिमार संस्थानी केलेल्या विनंतीनुसार ही बैठक शुक्रवारी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाºयांसमवेत मंत्रालयात झाली.गेल्या ८ ते १० वर्षापासून सातपाटीतील मच्छिमारांना गाळाच्या समस्येने ग्रासले असून मच्छीमार संस्थानी केलेल्या विनंतीनुसार जिल्हा नियोजन समितीने वेळोवेळी निधी उपलब्ध करून देऊनही आजपर्यंत योग्य पद्धतीने काम न झाल्याने गाळाच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. १ आॅगस्टला मासेमारीला सुरुवात झाली तरी नौका खाडीतील गाळा मुळे अडकून पडत असून मासेमारीला जाऊ शकलेल्या नाहीत. ५ दिवसांचा कालावधी या समस्येमुळे फुकट गेल्याने या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न मच्छिमार उपस्थित करू लागले आहेत.गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मच्छिमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या दोन्ही संस्थानी सुचविल्याप्रमाणे जेटी सभोवती चार ठिकाणी नौका येण्याजाण्याच्या मार्गातील गाळ तात्पुरता स्वरूपात युद्ध पातळीवर काढण्याच्या कामाला मंजूरी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे हे काम त्वरीत सुरू करण्याचे आदेश पाटणे यांनी संबंधित अधिकाºयांना आदेश दिले. या बैठकीस कॅ. खत्री मच्छिमार नेते नरेंद्र पाटील, राजेंद्र मेहेर, किशोर मेहेर, विलास मेहेर इ. मान्यवर उपस्थित होते. आता प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कधी होते? व मच्छीमारी निर्विघ्न कधी सुरू होते. याकडे मच्छीमार समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.- उच्चतम भरती शिवाय मासेमारी करून बंदरात परत येताना मच्छिमारांना बोटी रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून ५ ते ७ नॉटीकल मैलावर किंवा जेटीपासून १५० ते २०० मीटर दूर खाडीपात्रात नांगरून ठेवाव्या लागतात. खाडीपात्रात पावसाळ्यात येणाºया पूरजन्य स्थितीचा त्यांना सामना करावा लागतो. तसेच ३ ते ४ दिवस बोटी किनाºयावर लागत नसल्याने मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .