शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

एमएमआरडीएची सुनावणी हाणून पाडली, चार तासांच्या सुनावणीला विरोध; ५ हजारांहून अधिक वसईकरांचे दीड तास आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 05:49 IST

प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले.

वसई : प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले. गावागावात सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आयुक्त आणि राज्यसरकारशी बोलून पुढील सुनावणी घेतली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी यावेळी जाहिर केले. मात्र, आंदोलनकर्ते निघून गेल्यानंतर अधिकाºयांनी पुन्हा सुनावणी घेण्याचा केलेला प्रयत्नही कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्याला वसईतून तीव्र विरोध असून सुमारे चाळीस हजार हरकती एकट्या वसईतून नोंदवण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियु्क्ती केली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता नालासोपारा येथील दामोदर हॉलमध्ये एमएमआरडीएच्या प्रमुख नियोजनकार उमा उड्ूमुनिल्ली आणि माजी नियोजनकार डी. के. पाठक यांनी सुनावनीला सुरुवात केली. मात्र, माजी सरपंच रॉबर्ट डाबरे यांनी त्रिसदस्यीय समितीपैकी फक्त एकच सदस्य हजर असल्याने सुनावणी बेकायदेशीर असल्याचे सांगून जोरदार विरोध केला. त्यानंतर जनतेचा विकास आराखडा मंचाचे निमंत्रक मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीला प्रत्येक हरकतदाराला बोलावलेच पाहिजे. एकाच दिवशी सुनावणी न घेता सलग सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी केली. तर पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक आणि जनआंदोलनाच्या डॉमणिका डाबरे यांनी शहरात सुनावणी घेण्यास विरोध करून गावागावातच सुनावणी झाली पाहिजे, असे सांगून ही सुनावणी रद्द करण्याची मागणी केली. ती सगळ्यांनी उचलून धरल्याने गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दीड तास गोंधळ सुरु होता. आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, प्रा. विन्सेंट परेरा, रॉबर्ट डाबरे, एव्हरेस्ट डाबरे, जनआंदोलनाचे मिलिंद खानोलकर आदींसह कार्यकर्त्यांनी थेट अधिकाºयांना घेराव घालून सुनावणी बंद पाडली. मात्र, एमएमआरडीएच्या उमा उडूमुनिल्ली यांनी गोंधळ सुरु असतानाही सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता. त्यामुळे वातावरण तप्त झाले होते. एमएमआरडीए चलो जाव, हमारे गाव मे हमारा राज या घोषणेने सभागृह दणाणून गेले होते. सभागृह गर्दीने ओसंडून वाहत असताना खाली देखिल प्रचंड संख्येने लोक जमा झाले होते. लोकांचा संताप अनावर झाल्याने वातावरण तंग होऊ लागले होते. त्यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हस्तक्षेप केला. सुनावणीस लोकांची हरकत नाही. मात्र, लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून होत असलेली सुनावणी मान्य नाही. विकासाला वसईकरांचा विरोध नाही. पण, लोकांना उध्वस्त करून विकास होत असेल तर तो मान्य नाही. वसईकरांनी पोर्तुगीजांना हाकलून दिले होते हा इतिहास आहे. म्हणून सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न कदापीही सहन केला जाणार नाही. त्यासाठी गावागावात सुनावणी घ्या. गावकरी सहकार्य करतील असे आवाहन फा. दिब्रिटो यांनी अधिकाºयांना केले. सभागृहातील संताप लक्षात घेऊन पाठक यांनी सुनावणी स्थगित केली.हाही प्रयत्न फसलासुनावणी स्थगित झाल्याने कार्यकर्ते आणि हजारो लोक माघारी वळले. पण, एका तासातच एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी सुनावणीचे सोपस्कार पार पाडण्यास सुरुवात केली. याची कुणकुण लागताच सुनील डिसिल्वा, रॉबर्ट लोपीस, डेव्हीट मच्याडो यांच्यासह जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात धाव घेऊन हाही प्रयत्न हाणून पाडला. 

टॅग्स :Governmentसरकार