शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

एमएमआरडीएची सुनावणी हाणून पाडली, चार तासांच्या सुनावणीला विरोध; ५ हजारांहून अधिक वसईकरांचे दीड तास आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 05:49 IST

प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले.

वसई : प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले. गावागावात सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आयुक्त आणि राज्यसरकारशी बोलून पुढील सुनावणी घेतली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी यावेळी जाहिर केले. मात्र, आंदोलनकर्ते निघून गेल्यानंतर अधिकाºयांनी पुन्हा सुनावणी घेण्याचा केलेला प्रयत्नही कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्याला वसईतून तीव्र विरोध असून सुमारे चाळीस हजार हरकती एकट्या वसईतून नोंदवण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियु्क्ती केली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता नालासोपारा येथील दामोदर हॉलमध्ये एमएमआरडीएच्या प्रमुख नियोजनकार उमा उड्ूमुनिल्ली आणि माजी नियोजनकार डी. के. पाठक यांनी सुनावनीला सुरुवात केली. मात्र, माजी सरपंच रॉबर्ट डाबरे यांनी त्रिसदस्यीय समितीपैकी फक्त एकच सदस्य हजर असल्याने सुनावणी बेकायदेशीर असल्याचे सांगून जोरदार विरोध केला. त्यानंतर जनतेचा विकास आराखडा मंचाचे निमंत्रक मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीला प्रत्येक हरकतदाराला बोलावलेच पाहिजे. एकाच दिवशी सुनावणी न घेता सलग सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी केली. तर पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक आणि जनआंदोलनाच्या डॉमणिका डाबरे यांनी शहरात सुनावणी घेण्यास विरोध करून गावागावातच सुनावणी झाली पाहिजे, असे सांगून ही सुनावणी रद्द करण्याची मागणी केली. ती सगळ्यांनी उचलून धरल्याने गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दीड तास गोंधळ सुरु होता. आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, प्रा. विन्सेंट परेरा, रॉबर्ट डाबरे, एव्हरेस्ट डाबरे, जनआंदोलनाचे मिलिंद खानोलकर आदींसह कार्यकर्त्यांनी थेट अधिकाºयांना घेराव घालून सुनावणी बंद पाडली. मात्र, एमएमआरडीएच्या उमा उडूमुनिल्ली यांनी गोंधळ सुरु असतानाही सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता. त्यामुळे वातावरण तप्त झाले होते. एमएमआरडीए चलो जाव, हमारे गाव मे हमारा राज या घोषणेने सभागृह दणाणून गेले होते. सभागृह गर्दीने ओसंडून वाहत असताना खाली देखिल प्रचंड संख्येने लोक जमा झाले होते. लोकांचा संताप अनावर झाल्याने वातावरण तंग होऊ लागले होते. त्यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हस्तक्षेप केला. सुनावणीस लोकांची हरकत नाही. मात्र, लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून होत असलेली सुनावणी मान्य नाही. विकासाला वसईकरांचा विरोध नाही. पण, लोकांना उध्वस्त करून विकास होत असेल तर तो मान्य नाही. वसईकरांनी पोर्तुगीजांना हाकलून दिले होते हा इतिहास आहे. म्हणून सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न कदापीही सहन केला जाणार नाही. त्यासाठी गावागावात सुनावणी घ्या. गावकरी सहकार्य करतील असे आवाहन फा. दिब्रिटो यांनी अधिकाºयांना केले. सभागृहातील संताप लक्षात घेऊन पाठक यांनी सुनावणी स्थगित केली.हाही प्रयत्न फसलासुनावणी स्थगित झाल्याने कार्यकर्ते आणि हजारो लोक माघारी वळले. पण, एका तासातच एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी सुनावणीचे सोपस्कार पार पाडण्यास सुरुवात केली. याची कुणकुण लागताच सुनील डिसिल्वा, रॉबर्ट लोपीस, डेव्हीट मच्याडो यांच्यासह जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात धाव घेऊन हाही प्रयत्न हाणून पाडला. 

टॅग्स :Governmentसरकार