शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

एमएमआरडीएने धरले गावकऱ्यांना वेठीस

By admin | Updated: June 19, 2017 03:43 IST

एमएमआरडीएने प्रारुप आराखड्याविरोधात हरकती नोंदवलेल्या गावकऱ्यांची सुनावणी सुरु केली आहे. मात्र, ती साठी एकाच दिवशी दोन हजार गावकऱ्यांना

शशी करपे। लोकमत न्यूज नेटवर्कवसई : एमएमआरडीएने प्रारुप आराखड्याविरोधात हरकती नोंदवलेल्या गावकऱ्यांची सुनावणी सुरु केली आहे. मात्र, ती साठी एकाच दिवशी दोन हजार गावकऱ्यांना वांद्रे येथील कार्यालयाबाहेर चार तास ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले असून यापुढील सुनावणी गावागावात जाऊन घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.पालघर, ठाणे, रायगड जिल्हयासाठी एमएमआरडीएने प्रारुप आराखडा तयार केला आहे. मात्र, या आराखड्यामुळे भूमीपुत्र देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करून गावकऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. त्याच्या विरोधात वसईत विविध संघटनांनी मोठे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे एकट्या वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातून तब्बल साठ हजारांहून अधिक हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यावर आता एमएमआरडीएने सुनावणी सुरु केली आहे. मात्र, शनिवारी घेण्यात आलेल्या सुनावणीसाठी दोन हजार गावकऱ्यांना वांद्रे येथील कार्यालयात बोलावण्यात आले होते. गावकऱ्यांना चार तास ताटकळत उभे ठेवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.त्यात काही वृद्ध, आजारी, महिला होत्या. त्यांना बसण्याची कोणतीही सुविधा नसल्याने उन्ह्यात उभे रहावे लागले होते. कार्यालयात बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने बहुतेकांना उपाशी रहावे लागले. इतकेच नाही तर गावकऱ्यांना कार्यालयातील प्रसाधनगृहात जाण्यासही मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे महिलांचे हाल झाल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी केला आहे. एवढे करूनही सुनावणीही घेण्यात आली नाही. काही सदस्यांना आतमध्ये बोलावून जाहिर सुनावणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात वैयक्तिक सुनावणीचा हक्क असतांना एमएमआरडीएने जाहिर सुनावणीचा प्रयत्न करून विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावकऱ्यांची गैरसोय टाळावी व त्यांना आपले म्हणणे लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही दडपणाशिवाय मांडण्यात यावे याकरता ही सुनावणी गावांमध्येच झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली होती. ही मागणी दुर्लक्षित करून गावकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, सिडकोने ज्यापद्धतीने वसईत गावागावात जाऊन सुनावणी घेतली. त्याचपद्धतीने एमएमआरडीएनेही सुनावणी घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा या दडपशाहीविरोधात संतप्त गावकरी पुन्हा आंदोलन करतील असा गंभीर इशारा एमएमआरडीएला देण्यात आला आहे.