शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएने धरले गावकऱ्यांना वेठीस

By admin | Updated: June 19, 2017 03:43 IST

एमएमआरडीएने प्रारुप आराखड्याविरोधात हरकती नोंदवलेल्या गावकऱ्यांची सुनावणी सुरु केली आहे. मात्र, ती साठी एकाच दिवशी दोन हजार गावकऱ्यांना

शशी करपे। लोकमत न्यूज नेटवर्कवसई : एमएमआरडीएने प्रारुप आराखड्याविरोधात हरकती नोंदवलेल्या गावकऱ्यांची सुनावणी सुरु केली आहे. मात्र, ती साठी एकाच दिवशी दोन हजार गावकऱ्यांना वांद्रे येथील कार्यालयाबाहेर चार तास ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले असून यापुढील सुनावणी गावागावात जाऊन घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.पालघर, ठाणे, रायगड जिल्हयासाठी एमएमआरडीएने प्रारुप आराखडा तयार केला आहे. मात्र, या आराखड्यामुळे भूमीपुत्र देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करून गावकऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. त्याच्या विरोधात वसईत विविध संघटनांनी मोठे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे एकट्या वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातून तब्बल साठ हजारांहून अधिक हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यावर आता एमएमआरडीएने सुनावणी सुरु केली आहे. मात्र, शनिवारी घेण्यात आलेल्या सुनावणीसाठी दोन हजार गावकऱ्यांना वांद्रे येथील कार्यालयात बोलावण्यात आले होते. गावकऱ्यांना चार तास ताटकळत उभे ठेवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.त्यात काही वृद्ध, आजारी, महिला होत्या. त्यांना बसण्याची कोणतीही सुविधा नसल्याने उन्ह्यात उभे रहावे लागले होते. कार्यालयात बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने बहुतेकांना उपाशी रहावे लागले. इतकेच नाही तर गावकऱ्यांना कार्यालयातील प्रसाधनगृहात जाण्यासही मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे महिलांचे हाल झाल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी केला आहे. एवढे करूनही सुनावणीही घेण्यात आली नाही. काही सदस्यांना आतमध्ये बोलावून जाहिर सुनावणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात वैयक्तिक सुनावणीचा हक्क असतांना एमएमआरडीएने जाहिर सुनावणीचा प्रयत्न करून विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावकऱ्यांची गैरसोय टाळावी व त्यांना आपले म्हणणे लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही दडपणाशिवाय मांडण्यात यावे याकरता ही सुनावणी गावांमध्येच झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली होती. ही मागणी दुर्लक्षित करून गावकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, सिडकोने ज्यापद्धतीने वसईत गावागावात जाऊन सुनावणी घेतली. त्याचपद्धतीने एमएमआरडीएनेही सुनावणी घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा या दडपशाहीविरोधात संतप्त गावकरी पुन्हा आंदोलन करतील असा गंभीर इशारा एमएमआरडीएला देण्यात आला आहे.