शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या मुजोरीने संताप

By admin | Updated: March 28, 2017 05:06 IST

हजारो रुपयांचे वीज बिल घरगुती ग्राहकांना आकारल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी नोटीस पाठविली जाते

रवींद्र साळवे /मोखाडाहजारो रुपयांचे वीज बिल घरगुती ग्राहकांना आकारल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी नोटीस पाठविली जाते. तसेच त्यांना संधी दिली जाते. मात्र, मोखाड्यातील धामणशेत येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थेट वीज मीटर काढून नेल्याने संतापाचे वातावरण आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता या अधिकाऱ्यांना मीटर काढून नेण्याचा अधिकार दिला कुणी? असा सवाल विचारला जात आहे.धामणशेत येथील तीस ते पस्तीस मीटर खोडाळा महावितरणचे अधिकारी पी. टी. वाघ यांनी काढून नेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मुळात तेवढी वीज वापरलीच नसल्याने अंदाजे झालेली बील आकारणी आमच्यावर अन्याय करणारी असल्याची त्यांची तक्रार आहे. तिची दखल न घेता मीटर काढून नेल्याने ऐन परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यापासून जव्हार, विक्रमगडसह मोखाड्यातील मीटर धारकांना वीजबिल भरून सुद्धा पुन्हा पुढच्या महिन्यात हजारोंच्या वाढीव बिलाची आकारणी होत असल्याने ग्राहकांमध्ये फसवणूक होत असल्याची भावना आहे. या प्रकरणी संबधीत एजन्सीवर फौजदारी कारवाई सुद्धा झाली आहे. यामुळे हे प्रकरण न्यायालयात आहे. तरी सुद्धा भरमसाठ आकारणी करून वसुली केली जात आहे.यात महत्वाची बाब म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेने वीज बिल भरणा बंद केल्यानंतर संबधित एजन्सीकडे वीज बिल भरले जावे, असे फलक सुद्धा या कार्यालयात लावले होते. यानंतर दोन महिन्याचा तालुक्याचा २४ लाखा पेक्षा अधिक भरणा कार्यालयाला प्राप्त झाला नसतांना या कार्यलयाने कोणतीच कार्यवाही केली नाही आणि यात ग्राहकांची फसवणूक झाली आहे परंतु महावितरण ग्राहकांनाच दोषी ठरवित असून याचा भुर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागत आहेमहावितरणाच्या या पाठराख्या भूमिकेमुळे खाजगी कंपन्यांनी वीज बिल वसुलीच्या नावाखाली लाखो रूपयांचा भ्रष्टचार केला आहे. आता या रकमेची भरपाई करण्यासाठी महावितरण कोणतेही रिडींग न घेता वाढीव वीजबिल आकारून ग्राहकांची मोठी लूट करीत आहेत. त्यातच वाढीव मीटर आकारलेल्या ग्राहकांना तुम्ही बिल भरत नसल्याचे कारण सांगून मीटर काढून नेण्याचा मुजोर अधिकाऱ्यांनी सपाटा लावला असल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याबाबत वेळीच कारवाई न झाल्यास महावितरणविरोधात असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आधीच अघोषित भारनियमन, विजेच्या दाबात चढउतार होणे यामुळे ग्राहक त्रस्त झालेले आहेत. त्यात ही नवी भर पडली आहे.