शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मासवणे, बावघरमधील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 23:43 IST

विविध भाजीपाल्यांचे उत्पादन : जि.प.च्या सेस फंडातून पाणी योजना, पूर्वी पावसाळ्यातच घेतले जायचे पीक

जनार्दन भेरे 

भातसानगर : केवळ पावसाळा वगळल्यास कधीही पाण्याखाली न येणारी जमीन पाण्याखाली आणून अनेक भाजीपाल्यांचे उत्पादन मासवणे व बावघर येथे घेतले जात आहे. यामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. शहापूर तालुक्यातील मासवणे व बावघर ही गावे मागासलेलीच आहेत. केवळ पावसाळ्यात एकमेव पीक घ्यायचे, त्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही वा व्यवसाय नाही. मात्र, गावाची एकी असेल तर काहीच अशक्य नाही. मग, एकच गाव नाही तर दोन गावांतील शेतकरी एकत्र आले आणि दोन किलोमीटर अंतरावरून वाहत असलेल्या काळू नदीच्या पाण्याचा वापर करायचे ठरले.

हे सगळे जुळून आले तरी पैशांचे सोंग काही आणता येत नाही. मग, या दोन्ही गावांतील २३ शेतकºयांनी एकत्र येऊन आपली कैफियत पंचायत समितीचे कृषी अधिकारी विलास झुंजारराव यांना सांगितली. यामध्ये एकनाथ तिवरे,गोविंद तिवरे, लहू मुकणे, लक्ष्मण मुकणे, मल्हारी तिवरे यांचा समावेश होता. विस्तार अधिकारी सचिन गंगावणे यांनी जोड देत या सर्वांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक योजना तयार करून या गावांसाठी ३६४ पीव्हीसी पाइप, साडेसात हॉर्सपॉवरची मोटार अशी दोन लाख रु पयांची योजना मंजूर करून घेतली. या गावातील शेतकºयांनी त्याचा फायदा घेऊन ही पाइपलाइन आपल्या गावात आणली. तुडुंब भरलेल्या काळू नदीच्या पाण्याचा योग्य वापर शेतकºयांनी करून आपल्या शेतीत अनेक प्रकारचा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. आज यामुळे शेतकºयांचे जीवनमान तर बदलले, मात्र पाणीटंचाईचा प्रश्नही सुटल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.शिवाय, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्याने भाजीपाला, शेतीस उपयुक्त ठरत आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीचे उपसभापती पद्माकर वेखंडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश वीर, प्रकाश भांगरथ यांनी भेट दिली.या दोन गावांतील शेतकºयांना एकत्र करून सर्वांसाठी पाइप व मोटार मंजूर करून ही योजना उत्तम रीतीने पूर्णत्वास आणून गावांना त्याचा फायदा झाला, याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. अशा आणखी दोन ते तीन योजना करण्याचा आमचा मानस आहे.- विलास झुंजारराव, कृषी अधिकारीआजपर्यंत पावसाळ्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी नव्हते. मात्र, या योजनेमुळे आम्हाला आनंद तर झाला आहेच, पण आम्ही मोठ्या प्रमाणावर भाजीपालाही लावला आहे व उत्पादनही घेणे सुरू केले आहे. आम्ही नक्कीच या संधीचे सोने करू.- इंदूबाई वाळकू, शेतकरी