शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

मासवणे, बावघरमधील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 23:43 IST

विविध भाजीपाल्यांचे उत्पादन : जि.प.च्या सेस फंडातून पाणी योजना, पूर्वी पावसाळ्यातच घेतले जायचे पीक

जनार्दन भेरे 

भातसानगर : केवळ पावसाळा वगळल्यास कधीही पाण्याखाली न येणारी जमीन पाण्याखाली आणून अनेक भाजीपाल्यांचे उत्पादन मासवणे व बावघर येथे घेतले जात आहे. यामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. शहापूर तालुक्यातील मासवणे व बावघर ही गावे मागासलेलीच आहेत. केवळ पावसाळ्यात एकमेव पीक घ्यायचे, त्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही वा व्यवसाय नाही. मात्र, गावाची एकी असेल तर काहीच अशक्य नाही. मग, एकच गाव नाही तर दोन गावांतील शेतकरी एकत्र आले आणि दोन किलोमीटर अंतरावरून वाहत असलेल्या काळू नदीच्या पाण्याचा वापर करायचे ठरले.

हे सगळे जुळून आले तरी पैशांचे सोंग काही आणता येत नाही. मग, या दोन्ही गावांतील २३ शेतकºयांनी एकत्र येऊन आपली कैफियत पंचायत समितीचे कृषी अधिकारी विलास झुंजारराव यांना सांगितली. यामध्ये एकनाथ तिवरे,गोविंद तिवरे, लहू मुकणे, लक्ष्मण मुकणे, मल्हारी तिवरे यांचा समावेश होता. विस्तार अधिकारी सचिन गंगावणे यांनी जोड देत या सर्वांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक योजना तयार करून या गावांसाठी ३६४ पीव्हीसी पाइप, साडेसात हॉर्सपॉवरची मोटार अशी दोन लाख रु पयांची योजना मंजूर करून घेतली. या गावातील शेतकºयांनी त्याचा फायदा घेऊन ही पाइपलाइन आपल्या गावात आणली. तुडुंब भरलेल्या काळू नदीच्या पाण्याचा योग्य वापर शेतकºयांनी करून आपल्या शेतीत अनेक प्रकारचा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. आज यामुळे शेतकºयांचे जीवनमान तर बदलले, मात्र पाणीटंचाईचा प्रश्नही सुटल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.शिवाय, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्याने भाजीपाला, शेतीस उपयुक्त ठरत आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीचे उपसभापती पद्माकर वेखंडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश वीर, प्रकाश भांगरथ यांनी भेट दिली.या दोन गावांतील शेतकºयांना एकत्र करून सर्वांसाठी पाइप व मोटार मंजूर करून ही योजना उत्तम रीतीने पूर्णत्वास आणून गावांना त्याचा फायदा झाला, याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. अशा आणखी दोन ते तीन योजना करण्याचा आमचा मानस आहे.- विलास झुंजारराव, कृषी अधिकारीआजपर्यंत पावसाळ्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी नव्हते. मात्र, या योजनेमुळे आम्हाला आनंद तर झाला आहेच, पण आम्ही मोठ्या प्रमाणावर भाजीपालाही लावला आहे व उत्पादनही घेणे सुरू केले आहे. आम्ही नक्कीच या संधीचे सोने करू.- इंदूबाई वाळकू, शेतकरी