शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

मासवणे, बावघरमधील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 23:43 IST

विविध भाजीपाल्यांचे उत्पादन : जि.प.च्या सेस फंडातून पाणी योजना, पूर्वी पावसाळ्यातच घेतले जायचे पीक

जनार्दन भेरे 

भातसानगर : केवळ पावसाळा वगळल्यास कधीही पाण्याखाली न येणारी जमीन पाण्याखाली आणून अनेक भाजीपाल्यांचे उत्पादन मासवणे व बावघर येथे घेतले जात आहे. यामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. शहापूर तालुक्यातील मासवणे व बावघर ही गावे मागासलेलीच आहेत. केवळ पावसाळ्यात एकमेव पीक घ्यायचे, त्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही वा व्यवसाय नाही. मात्र, गावाची एकी असेल तर काहीच अशक्य नाही. मग, एकच गाव नाही तर दोन गावांतील शेतकरी एकत्र आले आणि दोन किलोमीटर अंतरावरून वाहत असलेल्या काळू नदीच्या पाण्याचा वापर करायचे ठरले.

हे सगळे जुळून आले तरी पैशांचे सोंग काही आणता येत नाही. मग, या दोन्ही गावांतील २३ शेतकºयांनी एकत्र येऊन आपली कैफियत पंचायत समितीचे कृषी अधिकारी विलास झुंजारराव यांना सांगितली. यामध्ये एकनाथ तिवरे,गोविंद तिवरे, लहू मुकणे, लक्ष्मण मुकणे, मल्हारी तिवरे यांचा समावेश होता. विस्तार अधिकारी सचिन गंगावणे यांनी जोड देत या सर्वांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक योजना तयार करून या गावांसाठी ३६४ पीव्हीसी पाइप, साडेसात हॉर्सपॉवरची मोटार अशी दोन लाख रु पयांची योजना मंजूर करून घेतली. या गावातील शेतकºयांनी त्याचा फायदा घेऊन ही पाइपलाइन आपल्या गावात आणली. तुडुंब भरलेल्या काळू नदीच्या पाण्याचा योग्य वापर शेतकºयांनी करून आपल्या शेतीत अनेक प्रकारचा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. आज यामुळे शेतकºयांचे जीवनमान तर बदलले, मात्र पाणीटंचाईचा प्रश्नही सुटल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.शिवाय, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्याने भाजीपाला, शेतीस उपयुक्त ठरत आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीचे उपसभापती पद्माकर वेखंडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश वीर, प्रकाश भांगरथ यांनी भेट दिली.या दोन गावांतील शेतकºयांना एकत्र करून सर्वांसाठी पाइप व मोटार मंजूर करून ही योजना उत्तम रीतीने पूर्णत्वास आणून गावांना त्याचा फायदा झाला, याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. अशा आणखी दोन ते तीन योजना करण्याचा आमचा मानस आहे.- विलास झुंजारराव, कृषी अधिकारीआजपर्यंत पावसाळ्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी नव्हते. मात्र, या योजनेमुळे आम्हाला आनंद तर झाला आहेच, पण आम्ही मोठ्या प्रमाणावर भाजीपालाही लावला आहे व उत्पादनही घेणे सुरू केले आहे. आम्ही नक्कीच या संधीचे सोने करू.- इंदूबाई वाळकू, शेतकरी