शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

डहाणूच्या किनाऱ्यावर समुद्री कासव

By admin | Updated: March 18, 2017 03:03 IST

तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात.

डहाणू : तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात. दरम्यान एका बाजूने हा आकडा वाढत जाणारा असून विणीच्या हंगामात खोऱ्याने अंडी घालणारी परंपरा खंडीत होत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. डहाणू तालुक्याला सुमारे ३५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा भाग जैवविविधतेने समृद्ध असल्याने डॉल्फिन, समुद्री कासव तसेच माशांच्या विविध प्रजाती माठ्या प्रमाणात आहेत. प्रतिवर्षी किमान ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेत आढळणाऱ्या या कासवांची संख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. मासे पकडण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक पद्धतीची जाळी हे त्यामागील कारण असले. तरीही किनाऱ्यालगत सुरू तसेच कांदळवनांचे घटते प्रमाण, थेट समुद्रात वाहनं उतरवून होणारा अवैध रेती उपसा, खाजण क्षेत्रावर भराव तसेच उच्चतम भरती रेषेच्या मर्यादेचे खुल्लेआम उल्लंघन करून बांधकामाचे पेव फुटणे ही त्यामागील प्रमुख कारणं आहेत. वन, महसूल, खारभूमी, मेरीटाईम आणि स्थानिक स्वराज्य संस्था आदि प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे ऱ्हासाचे प्रमाण वाढले आहे. देशात पर्यावरणदृष्ट्या आठ क्षेत्र संरिक्षत म्हणून घोषीत असून त्यामध्ये डहाणूचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने २००२ साली डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करून निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यामुळे पर्यावरण विरोधक कृत्यांवर अंकुश आला असून हा ठेवा अबाधित राखण्यास मदत झाली आहे. मात्र काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली १९९१ चे नोटिफिकेशन हटवण्याची मागणी येथील काही गटाकडून केली जात असून लोकप्रतिनिधींनीही शासन दरबारी त्याची री ओढली आहे. डहाणूचे पर्यावरण शाबूत राहण्यात प्राधिकरणाचा महत्वाचा वाटा आहे. धनाढ्य मंडळी प्रशासनावर राजकीय दबाब आणून नोटोफिकेशन हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करित आहेत. डहाणूचा समतोल विकास हा पर्यावरणाचा आधारिबंदु असल्याने पर्यावरणाशी तडजोड करणारा कोणताही निर्णय विनाशाची नांदी ठरेल.- प्रवीण ना. दवणे, पर्यावरण अभ्यासक