शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:35 IST

जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ

जव्हार : जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ वाहने घसरून शुक्रवारपासून ते सोमवार या काळात चार ते पाच अपघात घडले आहेत. पाऊस सुरु असला कि, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचा ताबा सुटून घडलेल्या अपघातांमध्ये २७ जण जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.सततच्या अपघाताने गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कासटवाडी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मे २०१८ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र ते करतांना ठेकेदाराने आॅइलमिश्रीत डांबर वापरल्यामुळे रस्ता निसरडा होवून, वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत.एका अपघातात चालकाचा जीप वरील ताबा सुटून तिने रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या महिलेला उडविले. तर त्याच ठिकाणी शनिवारी झाडावर आदळून बसचा अपघात झाला. रविवारी तिसºया दिवशी वाडा जव्हार या बसने उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिली तर उभ्या असलेल्या बसला मागून येऊन पिकअप धडकली. सोमवारी संध्याकाळी ट्रक आणि बस यांच्यात समोरासमोर धडक झाली आणि मागून येणाºया ट्रकचा ताबा सुटल्यामुळे ट्रकही त्याच ठिकाणी झाडाला जाऊन आदळली, मात्र यात बस मधील प्रवासी सुदैवाने जखमी झाले नाहीत. तर पाऊस सुरु असतांनाही बाईकस्वरांचे लहानमोठे अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.कासटवाडी गावाजवळ स्पीड ब्रेकर नाही. त्यातच रस्ता सरळ असल्यामुळे येणारी वाहने वेगाने येतात. त्यामुळे रोजच अपघात घडताहेत. बांधकाम विभागाने येथे स्पीड ब्रेकर निर्माण करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. याच ठिकाणी अगोदरच वन विभागाचा तपासणी नाका आहे. मात्र या नाक्यावर वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी राहत नाही. जर का वन विभागाचा तपासणी नाका सुरु असता, तर वाहनांवर थोडेफार नियंत्रण असते, असेही गावक-यांकडून सांगण्यात येते. तसेच या ठिकाणी पोलीसचौकी असावी त्यामुळे तिच्या दराºयाने वाहकावर नियंत्रण राहील.मार्च २०१८ ला हा रस्ता राज्य महामार्गकडे हस्तांतरीत करण्यात आला तरीही सा. बां. विभागाने ठेकेदाराला मे २०१८ मध्ये रस्ता तयार करण्यास परवानगी दिली मात्र ठेकेदाराने घाईघाईत थातूर मातूर काम करून रस्त्यावर वर आॅइल व केरोसीन मिश्रित माल वापरून रस्ता तयार केला आहे, यात शाखा अभियंता व बांधकाम विभागाचे अन्य अधिकारीही सामिल आसून यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.या रस्त्याचा काही भाग यंदा तयार करण्यात आला आहे, मात्र रस्ता पावसामुळे निसरडा झाला असून वाहन चालकाने या भागात वाहने कमी गतीने चालवले तर अपघात घडणार नाहीत असा सल्ला शाखा अभियंता डी. डी. पाटील यांनी दिला. जर रास्ता राज्य महामार्ग कडे वर्ग केला होता तर ठेकेदाराला या वर्षात काम का करू दिले? काम सुरू असतांना राज्य महामार्गचे अधिकारी व कर्मचाºयांनी हे बोगस काम का करू दिले ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांची उत्तरे मात्र कोणाकडेच नाहीत. अशी अवस्था आहे.