शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:35 IST

जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ

जव्हार : जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ वाहने घसरून शुक्रवारपासून ते सोमवार या काळात चार ते पाच अपघात घडले आहेत. पाऊस सुरु असला कि, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचा ताबा सुटून घडलेल्या अपघातांमध्ये २७ जण जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.सततच्या अपघाताने गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कासटवाडी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मे २०१८ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र ते करतांना ठेकेदाराने आॅइलमिश्रीत डांबर वापरल्यामुळे रस्ता निसरडा होवून, वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत.एका अपघातात चालकाचा जीप वरील ताबा सुटून तिने रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या महिलेला उडविले. तर त्याच ठिकाणी शनिवारी झाडावर आदळून बसचा अपघात झाला. रविवारी तिसºया दिवशी वाडा जव्हार या बसने उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिली तर उभ्या असलेल्या बसला मागून येऊन पिकअप धडकली. सोमवारी संध्याकाळी ट्रक आणि बस यांच्यात समोरासमोर धडक झाली आणि मागून येणाºया ट्रकचा ताबा सुटल्यामुळे ट्रकही त्याच ठिकाणी झाडाला जाऊन आदळली, मात्र यात बस मधील प्रवासी सुदैवाने जखमी झाले नाहीत. तर पाऊस सुरु असतांनाही बाईकस्वरांचे लहानमोठे अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.कासटवाडी गावाजवळ स्पीड ब्रेकर नाही. त्यातच रस्ता सरळ असल्यामुळे येणारी वाहने वेगाने येतात. त्यामुळे रोजच अपघात घडताहेत. बांधकाम विभागाने येथे स्पीड ब्रेकर निर्माण करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. याच ठिकाणी अगोदरच वन विभागाचा तपासणी नाका आहे. मात्र या नाक्यावर वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी राहत नाही. जर का वन विभागाचा तपासणी नाका सुरु असता, तर वाहनांवर थोडेफार नियंत्रण असते, असेही गावक-यांकडून सांगण्यात येते. तसेच या ठिकाणी पोलीसचौकी असावी त्यामुळे तिच्या दराºयाने वाहकावर नियंत्रण राहील.मार्च २०१८ ला हा रस्ता राज्य महामार्गकडे हस्तांतरीत करण्यात आला तरीही सा. बां. विभागाने ठेकेदाराला मे २०१८ मध्ये रस्ता तयार करण्यास परवानगी दिली मात्र ठेकेदाराने घाईघाईत थातूर मातूर काम करून रस्त्यावर वर आॅइल व केरोसीन मिश्रित माल वापरून रस्ता तयार केला आहे, यात शाखा अभियंता व बांधकाम विभागाचे अन्य अधिकारीही सामिल आसून यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.या रस्त्याचा काही भाग यंदा तयार करण्यात आला आहे, मात्र रस्ता पावसामुळे निसरडा झाला असून वाहन चालकाने या भागात वाहने कमी गतीने चालवले तर अपघात घडणार नाहीत असा सल्ला शाखा अभियंता डी. डी. पाटील यांनी दिला. जर रास्ता राज्य महामार्ग कडे वर्ग केला होता तर ठेकेदाराला या वर्षात काम का करू दिले? काम सुरू असतांना राज्य महामार्गचे अधिकारी व कर्मचाºयांनी हे बोगस काम का करू दिले ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांची उत्तरे मात्र कोणाकडेच नाहीत. अशी अवस्था आहे.