शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

सूर्या कालव्याची १५ वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:30 IST

पाण्याची गळती : परिसरातील शेतीला होतो अपुरा पाणीपुरवठा

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्याअंतर्गत शेताला पाणीपुरवठा केला जातो. मात्र १५ वर्षांपासून शेताला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने शेताला अपुरा पाणीपुरवठा होतो. परिणामी, कालव्याच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीवर परिणाम होणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर जमीन सूर्या कालवाअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाली, खनिव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटने, चारोटी, कासा, सारणी, निकावली, ऊर्से, रानशेत, साखरे, गोवणे, दाभोण,  तर पालघर तालुक्यातील सोमटा, बऱ्हाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, अकेगव्हाण, रावते, शिगाव, कुकडे, महागाव, गारगाव,  गुंदले, वाळवे अशा सुमारे  ९० ते १०० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातून पाणीगळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर व  दगडांनी पिचिंग केले आहेत. आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिकचे अस्तरीकरण केले, मात्र नंतर बऱ्याच काळापर्यंत दुरुस्ती न केल्याने अनेक ठिकाणी कालव्यांचे बांधकाम आणि प्लास्टर पाण्यात वाहून गेले आहे.

काही ठिकाणी तर कालव्यांचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले  असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यांतून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाऱ्या काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बऱ्याच शेतकऱ्यांनी भातशेती करणे बंद केले आहे, तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाऱ्या शेतालादेखील योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात. तसेच कालव्यातून दुरुस्तीअभावी पाण्याची गळती होत असल्याने मुख्य कालव्याच्या टोकाकडील गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पिकांवर परिणाम होत असल्याचेही शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांकडून वेळोवेळी पाणीपट्टी (बिल) भरूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. - सुनील जाधव, शेतकरी.