शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

सूर्या कालव्याची १५ वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:30 IST

पाण्याची गळती : परिसरातील शेतीला होतो अपुरा पाणीपुरवठा

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्याअंतर्गत शेताला पाणीपुरवठा केला जातो. मात्र १५ वर्षांपासून शेताला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने शेताला अपुरा पाणीपुरवठा होतो. परिणामी, कालव्याच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीवर परिणाम होणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर जमीन सूर्या कालवाअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाली, खनिव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटने, चारोटी, कासा, सारणी, निकावली, ऊर्से, रानशेत, साखरे, गोवणे, दाभोण,  तर पालघर तालुक्यातील सोमटा, बऱ्हाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, अकेगव्हाण, रावते, शिगाव, कुकडे, महागाव, गारगाव,  गुंदले, वाळवे अशा सुमारे  ९० ते १०० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातून पाणीगळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर व  दगडांनी पिचिंग केले आहेत. आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिकचे अस्तरीकरण केले, मात्र नंतर बऱ्याच काळापर्यंत दुरुस्ती न केल्याने अनेक ठिकाणी कालव्यांचे बांधकाम आणि प्लास्टर पाण्यात वाहून गेले आहे.

काही ठिकाणी तर कालव्यांचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले  असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यांतून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाऱ्या काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बऱ्याच शेतकऱ्यांनी भातशेती करणे बंद केले आहे, तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाऱ्या शेतालादेखील योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात. तसेच कालव्यातून दुरुस्तीअभावी पाण्याची गळती होत असल्याने मुख्य कालव्याच्या टोकाकडील गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पिकांवर परिणाम होत असल्याचेही शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांकडून वेळोवेळी पाणीपट्टी (बिल) भरूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. - सुनील जाधव, शेतकरी.