शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

स्थानिकांचे उपोषण संपले

By admin | Updated: November 10, 2015 00:07 IST

या जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराविरोधात उपोषण करणाऱ्या स्थानिक तरुणांना

पालघर : या जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराविरोधात उपोषण करणाऱ्या स्थानिक तरुणांना आठवडाभरामध्ये सर्वसमावेशक ठोस चर्चा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शहाळ्याचे पाणी देऊन हे उपोषण संपले. हे तरुण तसेच जिल्हाधिकाऱ्यांमध्ये सुसंवादात्मक ठोस चर्चा राष्ट्रीय मानवाधिकार तसेच महिला न्याय आयोगाचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ यांनी घडवून आणली. जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक -टंकलेखकपदांच्या नोकरभरतीमध्ये स्थानिक तरुणांना डावलण्यात येत असल्याच्या भावनेतून परजिल्ह्यातून होणारी भरती प्रक्रिया रद्द करावी. ८० टक्के स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे व परीक्षा केंद्रांतील गैरकारभारास जबाबदार असलेल्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी, इ. मागणीसाठी सिद्धार्थ सांबरे, अमोल सांबरे, सचिन भोईर इ. तरुणांनी ३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. प्रशासनासह खासदार, पालकमंत्री, आमदार इ.नी या उपोषणाकडे पाठ फिरविल्याचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये झळकू लागल्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, खा. चिंतामण वनगा, आ. हितेंद्र ठाकूर, आ. पांडुरंग बरोरा, आ. विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनीषा निमकर, सेना जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, मनसेचे कुंदन संखे, बविआचे प्रशांत पाटील, आ. आनंद ठाकूर यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला होता.शनिवारी आयोगाचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट केली जात नाही तसेच कुठले सकारात्मक पाऊलही टाकले जात नसल्याने स्थानिकांना नोकरभरतीत डावलले जात असल्याच्या भावनेतून तरुणांमध्ये असंतोष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा उपोषणकर्त्यांचे बरेवाईट झाल्यास जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, असे पत्र दिले. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, प्रभाकर राऊळ, रवींद्र मिश्रा, ओबीसी हक्क परिषदेचे दीपेश पावडे, सुशील सेजुले व काही पत्रकारांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यशस्वीरीत्या तपास करीत असताना सीबीआयची गरज काय? तसेच स्थानिकांना नोकरीमध्ये ८० टक्के प्राधान्य देण्याबाबत जिल्हा प्रशासन, पालकमंत्री, खासदार, आमदार,लोकप्रतिनिधी यांच्या अधिकाराबाहेर गोष्ट असल्याने सध्या निर्णय घेणे शक्य नाही, हे पटवून दिले.