शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

स्थानिकांचे उपोषण संपले

By admin | Updated: November 10, 2015 00:07 IST

या जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराविरोधात उपोषण करणाऱ्या स्थानिक तरुणांना

पालघर : या जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराविरोधात उपोषण करणाऱ्या स्थानिक तरुणांना आठवडाभरामध्ये सर्वसमावेशक ठोस चर्चा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शहाळ्याचे पाणी देऊन हे उपोषण संपले. हे तरुण तसेच जिल्हाधिकाऱ्यांमध्ये सुसंवादात्मक ठोस चर्चा राष्ट्रीय मानवाधिकार तसेच महिला न्याय आयोगाचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ यांनी घडवून आणली. जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक -टंकलेखकपदांच्या नोकरभरतीमध्ये स्थानिक तरुणांना डावलण्यात येत असल्याच्या भावनेतून परजिल्ह्यातून होणारी भरती प्रक्रिया रद्द करावी. ८० टक्के स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे व परीक्षा केंद्रांतील गैरकारभारास जबाबदार असलेल्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी, इ. मागणीसाठी सिद्धार्थ सांबरे, अमोल सांबरे, सचिन भोईर इ. तरुणांनी ३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. प्रशासनासह खासदार, पालकमंत्री, आमदार इ.नी या उपोषणाकडे पाठ फिरविल्याचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये झळकू लागल्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, खा. चिंतामण वनगा, आ. हितेंद्र ठाकूर, आ. पांडुरंग बरोरा, आ. विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनीषा निमकर, सेना जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, मनसेचे कुंदन संखे, बविआचे प्रशांत पाटील, आ. आनंद ठाकूर यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला होता.शनिवारी आयोगाचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट केली जात नाही तसेच कुठले सकारात्मक पाऊलही टाकले जात नसल्याने स्थानिकांना नोकरभरतीत डावलले जात असल्याच्या भावनेतून तरुणांमध्ये असंतोष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा उपोषणकर्त्यांचे बरेवाईट झाल्यास जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, असे पत्र दिले. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, प्रभाकर राऊळ, रवींद्र मिश्रा, ओबीसी हक्क परिषदेचे दीपेश पावडे, सुशील सेजुले व काही पत्रकारांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यशस्वीरीत्या तपास करीत असताना सीबीआयची गरज काय? तसेच स्थानिकांना नोकरीमध्ये ८० टक्के प्राधान्य देण्याबाबत जिल्हा प्रशासन, पालकमंत्री, खासदार, आमदार,लोकप्रतिनिधी यांच्या अधिकाराबाहेर गोष्ट असल्याने सध्या निर्णय घेणे शक्य नाही, हे पटवून दिले.