शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

‘त्या’ २७ गावांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:42 IST

कण्हेर पुलाची दुरवस्था : कामाला मंजुरी मिळूनही निविदा प्रक्रियेला विलंब

आशीष राणे।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई तालुक्यातील विरारस्थित पूर्वेस कण्हेर व आसपासच्या पूर्व पट्टीतील तब्बल २७ गावांना जोडणारा मुख्य पूल अत्यंत जर्जर अवस्थेत असून प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा जर्जर पूल पाडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी मधल्या काळात त्यास मंजुरी मिळूनही या पुलाची निविदा प्रक्रिया रखडल्याने ग्रामस्थांना जुन्या पुलावरूनच धोकादायक प्रवास करावा लागत आहे.वसईतील पूर्व भागातील कण्हेर गावच्या वेशीवर असलेल्या या पुलामुळे परिसरातील २७ हून अधिक गावांना व पाड्यांना जोडले गेले आहे. परंतु हा पूल अत्यंत जर्जर झाला असताना प्रशासन मात्र लक्ष देत नाही. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवून अपघाताची वाट पाहतेय का, असा प्रश्न ग्रामस्थ करत आहेत. हा पूल ३० वर्षांहून अधिक जुना असून १९९० ला सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची निर्मिती करून त्यास तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केले होते. ठाणे जि.प.ने या पुलाकडे लक्षच दिले नाही. तसेच या पुलाची डागडुजीसुद्धा करण्यात आलेली नाही. परिणामी यापुढील काळात हा पूल कोसळला तर येथील २७ गावांचा संपर्क तुटेलच, परंतु मोठी जीवितहानीही होऊ शकते, असेही ग्रामस्थांनी सांगितले. या पुलाचे कठडे जीर्ण होऊन ते तुटले आहेत, तर पुलाच्या लोखंडी सळया गंजून बाहेर आल्या असून पुलाच्या खालच्या बाजूचे सिमेंट काँक्रीट पुरते निघाले आहे. या पुलाची स्थिती पाहता हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती आहे. हा पूल धोकादायक असल्याचा फलक वसई-विरार शहर महापालिकेने काही वर्षांपूर्वी लावला असून यावर अवजड वाहनांनी पुलावरून प्रवास करू नये, असेही स्पष्ट लिहिण्यात आले आहे. दरम्यान, या जर्जर पुलाची माहिती घेतो व जिल्हा परिषदेतही विचारणा करतो, असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.आराखडा बदलल्याने वाढला खर्च, तूर्तास दुरुस्तीची शक्यता नाहीजिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, मागील आराखड्यानुसार ९९.९९ लाख रुपये या पुलाच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र आता या पुलाचा आराखडाच बदलला असल्याने त्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च येणार असून हा पूल पाडण्यासाठी व गावांना पर्यायी रस्ता देण्यासाठी खर्च वाढवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या या पुलाच्या बांधकामासाठी निधीच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषद अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे जोवर त्याला मंजुरी मिळणार नाही, तोवर निविदा निघणार नसल्याचे तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येणार नसल्याचेही पालघर जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या पुलाच्या एकूणच कामासाठी तूर्तास ग्रामस्थांना वाट पाहावी लागणार आहे.