शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रानभाज्यांतून मिळते रोगप्रतिकारक शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:09 IST

कोरोना रोखण्यासाठी ठरतील गुणकारी : कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे वेबिनारद्वारे मार्गदर्शन

अनिरुद्ध पाटील।

बोर्डी : पावसाळ्यात जंगलात उगवणाऱ्या रानभाज्यांमधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिजे असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनाविरु द्धच्या लढ्यात ती उपयुक्त ठरते, अशी कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडून वेबिनारद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली.

कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र , संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई आणि ग्रामीण विकास अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळ्यातील रानभाज्यांची उपयुक्तता या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. त्याद्वारे रानभाज्यांचे जतन व संवर्धन करून त्यांचे बारमाही उत्पादन घेऊन व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही गरज असल्याचे प्रतिपादन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले. तर या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी महाराष्ट्रात आढळणाºया मुख्य रानभाज्या आणि त्यांचे वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरण स्पष्ट करून रानभाज्यांच्या जनजागृतीबाबत या विज्ञान केंद्राचे योगदान सांगितले. यावेळी गृह विज्ञान तज्ज्ञ रु पाली देशमुख यांनी रानभाज्यांचे आहारदृष्टया महत्त्व, प्रक्रि या आणि त्यापासून बनवण्यात येणाºया विविध पदार्थांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. शास्त्रज्ञ अशोक भोईर यांनी रानभाज्यांचे जतन व त्यांचे दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन केले.तृणधान्य वर्गातील रानभाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचे घटकद्रव्य असते. ते पचनसंस्थेसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. वाकळ, रानकेळी, शेवगा, हातगा, भारंगी, शेवळ यांचे गुणधर्म सांगितले. भारंगी, बिंडा, पातेरे सारख्या भाज्यांची चव तुरट व कडू असली तरी त्यात पौष्टिक गुणधर्म अधिक असतात, अशी उपयुक्त माहिती वेबिनारमध्ये दिली. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचे संचालक तथा ग्रामीण विकास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांनी वेबिनार या उपक्र माला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. पाचशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.कुपोषण निर्मूलनासाठीही रानभाज्या उपयुक्तचेन्नई येथील एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. हरिहरन यांनी वेबिनारला संबोधित केले. कुपोषण निर्मूलनासाठी रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन केले.