शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअ‍ॅप सोडा - सानेकर

By admin | Updated: February 29, 2016 01:37 IST

आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे

विरार : आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे, असे प्रतिपादन सोमय्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रमुख डॉ.वीणा सानेकर यांनी केले. विरारच्या विवा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त्त बदलती मराठी भाषा एक आव्हान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठी माणूसच आज मराठी भाषेपासून दुरावत चालला आहे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.समाजात आज अनेक वर्ग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणासाठी मराठी वापरली गेली, मतांसाठी मराठी वापरली गेली मात्र याच राजकारण्यांची मुले आज इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मराठी भाषा बोलणारी माणसं आज सिंहासनावर बसली मात्र मराठी भाषा आज सिंहासनावर आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याला शिवाजी महाराज व बाबा आमटे आवडतात, त्यांचे कार्य आवडते व या कार्यावरील चित्रपटही आवडतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्यासाठी फार थोडे पुढे येतात. केवळ शुभेच्छापत्रांवर किंवा टी-शर्टवर मराठी गीताच्या दोन चार ओळी लिहिणे एवढेच मराठीपण नाही मात्र मुले याकडेच वळतात कारण हे सोपे आहे. आपल्या भाषेचा आदर हा आपल्याला मनापासून असायला हवा असेही त्यांनी पुढे सांगितले.चीन व सौदी अरेबियाचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की या देशांमध्ये त्यांना अपेक्षित असे त्यांच्या भाषेचा समावेश असलेले संगणकच बनवले जातात मात्र भारतात तसे दिसून येत नाही. इंग्रजी भाषा बोलण्यात मराठी मुलांनी कुठेच मागे राहू नये. मात्र ती बोलत असताना आपली भाषा कुपोषित ठेवू नका असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्र माचे प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. कविता पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.हर्षिवर्धनी बोरवणकर यांनी केले तर प्रा.रूपाली पाटील यांनी आभार मानले.मराठी राजभाषा दिनानिमित्त दुसऱ्या पर्वात काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.आपली दिवसाची सुरवातच व्हॉट्सअ‍ॅप वरून गुड मॉर्नींगने होत. परंतु, जगातील शक्तीशाली देशांनी आपापल्या भाषेत कारभार व्यवहार केले म्हणून ते पुढे गेले, असेही मत त्यांनी मांडले.