शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

व्हॉटसअ‍ॅप सोडा - सानेकर

By admin | Updated: February 29, 2016 01:37 IST

आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे

विरार : आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे, असे प्रतिपादन सोमय्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रमुख डॉ.वीणा सानेकर यांनी केले. विरारच्या विवा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त्त बदलती मराठी भाषा एक आव्हान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठी माणूसच आज मराठी भाषेपासून दुरावत चालला आहे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.समाजात आज अनेक वर्ग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणासाठी मराठी वापरली गेली, मतांसाठी मराठी वापरली गेली मात्र याच राजकारण्यांची मुले आज इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मराठी भाषा बोलणारी माणसं आज सिंहासनावर बसली मात्र मराठी भाषा आज सिंहासनावर आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याला शिवाजी महाराज व बाबा आमटे आवडतात, त्यांचे कार्य आवडते व या कार्यावरील चित्रपटही आवडतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्यासाठी फार थोडे पुढे येतात. केवळ शुभेच्छापत्रांवर किंवा टी-शर्टवर मराठी गीताच्या दोन चार ओळी लिहिणे एवढेच मराठीपण नाही मात्र मुले याकडेच वळतात कारण हे सोपे आहे. आपल्या भाषेचा आदर हा आपल्याला मनापासून असायला हवा असेही त्यांनी पुढे सांगितले.चीन व सौदी अरेबियाचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की या देशांमध्ये त्यांना अपेक्षित असे त्यांच्या भाषेचा समावेश असलेले संगणकच बनवले जातात मात्र भारतात तसे दिसून येत नाही. इंग्रजी भाषा बोलण्यात मराठी मुलांनी कुठेच मागे राहू नये. मात्र ती बोलत असताना आपली भाषा कुपोषित ठेवू नका असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्र माचे प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. कविता पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.हर्षिवर्धनी बोरवणकर यांनी केले तर प्रा.रूपाली पाटील यांनी आभार मानले.मराठी राजभाषा दिनानिमित्त दुसऱ्या पर्वात काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.आपली दिवसाची सुरवातच व्हॉट्सअ‍ॅप वरून गुड मॉर्नींगने होत. परंतु, जगातील शक्तीशाली देशांनी आपापल्या भाषेत कारभार व्यवहार केले म्हणून ते पुढे गेले, असेही मत त्यांनी मांडले.