शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

व्हॉटसअ‍ॅप सोडा - सानेकर

By admin | Updated: February 29, 2016 01:37 IST

आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे

विरार : आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे, असे प्रतिपादन सोमय्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रमुख डॉ.वीणा सानेकर यांनी केले. विरारच्या विवा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त्त बदलती मराठी भाषा एक आव्हान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठी माणूसच आज मराठी भाषेपासून दुरावत चालला आहे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.समाजात आज अनेक वर्ग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणासाठी मराठी वापरली गेली, मतांसाठी मराठी वापरली गेली मात्र याच राजकारण्यांची मुले आज इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मराठी भाषा बोलणारी माणसं आज सिंहासनावर बसली मात्र मराठी भाषा आज सिंहासनावर आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याला शिवाजी महाराज व बाबा आमटे आवडतात, त्यांचे कार्य आवडते व या कार्यावरील चित्रपटही आवडतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्यासाठी फार थोडे पुढे येतात. केवळ शुभेच्छापत्रांवर किंवा टी-शर्टवर मराठी गीताच्या दोन चार ओळी लिहिणे एवढेच मराठीपण नाही मात्र मुले याकडेच वळतात कारण हे सोपे आहे. आपल्या भाषेचा आदर हा आपल्याला मनापासून असायला हवा असेही त्यांनी पुढे सांगितले.चीन व सौदी अरेबियाचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की या देशांमध्ये त्यांना अपेक्षित असे त्यांच्या भाषेचा समावेश असलेले संगणकच बनवले जातात मात्र भारतात तसे दिसून येत नाही. इंग्रजी भाषा बोलण्यात मराठी मुलांनी कुठेच मागे राहू नये. मात्र ती बोलत असताना आपली भाषा कुपोषित ठेवू नका असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्र माचे प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. कविता पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.हर्षिवर्धनी बोरवणकर यांनी केले तर प्रा.रूपाली पाटील यांनी आभार मानले.मराठी राजभाषा दिनानिमित्त दुसऱ्या पर्वात काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.आपली दिवसाची सुरवातच व्हॉट्सअ‍ॅप वरून गुड मॉर्नींगने होत. परंतु, जगातील शक्तीशाली देशांनी आपापल्या भाषेत कारभार व्यवहार केले म्हणून ते पुढे गेले, असेही मत त्यांनी मांडले.