शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

कोकण पर्यटनवाढीस वाव

By admin | Updated: June 28, 2017 03:06 IST

निसर्ग संपदेने नटलेल्या कोकणातील पर्यटनाला मोठा वाव असून त्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा पर्यटन विकास साधण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : निसर्ग संपदेने नटलेल्या कोकणातील पर्यटनाला मोठा वाव असून त्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा पर्यटन विकास साधण्याच्या दृष्टीने कोकण विकास पर्यटन उद्योग संघाच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन वाढी संदर्भात मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भंडारी, उपाध्यक्ष नरेश पेडणेकर, सरचिटणीस संजय यादवराव, पालघर जिल्हा प्रतिनिधी आशिष पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी रावल यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी कोकणातील भूभाग हा निसर्ग संपदेने नटलेला असून स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, शिवकालीन दुर्ग, चिकू, केळी, नारळ, आंबा, स्ट्राबेरीच्या बागा, पापलेट-सुरमई, कोळंम्बी, दाढा, बोंबील इ. मत्स्यसंपदा, मुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाकडे आकर्षित होत असतात. मात्र पर्यटन वाढीच्या दृष्टीने लागणार्या अत्यावश्यक सेवा व सुविधा नाहीत त्या शासनाकडून पुरवल्या गेल्यास मोठा महसूल शासनाला मिळून ग्रामीण भागात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी निसर्गरम्य कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभागाने विशेष प्रयत्न चालविले असून एअर बी एन बी या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत करार केल्याची माहिती रावल यांनी दिली. या संस्थे बरोबर करार केल्याने जगातील १९० देशातील एअर बी एन बी संस्था कोकण पर्यटनाचे मार्केटिंग करताना न्याहारी निवास प्रकल्पाच्या मार्केटिंगवर भर देणार आहे. यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील गावागावात दोन हजार पर्यटन केंद्रे जागतिक दर्जाच्या निकषाप्रमाणे तयार करण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन दर्जेदार राहील याकडे संस्था विशेष लक्ष पुरवणार आहे, असे दोन हजार प्रकल्प उभे राहण्याच्या दृष्टीने कोकण पर्यटक उद्योग संघ समन्वयाची भूमिका बजावणार आहे. यामुळे पर्यटनाचे विकेंद्रीकरण होऊन गावागावात पर्यटन उद्योग सुरु होऊन स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास संघाचे अध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केला.कोकणातील प्रमुख ५० गावांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार करू अशी ग्वाही पर्यटनमंत्री रावल यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिली. याबाबत पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.