शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

कोकण पर्यटनवाढीस वाव

By admin | Updated: June 28, 2017 03:06 IST

निसर्ग संपदेने नटलेल्या कोकणातील पर्यटनाला मोठा वाव असून त्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा पर्यटन विकास साधण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : निसर्ग संपदेने नटलेल्या कोकणातील पर्यटनाला मोठा वाव असून त्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा पर्यटन विकास साधण्याच्या दृष्टीने कोकण विकास पर्यटन उद्योग संघाच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन वाढी संदर्भात मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भंडारी, उपाध्यक्ष नरेश पेडणेकर, सरचिटणीस संजय यादवराव, पालघर जिल्हा प्रतिनिधी आशिष पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी रावल यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी कोकणातील भूभाग हा निसर्ग संपदेने नटलेला असून स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, शिवकालीन दुर्ग, चिकू, केळी, नारळ, आंबा, स्ट्राबेरीच्या बागा, पापलेट-सुरमई, कोळंम्बी, दाढा, बोंबील इ. मत्स्यसंपदा, मुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाकडे आकर्षित होत असतात. मात्र पर्यटन वाढीच्या दृष्टीने लागणार्या अत्यावश्यक सेवा व सुविधा नाहीत त्या शासनाकडून पुरवल्या गेल्यास मोठा महसूल शासनाला मिळून ग्रामीण भागात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी निसर्गरम्य कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभागाने विशेष प्रयत्न चालविले असून एअर बी एन बी या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत करार केल्याची माहिती रावल यांनी दिली. या संस्थे बरोबर करार केल्याने जगातील १९० देशातील एअर बी एन बी संस्था कोकण पर्यटनाचे मार्केटिंग करताना न्याहारी निवास प्रकल्पाच्या मार्केटिंगवर भर देणार आहे. यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील गावागावात दोन हजार पर्यटन केंद्रे जागतिक दर्जाच्या निकषाप्रमाणे तयार करण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन दर्जेदार राहील याकडे संस्था विशेष लक्ष पुरवणार आहे, असे दोन हजार प्रकल्प उभे राहण्याच्या दृष्टीने कोकण पर्यटक उद्योग संघ समन्वयाची भूमिका बजावणार आहे. यामुळे पर्यटनाचे विकेंद्रीकरण होऊन गावागावात पर्यटन उद्योग सुरु होऊन स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास संघाचे अध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केला.कोकणातील प्रमुख ५० गावांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार करू अशी ग्वाही पर्यटनमंत्री रावल यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिली. याबाबत पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.