शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

आदिवासी विद्यार्थ्यांना सापत्न न्याय

By admin | Updated: April 2, 2016 03:00 IST

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना भविष्यात प्रगत व आधुनिक समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाच्या

- हुसेन मेमन,  जव्हारआदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना भविष्यात प्रगत व आधुनिक समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या खाजगी पब्लिक स्कू लमध्ये प्रवेश मिळवून दिला. मात्र, झाले उलटेच. जव्हारच्या काही पालकांनी आपल्या पाल्यांची पाचगणी येथे जाऊन तेथील नॅशनल पब्लिक स्कूलमध्ये पाहणी केली असता त्यांना गुरांच्या गोठ्यापेक्षाही वाईट असणाऱ्या वर्गखोल्यांमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यातील काही विद्यार्थी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर जव्हारमध्ये परतल्यावर त्यांच्या अंगावर खरूज, नायटे व इतर त्वचाआजार दिसून आल्याने पालक संतापले असून त्यांनी आदिवासी विभाग अधिकाऱ्यांकडे तक्र ार केली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांनी १०२२ आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना राज्याच्या विविध भागांतील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश दिला. जव्हार प्रकल्पांतर्गत असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड तसेच वाडा या आदिवासीबहुल व दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी पालकांना याचा आनंद झाला. परंतु, तो फार काळ टिकला नाही. जव्हार तालुक्यातील काही पालक आपली लेकरं मोठ्या शाळेत शिकत आहेत, म्हणून पदरमोड करून त्यांना भेटण्यासाठी जेव्हा नॅशनल पब्लिक स्कूल, पाचगणी येथे गेले तेव्हा, तेथील शाळा प्रशासनाने त्यांना शाळेत प्रवेश करू दिला नाही. हा विरोध धुडकावून ते आत शिरले तर शाळेत इतर उच्चभ्रू विद्यार्थ्यांना विशेष सोयीसुविधा पुरवण्यात आल्या होत्या, तर आदिवासी विद्यार्थ्यांना गुरांचा गोठा असल्यासारख्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना स्वतंत्र बेड नाही. जमिनीवर झोपावे लागते. आहाराबाबत पाल्यांच्या तक्रारी, त्यांना अंघोळीसाठी साबणतेल आदी सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. ही अवस्था पाहून त्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. आदिवासी विभागच करते खर्चआदिवासी विकास विभागाने सन २००२-०३ या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खाजगी पब्लिक शाळेत जाऊन उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी खाजगी पब्लिक स्कूलने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव प्रवेश द्यावा, असा अध्यादेश काढला. त्या आदिवासी विद्यार्थ्यांची फी, निवास, भोजन व इतर शैक्षणिक खर्च हा आदिवासी विभाग करत असते.वस्तुस्थिती पाहता या गंभीर घटनेत शाळा प्रशासनाचीच चूक असल्याचे दिसते. मी स्वत: पाचगणीला त्या शाळेमध्ये जाऊन समक्ष पाहणी करणार आहे. मुलांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा केला म्हणून सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांशी चर्चा करून अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांना पाठवण्याच्या सूचना सहायक प्रकल्प अधिकारी, शिक्षण यांना दिल्या आहेत. - बाबासाहेब पारधे, प्रकल्प अधिकारी, जव्हारआमची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या आमच्या कुटुंबातील मुलगी नामांकित इंग्रजी शाळेत शिकत असल्याचा आम्हाला अभिमान होता. परंतु, आमच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणाची ही क्रूर चेष्टा पाहता आमची मुले आदिवासी आश्रमशाळेत अधिक सुरक्षित राहतील. त्यामुळे आम्ही यापुढे आमची मुले त्या शाळेत शिकण्यासाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही गरीब व आदिवासी आहोत, म्हणूनच आमच्या मुलांकडे त्या शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. - अलका दामोडा, सीता गिरीश पवार, रघुनाथ पाटील (पालक)