शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आदिवासी विद्यार्थ्यांना सापत्न न्याय

By admin | Updated: April 2, 2016 03:00 IST

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना भविष्यात प्रगत व आधुनिक समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाच्या

- हुसेन मेमन,  जव्हारआदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना भविष्यात प्रगत व आधुनिक समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या खाजगी पब्लिक स्कू लमध्ये प्रवेश मिळवून दिला. मात्र, झाले उलटेच. जव्हारच्या काही पालकांनी आपल्या पाल्यांची पाचगणी येथे जाऊन तेथील नॅशनल पब्लिक स्कूलमध्ये पाहणी केली असता त्यांना गुरांच्या गोठ्यापेक्षाही वाईट असणाऱ्या वर्गखोल्यांमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यातील काही विद्यार्थी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर जव्हारमध्ये परतल्यावर त्यांच्या अंगावर खरूज, नायटे व इतर त्वचाआजार दिसून आल्याने पालक संतापले असून त्यांनी आदिवासी विभाग अधिकाऱ्यांकडे तक्र ार केली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांनी १०२२ आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना राज्याच्या विविध भागांतील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश दिला. जव्हार प्रकल्पांतर्गत असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड तसेच वाडा या आदिवासीबहुल व दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी पालकांना याचा आनंद झाला. परंतु, तो फार काळ टिकला नाही. जव्हार तालुक्यातील काही पालक आपली लेकरं मोठ्या शाळेत शिकत आहेत, म्हणून पदरमोड करून त्यांना भेटण्यासाठी जेव्हा नॅशनल पब्लिक स्कूल, पाचगणी येथे गेले तेव्हा, तेथील शाळा प्रशासनाने त्यांना शाळेत प्रवेश करू दिला नाही. हा विरोध धुडकावून ते आत शिरले तर शाळेत इतर उच्चभ्रू विद्यार्थ्यांना विशेष सोयीसुविधा पुरवण्यात आल्या होत्या, तर आदिवासी विद्यार्थ्यांना गुरांचा गोठा असल्यासारख्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना स्वतंत्र बेड नाही. जमिनीवर झोपावे लागते. आहाराबाबत पाल्यांच्या तक्रारी, त्यांना अंघोळीसाठी साबणतेल आदी सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. ही अवस्था पाहून त्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. आदिवासी विभागच करते खर्चआदिवासी विकास विभागाने सन २००२-०३ या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खाजगी पब्लिक शाळेत जाऊन उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी खाजगी पब्लिक स्कूलने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव प्रवेश द्यावा, असा अध्यादेश काढला. त्या आदिवासी विद्यार्थ्यांची फी, निवास, भोजन व इतर शैक्षणिक खर्च हा आदिवासी विभाग करत असते.वस्तुस्थिती पाहता या गंभीर घटनेत शाळा प्रशासनाचीच चूक असल्याचे दिसते. मी स्वत: पाचगणीला त्या शाळेमध्ये जाऊन समक्ष पाहणी करणार आहे. मुलांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा केला म्हणून सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांशी चर्चा करून अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांना पाठवण्याच्या सूचना सहायक प्रकल्प अधिकारी, शिक्षण यांना दिल्या आहेत. - बाबासाहेब पारधे, प्रकल्प अधिकारी, जव्हारआमची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या आमच्या कुटुंबातील मुलगी नामांकित इंग्रजी शाळेत शिकत असल्याचा आम्हाला अभिमान होता. परंतु, आमच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणाची ही क्रूर चेष्टा पाहता आमची मुले आदिवासी आश्रमशाळेत अधिक सुरक्षित राहतील. त्यामुळे आम्ही यापुढे आमची मुले त्या शाळेत शिकण्यासाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही गरीब व आदिवासी आहोत, म्हणूनच आमच्या मुलांकडे त्या शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. - अलका दामोडा, सीता गिरीश पवार, रघुनाथ पाटील (पालक)