शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा नदीतून रेतीउत्खनन सुरूच

By admin | Updated: June 15, 2017 02:30 IST

वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या खालून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला न जुमानता संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खाजगी वाहतूक सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या खालून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला न जुमानता संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खाजगी वाहतूक सुरु असून पुलाजवळील प्रतिबंधित क्षेत्रात दिवसा ढवळ्या रेती उत्खनन सुरु आहे. यामुळे रेल्वे पुलाला असलेला धोका दिवसेंदिवस वाढत असून प्राणहान घडल्यानंतरच महसूल आणि रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत काय? जिल्हाधिकारी प्रतिबंधक आदेश काढून तर रेल्वे प्रशासन पुलाला कोणताही धोका नसल्याचे मोघम उत्तर देऊन प्रवाशांच्या जीवितांशी जीवघेणा खेळ खेळत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटने नंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलाचे स्ट्रुक्चरल आॅडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई-गुजरात-दिल्ली आदी राज्यांना जोडणारा सफाळे-वैतरणा पूल पश्चिम रेल्वे चा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरलेला आहे.शंभर वर्षाचे आयुमान असलेला हा ९२ व ९३ क्रमांकाचा ब्रिटिश कालीन पूल ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटाचा मारा आणि रेल्वेच्या शेकडो फेऱ्याचा भार सांभाळून जीर्ण झाला आहे. या पुलाचे आयुष्यमान घटल्याने बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम रेल्वे आणि ठेकेदारांच्या आठमुडे धोरणामुळे जवळपास ७ वर्षापासून बंद आहे.या पुलाखाली आणि आसपासच्या प्रतिबंधित भागात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन होत असल्याच्या तक्र ारी नंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी महसूल, रेल्वे प्रशासन, पोलीस इ. ची बैठक घेऊन व मोठ्या प्रमाणात वसई, पालघरमधील रेती बंदरावर चोरट्या पद्धतीने चालू असलेल्या रेती उत्खनना वर धाड घालून अनेक बोटी,सक्शन पंप,व इतर सामग्री नष्ट केली होती.व प्रत्येक बंदरात सीसी टीव्ही कॅमेरे,कारवाई टीम नियुक्त केल्या होत्या. त्यामुळे सर्व बंदरावरील चोरटी रेती वाहतूक ठप्प पडली होती. त्यांची बदली झाल्यानंतर रेतीचोरांविरोधात महसूल विभागाने आवळलेला फास हळूहळू सैल होत चालल्याचे निदर्शनास येत असून सफाळे-वैतरणा पुलाच्या आजूबाजूच्या प्रतिबंधित क्षेत्रा मध्ये दिवसा ढवळ्या रेती उत्खनन सुरु झाले आहे. वाढीव बेटाच्या संरक्षित बंधाऱ्या लगतची रेती काढली जात असल्याने या गावातील सुमारे दोन हजार लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थ अनेक महिन्यापासून करीत आहेत. मात्र त्यांचा आवाज महसूल विभागाच्या कानापर्यंत पोहचूनही कारवाई करण्यासाठी आमच्याकडे पर्याप्त साधने नसल्याची ओरड सफाळ्याचे मंडळ अधिकारी, तलाठी करीत आले आहेत. त्यामुळेच चोरट्या रेतीची वाहतूक सुरु आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे पुलाच्या खालून रेती वाहतूक व उत्खनन सुरु असताना त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी जिल्हाधिकारी फक्त वैतरणा पुला खालून नौकानयनास आणि ६०० मीटर्स प्रतिबंधित भागात रेती उत्खननास बंदी असल्याचा मनाई आदेश काढून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत असल्याची भावना बाधित लोक व्यक्त करीत आहेत. त्याचा गैरफायदा रेतीमाफिया आणि त्यांना मदत करणारे काही अधिकारी उचलीत असल्याने रेल्वे पुलाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.राज्यसरकार आणि रेल्वे प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलीत असून या ढकला ढकलीत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या हकनाक बळी जाणार आहे.- प्रथमेश प्रभुतेंडुलकर, सहसचिव, डहाणू वैतरणा प्रवासी संघया बेकायदेशीर रेती उत्खननामुळे आमच्या वाढीव गावाचा बंधारा खचत चालल्याची तक्र ार करूनही तिची दखल घेतली जात नाही. - दशरथ किणी, गोकुळ भगत,ग्रामस्थ, वाढीव