शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जव्हारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील का ?

By admin | Updated: May 8, 2016 02:53 IST

शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये

जव्हार : शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अधिकारी तथा कर्मचारी एकाच ठिकाणी संबंधित टेबलचा कार्यभार सांभाळत आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयातील विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी अशा स्वरुपात बदल्या केल्या जातात, मात्र जव्हार त्याला अपवाद आहे काय? कारण जव्हारमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नाहीत. ते वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेले आहेत. जव्हार तालुका हा ९९ टक्के आदिवासी तालुका असल्यामुळे येथील बराचसा आदिवासी बांधव अशिक्षित आहे, त्यामुळे त्याला नियमांची जाण नाही, परंतु काही सामाजिक कार्याकर्त्यांच्या माहिती नुसार विशिष्ट विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीने कामे रेंगाळली जातात, याचा फटका येथील गरीब आदिवासी जनतेला बसत आहे.(वार्ताहर) बदल्या करून त्या रद्द करून घेण्याच्या प्रकारातही दरवर्षी मे महिन्यात वरीष्ठ कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्थकारणाची धावपळ सुरू असते. तीन वर्ष पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी परत तेच कार्यालय मिळण्याकरीता मंत्रालयापासून तर वरीष्ठ कार्यालयात सेटींग लावून बदलीला स्थगिती मिळवून अथवा ती रद्द करून पुन्हा आपल्या जुन्या खुर्चीवर विराजमान होतात.ज्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तीन वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांची बदली दुसऱ्या कार्यालयात शासन निर्णयाप्रमाणे करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अलताफ शेख यांनी केली आहे.