शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘ते’ १० नगरसेवक पुन्हा एकदा अपात्र

By admin | Updated: November 4, 2015 22:58 IST

जव्हार नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांना पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा अपात्र ठरविल्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी पारित केला.

जव्हार : जव्हार नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांना पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा अपात्र ठरविल्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी पारित केला.या १० नगरसेवकांचा वाद सातत्याने सुरू आहे. यात सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला. हा गट बेकायदेशीर असून पक्षाचा व्हिप नाकारल्यामुळे नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी त्यांच्याविरुद्ध दावा दाखल केला, त्यावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी हे १० नगरसेवक अपात्र असल्याचा निर्णय दिला. त्यावर या १० नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करत त्याला स्थगिती मिळवली. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडही नुकतीच झाली.यात अपात्र झालेल्या ५ महिला नगरसेविकांनी ‘घर वापसी’ करत मूळ पक्षात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता राष्ट्रवादीच्या गोटात आली. या परतलेल्या ५ नगरसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रता रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कायद्यात अशी तरतूद नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. माजी नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी अपील करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)कामकाज रेंगाळलेले, विकास खुंटलेलाजिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा जव्हारच्या विकासाला खिळ बसली आहे. काही महिन्यांपासुन विकासाच्या दृष्टीने कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. रस्त्यांची, शैचालयाची, पाणी पुरवठ्याची, अशा विविध कामांबाबत शेकडो तक्रारी अर्ज दाखल झालेले आहेत.नगराध्यक्ष पद तसेच सदस्य कमेटी स्थापित होत नाही तो पर्यत विकास शून्य. यात मुख्याधिकाऱ्यांना फक्त ५०० रु.च खर्च करण्याची परवानगी आहे, त्यामुळे कुठलीही कामे वेळेवर होत नाहीत, मध्यंतरीच्या काळात तर शहरात मच्छरच मच्छर झाले होते त्यामुळे फवारणी करणे गरजेचे होते. मुख्याधिकाऱ्यांना जास्त खर्च करण्याची तरतुद नसल्यामुळे नागरीकांना कित्येक दिवस भयनक डासांचा सामना करावा लागला.जनरल बोर्डातील गदारोळ४५ दिवसांकरीता नव्याने नगराध्यक्षपद सांभाळलेल्या संदिप वैद्य यांच्या कार्यकाळात जनरल बोर्डाची मिटींग झाली. त्यांत तब्बल ९७ विषय ठेवण्यात आले. ते एका दिवसात पुर्ण होण्यासारखे नव्हते तरीही नगराध्यक्षांनी ती पुर्ण कामांची लिस्ट जनरल बोर्डासमोर ठेवली, त्यात विरोध पक्षांतील नगरसेवकांनी सभेत गदारोळ घातला, वादविवादात अखेर काही निर्णय घेण्यात आले. तरीही सध्या विकासकामे पूर्ण होण्यात अनेक अडचणी आहेत.