शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ १० नगरसेवक पुन्हा एकदा अपात्र

By admin | Updated: November 4, 2015 22:58 IST

जव्हार नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांना पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा अपात्र ठरविल्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी पारित केला.

जव्हार : जव्हार नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांना पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा अपात्र ठरविल्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी पारित केला.या १० नगरसेवकांचा वाद सातत्याने सुरू आहे. यात सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला. हा गट बेकायदेशीर असून पक्षाचा व्हिप नाकारल्यामुळे नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी त्यांच्याविरुद्ध दावा दाखल केला, त्यावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी हे १० नगरसेवक अपात्र असल्याचा निर्णय दिला. त्यावर या १० नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करत त्याला स्थगिती मिळवली. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडही नुकतीच झाली.यात अपात्र झालेल्या ५ महिला नगरसेविकांनी ‘घर वापसी’ करत मूळ पक्षात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता राष्ट्रवादीच्या गोटात आली. या परतलेल्या ५ नगरसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रता रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कायद्यात अशी तरतूद नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. माजी नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी अपील करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)कामकाज रेंगाळलेले, विकास खुंटलेलाजिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा जव्हारच्या विकासाला खिळ बसली आहे. काही महिन्यांपासुन विकासाच्या दृष्टीने कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. रस्त्यांची, शैचालयाची, पाणी पुरवठ्याची, अशा विविध कामांबाबत शेकडो तक्रारी अर्ज दाखल झालेले आहेत.नगराध्यक्ष पद तसेच सदस्य कमेटी स्थापित होत नाही तो पर्यत विकास शून्य. यात मुख्याधिकाऱ्यांना फक्त ५०० रु.च खर्च करण्याची परवानगी आहे, त्यामुळे कुठलीही कामे वेळेवर होत नाहीत, मध्यंतरीच्या काळात तर शहरात मच्छरच मच्छर झाले होते त्यामुळे फवारणी करणे गरजेचे होते. मुख्याधिकाऱ्यांना जास्त खर्च करण्याची तरतुद नसल्यामुळे नागरीकांना कित्येक दिवस भयनक डासांचा सामना करावा लागला.जनरल बोर्डातील गदारोळ४५ दिवसांकरीता नव्याने नगराध्यक्षपद सांभाळलेल्या संदिप वैद्य यांच्या कार्यकाळात जनरल बोर्डाची मिटींग झाली. त्यांत तब्बल ९७ विषय ठेवण्यात आले. ते एका दिवसात पुर्ण होण्यासारखे नव्हते तरीही नगराध्यक्षांनी ती पुर्ण कामांची लिस्ट जनरल बोर्डासमोर ठेवली, त्यात विरोध पक्षांतील नगरसेवकांनी सभेत गदारोळ घातला, वादविवादात अखेर काही निर्णय घेण्यात आले. तरीही सध्या विकासकामे पूर्ण होण्यात अनेक अडचणी आहेत.