शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘ते’ १० नगरसेवक पुन्हा एकदा अपात्र

By admin | Updated: November 4, 2015 22:58 IST

जव्हार नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांना पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा अपात्र ठरविल्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी पारित केला.

जव्हार : जव्हार नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांना पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा अपात्र ठरविल्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी पारित केला.या १० नगरसेवकांचा वाद सातत्याने सुरू आहे. यात सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला. हा गट बेकायदेशीर असून पक्षाचा व्हिप नाकारल्यामुळे नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी त्यांच्याविरुद्ध दावा दाखल केला, त्यावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी हे १० नगरसेवक अपात्र असल्याचा निर्णय दिला. त्यावर या १० नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करत त्याला स्थगिती मिळवली. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडही नुकतीच झाली.यात अपात्र झालेल्या ५ महिला नगरसेविकांनी ‘घर वापसी’ करत मूळ पक्षात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता राष्ट्रवादीच्या गोटात आली. या परतलेल्या ५ नगरसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रता रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कायद्यात अशी तरतूद नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. माजी नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी अपील करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)कामकाज रेंगाळलेले, विकास खुंटलेलाजिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा जव्हारच्या विकासाला खिळ बसली आहे. काही महिन्यांपासुन विकासाच्या दृष्टीने कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. रस्त्यांची, शैचालयाची, पाणी पुरवठ्याची, अशा विविध कामांबाबत शेकडो तक्रारी अर्ज दाखल झालेले आहेत.नगराध्यक्ष पद तसेच सदस्य कमेटी स्थापित होत नाही तो पर्यत विकास शून्य. यात मुख्याधिकाऱ्यांना फक्त ५०० रु.च खर्च करण्याची परवानगी आहे, त्यामुळे कुठलीही कामे वेळेवर होत नाहीत, मध्यंतरीच्या काळात तर शहरात मच्छरच मच्छर झाले होते त्यामुळे फवारणी करणे गरजेचे होते. मुख्याधिकाऱ्यांना जास्त खर्च करण्याची तरतुद नसल्यामुळे नागरीकांना कित्येक दिवस भयनक डासांचा सामना करावा लागला.जनरल बोर्डातील गदारोळ४५ दिवसांकरीता नव्याने नगराध्यक्षपद सांभाळलेल्या संदिप वैद्य यांच्या कार्यकाळात जनरल बोर्डाची मिटींग झाली. त्यांत तब्बल ९७ विषय ठेवण्यात आले. ते एका दिवसात पुर्ण होण्यासारखे नव्हते तरीही नगराध्यक्षांनी ती पुर्ण कामांची लिस्ट जनरल बोर्डासमोर ठेवली, त्यात विरोध पक्षांतील नगरसेवकांनी सभेत गदारोळ घातला, वादविवादात अखेर काही निर्णय घेण्यात आले. तरीही सध्या विकासकामे पूर्ण होण्यात अनेक अडचणी आहेत.