शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

असनस लघुपाटबंधारे योजना बासनात ?

By admin | Updated: October 24, 2015 23:27 IST

वाडा तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या असनस या गावासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून एक मोठा तलाव (डॅम) व तीन किमी अंतरापर्यंत कालव्याचे काम मंजूर झाले होते.

- वसंत भोईर,  वाडावाडा तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या असनस या गावासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून एक मोठा तलाव (डॅम) व तीन किमी अंतरापर्यंत कालव्याचे काम मंजूर झाले होते. त्यासाठी एकूण १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, कालव्यासाठी शेतकरी जागा देत नसल्याने हे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. रखडलेल्या कामाकडे लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.लघुपाटबंधारे विभागाकडून या कालव्याचे बांधकाम सुरू करण्याअगोदर कालव्याच्या जागेचे संपादन करावयास हवे होते. मात्र, तसे न केल्याने आता शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शासनाचे सुमारे ११ कोटी रु. पाण्यात गेले आहेत. असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.ज्या एक किमी अंतरापर्यंत कालव्याचे बांधकाम झाले आहे, तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून कालव्याला लिकेज असल्याने पाणी इतरत्र जात आहे. आता त्यावर लिकेज काढून पॅच मारण्याचा प्रयत्न ठेकेदार करीत असला तरी तो फोल ठरताना दिसून येत आहे. या कामावर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी केव्हा काम करीत होते, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात स्थानिक शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कालव्याचे बांधकाम चालू करण्याअगोदर जमीन संपादित केली असती तर आता जागेचा प्रश्न उद्भवला नसता व कालव्याचे काम रखडले नसते, अशी माहिती त्यांनी दिली. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज.स. वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता शासनाचे जमीन संपादनासंदर्भात नवीन धोरण जाहीर झाल्यास तत्काळ यासंदर्भात निर्णय घेता येईल व रखडलेले काम पूर्ण करता येईल, असे सांगून मी आताच येथील पदभार स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लघुपाटबंधारे विभागाच्या निष्काळजी व भोंगळ कारभारामुळे हे काम रखडले असून तसेच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी केली आहे.आतापर्यंतचा लेखाजोखा...१असनस हा दुर्गम भाग असून येथील बहुतांशी नागरिक हे शेती करतात. उन्हाळ्यातही त्यांना भाजीपाला व भातशेती करता यावी, यासाठी राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून ७५ हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रात एक मोठा तलाव (डॅम) खोदण्यात आला आहे. २००६ साली या तलावाच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतर, कृष्णा भगवान रेड्डी यांच्या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला. त्यासाठी अकरा कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला. सदरचे काम २००९ साली पूर्ण करण्यात आले.२त्यानंतर, लघुपाटबंधारे विभागाने २०१० मध्ये तीन किमी अंतराच्या कालव्याला मंजुरी दिली. त्यासाठी ३ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या तलावामुळे सुमारे १२४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कालव्याचे काम सन २०१२ पर्यंत पूर्ण करण्याची अट आदेशात घालण्यात आली होती. कालव्याच्या एक किमी अंतरापर्यंतचे कामसुद्धा करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित कालव्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून बंदच आहे. येथील स्थानिक काही शेतकरी कालव्यासाठी जागा देत नसल्याने कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.