शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

असनस लघुपाटबंधारे योजना बासनात ?

By admin | Updated: October 24, 2015 23:27 IST

वाडा तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या असनस या गावासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून एक मोठा तलाव (डॅम) व तीन किमी अंतरापर्यंत कालव्याचे काम मंजूर झाले होते.

- वसंत भोईर,  वाडावाडा तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या असनस या गावासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून एक मोठा तलाव (डॅम) व तीन किमी अंतरापर्यंत कालव्याचे काम मंजूर झाले होते. त्यासाठी एकूण १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, कालव्यासाठी शेतकरी जागा देत नसल्याने हे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. रखडलेल्या कामाकडे लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.लघुपाटबंधारे विभागाकडून या कालव्याचे बांधकाम सुरू करण्याअगोदर कालव्याच्या जागेचे संपादन करावयास हवे होते. मात्र, तसे न केल्याने आता शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शासनाचे सुमारे ११ कोटी रु. पाण्यात गेले आहेत. असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.ज्या एक किमी अंतरापर्यंत कालव्याचे बांधकाम झाले आहे, तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून कालव्याला लिकेज असल्याने पाणी इतरत्र जात आहे. आता त्यावर लिकेज काढून पॅच मारण्याचा प्रयत्न ठेकेदार करीत असला तरी तो फोल ठरताना दिसून येत आहे. या कामावर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी केव्हा काम करीत होते, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात स्थानिक शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कालव्याचे बांधकाम चालू करण्याअगोदर जमीन संपादित केली असती तर आता जागेचा प्रश्न उद्भवला नसता व कालव्याचे काम रखडले नसते, अशी माहिती त्यांनी दिली. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज.स. वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता शासनाचे जमीन संपादनासंदर्भात नवीन धोरण जाहीर झाल्यास तत्काळ यासंदर्भात निर्णय घेता येईल व रखडलेले काम पूर्ण करता येईल, असे सांगून मी आताच येथील पदभार स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लघुपाटबंधारे विभागाच्या निष्काळजी व भोंगळ कारभारामुळे हे काम रखडले असून तसेच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी केली आहे.आतापर्यंतचा लेखाजोखा...१असनस हा दुर्गम भाग असून येथील बहुतांशी नागरिक हे शेती करतात. उन्हाळ्यातही त्यांना भाजीपाला व भातशेती करता यावी, यासाठी राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून ७५ हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रात एक मोठा तलाव (डॅम) खोदण्यात आला आहे. २००६ साली या तलावाच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतर, कृष्णा भगवान रेड्डी यांच्या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला. त्यासाठी अकरा कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला. सदरचे काम २००९ साली पूर्ण करण्यात आले.२त्यानंतर, लघुपाटबंधारे विभागाने २०१० मध्ये तीन किमी अंतराच्या कालव्याला मंजुरी दिली. त्यासाठी ३ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या तलावामुळे सुमारे १२४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कालव्याचे काम सन २०१२ पर्यंत पूर्ण करण्याची अट आदेशात घालण्यात आली होती. कालव्याच्या एक किमी अंतरापर्यंतचे कामसुद्धा करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित कालव्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून बंदच आहे. येथील स्थानिक काही शेतकरी कालव्यासाठी जागा देत नसल्याने कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.