शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नियोजन बैठकीत घुसून मांडले प्रश्न

By admin | Updated: November 7, 2015 22:17 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक, टंकलेखक भरती प्रक्रियेत एकही स्थानिक तरुणाची निवड करण्यात न आल्याच्या निषेधार्थ चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक, टंकलेखक भरती प्रक्रियेत एकही स्थानिक तरुणाची निवड करण्यात न आल्याच्या निषेधार्थ चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी निर्धार संघटनेचे अध्यक्ष व मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत घुसून स्थानिक तरुणांच्या भविष्यासाठी काही करणार आहात की नाही, असा उद्वेगजन्य प्रश्न उपस्थित केला.१ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्हानिर्मितीची घोषणा करण्यात आल्यानंतर वर्षानुवर्षे उपेक्षित, अविकसित असलेला ग्रामीण भाग, रोजगाराकरिता कुटुंबासह विस्थापित होणारा आदिवासी बांधव तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशी माफक अपेक्षा होती. परंतु, वर्षभराच्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्याव्यतिरिक्त कुठलाही विकास झाला नसल्याचे संखे यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लिपीक व टंकलेखकपदाच्या १३४ जागांच्या भरतीदरम्यान बेरोजगार तरुण व त्यांच्या पालकांच्या मनात आपल्या मुलांच्या नोकरीचा महत्त्वाचा प्रश्न सुटेल, अशी महत्त्वपूर्ण आशा निर्माण झाली होती. परंतु, दोन वेळा या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर व या पेपरफुटी प्रकरणात परजिल्ह्यांतील परीक्षार्थी आरोपी असतानाही १३४ जागांसाठी निवडलेल्या २६६ परीक्षार्थींपैकी सर्व परजिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे संखे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसून पालकमंत्री, खासदार, सर्व आमदार यांना स्थानिक तरुणांना न्याय देण्याची मागणी केली. पत्रकार संघाच्यावतीनेही या भरतीला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)