शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

वीजबिल वसुलीसाठी प्रबाेधनातून साद; वरिष्ठ अधिकारी फिल्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 02:06 IST

सुटी दिवशीही भरणा केंद्र सुरू, शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी अभियान

नालासोपारा : महावितरणच्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमांद्वारे जागृती केली जात आहे.घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह सरकारी आस्थापनांकडून मार्चमध्ये सुमारे २९० कोटींचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीज बिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरू आहे. 

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, क्षेत्रीय अभियंते, अधिकारी, जनमित्र मोहिमेत सहभागी झाले आहेत. ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ ही संकल्पना रुजवून ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी वसई, विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे भागात रॅली, ग्राहक संवाद असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत आणखी १०७ कोटींच्या वीजबिलाची वसुली आवश्यक आहे. यात पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे जवळपास ५९ हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १०७ कोटींची थकबाकी आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. मार्चमध्ये आतापर्यंत वसई मंडलातील दाेन लाख ७७ हजार लघुदाब ग्राहकांनी १०४ कोटींचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ऑनलाइन वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वसई मंडलात ५.१२ काेटींची थकबाकीमहाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम मंडळात राबवण्यात येत आहेत. वसई मंडलात एकूण पाच हजार २६६ कृषिपंप ग्राहक आहेत. त्यांच्याकडे पाच कोटी १२ लाखांची थकबाकी आहे. योजनेतील तरतुदीमुळे ही थकबाकी चार कोटी १६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. चालू बिलासह दाेन कोटी आठ लाखांचा भरणा केल्यास मंडलातील सर्व शेतकरी थकबाकीमुक्त होतील. थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्याची ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. आतापर्यंत १४१४ कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिलाचे ६० लाख भरून सहकार्य केले आहे.

विक्रमगड : महावितरण कंपनीने विक्रमगड तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांकडून सक्तीने वीजबिल वसुलीला सुरुवात केली आहे. वीजबिल भरणा केला नाही, तर वीज कनेक्शन तोडले जात आहे. हे अन्यायकारक असून या थकीत बिलांना महावितरण जबाबदार आहे. थकीत वीजबिलधारकांचे वीज कनेक्शन तोडू नका, असा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. किरण गहला यांनी दिला आहे. आदिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असून, मोठ्या प्रमाणात आलेली वीजबिले कशी भरणार? यासाठी सक्ती नको. हे वीज कंपनीने थांबविले नाही, तर   माकप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा गहला यांनी दिला आहे.