शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुलीसाठी प्रबाेधनातून साद; वरिष्ठ अधिकारी फिल्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 02:06 IST

सुटी दिवशीही भरणा केंद्र सुरू, शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी अभियान

नालासोपारा : महावितरणच्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमांद्वारे जागृती केली जात आहे.घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह सरकारी आस्थापनांकडून मार्चमध्ये सुमारे २९० कोटींचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीज बिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरू आहे. 

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, क्षेत्रीय अभियंते, अधिकारी, जनमित्र मोहिमेत सहभागी झाले आहेत. ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ ही संकल्पना रुजवून ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी वसई, विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे भागात रॅली, ग्राहक संवाद असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत आणखी १०७ कोटींच्या वीजबिलाची वसुली आवश्यक आहे. यात पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे जवळपास ५९ हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १०७ कोटींची थकबाकी आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. मार्चमध्ये आतापर्यंत वसई मंडलातील दाेन लाख ७७ हजार लघुदाब ग्राहकांनी १०४ कोटींचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ऑनलाइन वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वसई मंडलात ५.१२ काेटींची थकबाकीमहाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम मंडळात राबवण्यात येत आहेत. वसई मंडलात एकूण पाच हजार २६६ कृषिपंप ग्राहक आहेत. त्यांच्याकडे पाच कोटी १२ लाखांची थकबाकी आहे. योजनेतील तरतुदीमुळे ही थकबाकी चार कोटी १६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. चालू बिलासह दाेन कोटी आठ लाखांचा भरणा केल्यास मंडलातील सर्व शेतकरी थकबाकीमुक्त होतील. थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्याची ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. आतापर्यंत १४१४ कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिलाचे ६० लाख भरून सहकार्य केले आहे.

विक्रमगड : महावितरण कंपनीने विक्रमगड तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांकडून सक्तीने वीजबिल वसुलीला सुरुवात केली आहे. वीजबिल भरणा केला नाही, तर वीज कनेक्शन तोडले जात आहे. हे अन्यायकारक असून या थकीत बिलांना महावितरण जबाबदार आहे. थकीत वीजबिलधारकांचे वीज कनेक्शन तोडू नका, असा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. किरण गहला यांनी दिला आहे. आदिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असून, मोठ्या प्रमाणात आलेली वीजबिले कशी भरणार? यासाठी सक्ती नको. हे वीज कंपनीने थांबविले नाही, तर   माकप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा गहला यांनी दिला आहे.