शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

पालघरात मराठ्यांच्या एकजुटीचा अपूर्व अविष्कार

By admin | Updated: October 24, 2016 02:03 IST

नव्या पालघर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या एकजुटीचा अभूतपूर्व आविष्कार रविवारी निघालेल्या मोर्चाद्वारे घडून आला. त्याचा आनंद प्रत्येक मोर्चेकराच्या चेहऱ्यावर दिसत होता

अनिरु द्ध पाटील/हुसेन मेनन/शुभदा सासवडे/सुरेश काटे, पालघरनव्या पालघर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या एकजुटीचा अभूतपूर्व आविष्कार रविवारी निघालेल्या मोर्चाद्वारे घडून आला. त्याचा आनंद प्रत्येक मोर्चेकराच्या चेहऱ्यावर दिसत होता. आयोजकांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता.मच्छीमार, आगरी, शिलोत्री, आदिवासी, आदी समाजांचे प्राबल्य असणाऱ्या या जिल्ह्यात मराठ्यांची संख्या आहे तरी किती व हाक दिली तर ते कसे आणि ते किती एकवटतात, याचा प्रत्यय आजवर कधी आला नव्हता. तो या मोर्चामुळे घडून आला. निधीपासून ते पार सामग्रीपर्यंत कुठेही, कशाचीही कमी पडू नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. वॉकीटॉकीधारी ३० स्वयंसेवक, स्वच्छता राखणारे युवक, युवती यांच्या ४०० स्वयंसेवकांचे पथक, ४ ड्रोनद्वारे थेट प्रक्षेपण व छायाचित्रण, पाणी, खाद्यपदार्थ यांचे वाटप करणारे असंख्य स्वयंसेवक यांनी मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी लावलेले स्टॉल, प्रत्येक मोर्चेकऱ्याने सोबत आणलेली पिशवी, त्यातच कचरा टाकून ती कचराकुंडीत टाकणे, मोर्चा पुढे जाताना त्या कचराकुंड्या रिकाम्या करून पुढच्या भागात ठेवणे, गोळा झालेला कचरा पालिकेच्या घंटागाडीत टाकणे, या बाबीमुळे कुठेही अस्वच्छता किंवा गोंधळ, गैरसोय नव्हता. मोर्चाने रस्त्यालगत डाव्या बाजूचा भाग मोकळा ठेवल्याने वाहतूकही सुरळीत होती, हे विशेष.छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊमाता यांची वेशभूषा केलेली अनेक बालके, मुली मोर्चात सहभागी झाल्या होत्या. चार महिन्यांच्या लेकीला घेऊन रणरणत्या उन्हात सहभागी झालेले मोर्चेकरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.सर पाणी हवे, दादा बिस्कीट घ्याना, ताई पोळी भाजी घ्या ना, असे कार्यकर्ते आपणहून मोर्चेकऱ्यांना विचारत होते. त्यामुळे मोर्चेकऱ्यांत समाधान होते. दुतर्फा असलेली अनेक दुकाने चालू होती.राज्यकर्त्यांनो समाजहित साधा अन्यथा, जागा दाखवू !1आर्यन हायस्कूलच्या मैदानात मराठा क्र ांती मूक मोर्चातील मोर्चेकरी जमले होते. या वेळी शिवाजी महाराजांना अभिवादन करून कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा समाजातील मुलींनी भाषणाच्या माध्यमातून विविध मुद्दे व समस्या मांडल्या. मराठा समाजातील राज्यकर्त्यांनो समाजहित साधा अन्यथा, जागा दाखवून देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कायदे मंडळाने कायद्यात सुधारणा करावे असे मत नेहाने व्यक्त केले. मराठा जात नव्हे, अंगार आहे अशी गर्जना करून मराठ्यांना जागृत राहण्याची गरज डहाणूतील दृष्टी देशमुख हिने व्यक्त केली. बघा आमची ऐकी, जिजाऊंच्या लेकी म्हणत मराठ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम देण्यात आला. 2कोपर्डी घटनेचा निषेध विशिष्ट जातील नव्हे, तर गुन्हेगारीला आहे. तर निर्दोषांना न्याय देण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा हटविण्याची गरज बोईसरच्या शिवानी देशमुखने मांडली. मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी आरक्षणाच्या अभावी शैक्षणिक संधीच्या लाभाला मुकत आहेत. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत आरक्षण न दिल्यास हक्कासाठी आगामी काळात जिजाऊंच्या लेकी हाती शस्त्र घेतील, असे वसईकर वर्षा सावंत म्हणाली. अपेक्षित बदल न झाल्यास भविष्यातील मोर्चे मूक नसतील हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेण्याचे सूचक विधान जुही चव्हाण हिने केले.3शेतकऱ्यांना हमीभाव, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, मुली व महिलांना न्याय आणि निर्दोष समाजबांधवांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यापासून संरक्षण आवश्यक असल्याच्या मुद्यांना पालघरच्या ऐश्वर्याने हात घातला. मराठ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढणाऱ्यांनो आम्हाला षंढ समजू नये, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाच्या माध्यमातून दिलेली निवेदने, पत्रिका नाहीत. 4हा मोर्चा वादळाच्या रु पाने राज्याच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनजीक पोहोचला आहे. त्यामुळे शासनाने मराठा समाजाचे मोर्चे गांभीर्याने घेतले पाहिजेत, याची पुनरावृत्ती करण्यात येत होती. विक्र मगडच्या आरती यादव या चिमुकलीने केलेल्या भाषणातून एकांकिका वा एकपात्री नाटकाची झलक दिसून आली. तिने अभिनयातून उपस्थितांचा स्वाभिमान जागृत केल्याने गर्जनांनी मैदान दुमदुमले. सातच्या आत घरात ही परिस्थिती बदलण्याची अपेक्षा बोईसरच्या धनश्री पाटीलने मांडली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास जाहीर निवेदनाचे वाचन आणि राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.