शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

भाताणे पुलाची उंची वाढवा!

By admin | Updated: July 23, 2015 04:13 IST

सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो

वसई : सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो व पंचक्रोशीतील सुमारे २० ते ३० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो. यंदा खानिवडे, बेलवाडी या भागातही पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उसगाव-भाताणे व सायवन-मेढे हा संपूर्ण परिसर काल पाण्याखाली गेला होता. या पुलाची उंची वाढविण्यात यावी, याकरिता या परिसरातील ग्रामस्थ सतत मागणी करत असतात. परंतु, त्याकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले.तानसा नदीच्या पात्रात प्रचंड रेतीउपसा होत असल्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती दरवर्षी निर्माण होत असते, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या नदीकाठी असलेला रस्ताही उद्ध्वस्त झाला आहे. अनेकदा त्याची दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ अशीच असते. काल झालेल्या पावसामध्ये भाताणे, नवसई, थळ्याचापाडा व अन्य २० ते २२ गावांतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील शेती उद्ध्वस्त झाली आहे.पूल बंद झाला की, ग्रामस्थ बेलवाडीमार्गे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच सायवन-मेढे रस्त्याने वजे्रश्वरी-शिरसाड मुख्य रस्त्यावर येत असत. परंतु, यंदा चहूबाजूने पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना बाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद झाले. काल पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना आपत्ती निवारण पथकाने सुखरूप बाहेर काढले. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. परंतु, शासनाचा संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. मंगळवारी झालेल्या पावसानंतर पुराचा जोर इतका प्रचंड होता की, सकवार येथे एका महिलेचे घर पत्त्यासारखे कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)