शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भाताणे पुलाची उंची वाढवा!

By admin | Updated: July 23, 2015 04:13 IST

सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो

वसई : सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो व पंचक्रोशीतील सुमारे २० ते ३० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो. यंदा खानिवडे, बेलवाडी या भागातही पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उसगाव-भाताणे व सायवन-मेढे हा संपूर्ण परिसर काल पाण्याखाली गेला होता. या पुलाची उंची वाढविण्यात यावी, याकरिता या परिसरातील ग्रामस्थ सतत मागणी करत असतात. परंतु, त्याकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले.तानसा नदीच्या पात्रात प्रचंड रेतीउपसा होत असल्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती दरवर्षी निर्माण होत असते, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या नदीकाठी असलेला रस्ताही उद्ध्वस्त झाला आहे. अनेकदा त्याची दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ अशीच असते. काल झालेल्या पावसामध्ये भाताणे, नवसई, थळ्याचापाडा व अन्य २० ते २२ गावांतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील शेती उद्ध्वस्त झाली आहे.पूल बंद झाला की, ग्रामस्थ बेलवाडीमार्गे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच सायवन-मेढे रस्त्याने वजे्रश्वरी-शिरसाड मुख्य रस्त्यावर येत असत. परंतु, यंदा चहूबाजूने पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना बाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद झाले. काल पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना आपत्ती निवारण पथकाने सुखरूप बाहेर काढले. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. परंतु, शासनाचा संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. मंगळवारी झालेल्या पावसानंतर पुराचा जोर इतका प्रचंड होता की, सकवार येथे एका महिलेचे घर पत्त्यासारखे कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)