शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

वसई विरार शहर महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:25 IST

दिवाणमान अंबाडी रोड येथे महापालिकेने जलतरण तलाव परिसरात दुसºया मजल्यावर अत्याधुनिक वातानुकुलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटींग रेंजची उभारणा केलेली आहे.

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेने विकसित केलेल्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षीतिज ठाकूर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेने तामतलाव येथे अद्यावत सेमी आॅलिम्पक दर्जाचा जलतरण तलाव उभारला असून सदर जलतरण तलावासाठी साडे चार कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पामध्ये जलतरण तलाव, बेबीजलतरण तलाव, इनडोअर स्पोर्टस कॉम्प्लेक्स इत्यादी कामाचा समावेश आहे.

दिवाणमान अंबाडी रोड येथे महापालिकेने जलतरण तलाव परिसरात दुसºया मजल्यावर अत्याधुनिक वातानुकुलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटींग रेंजची उभारणा केलेली आहे. त्यासाठी एक कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदरचा शुटींग रेंजमध्ये १० मी. एयर रायफल, एयर पिस्तोल, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग टार्गेट (थ्रीडी स्फोअर) ८ टार्गेटची सुविधा असणार आहे. वसई, पालघर, अंधेरी या परिसरामध्ये अशा प्रकारचे अत्याधुनिक शुटींग रेंज अस्तित्वात नाही. वसई विरार शहर महानगरपालिकेस श्वेतांबर स्थानिकवासी जैन संघाने आरोग्य केंद्रासाठी माणिकपूर वसई येथे सुमारे १२०० चौ.फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर ठिकाणी महानगरपालिकेमार्फत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी रूग्णासाठी पूर्णवेळ फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ज्ञ उपलब्ध असणार आहे. महानगरापलिकेच्या या सुविधामुळे नवघर माणिकपूर परिसरातील गोरगरिब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्यानंतर आरोग्य केंद्र लोकापर्णाचा मुख्य कार्यक्रम समाज उन्नती मंडळ, माणिकपूर येथे होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्र मास उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर प्रवीण शेट्टी यांनी केले आहे. तसेच सकाळी ११ वाजता सनसिटी दिवाणमान ते वसई स्टेशन अशी महानगरपालिकेची बस सेवा चालू होणार असून त्याचे उद्घाटन प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर व माजी महापौर नारायण मानकर यांच्या हस्ते होणार आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्पोर्टस विषयक विकास कामांमुळे स्थानिक खेळांडूना स्थानिक पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धामध्ये भाग घेणे शक्य होईल. महापालिकेने गत वर्षाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी व घोषणांची अंमलबजावणी विहित मुदतीत होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलेले आहे.