शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

विरोध असेल तर आम्ही जनतेबरोबर राहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:04 IST

प्रवीण दरेकर : वाढवण प्रकल्प नेमका काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, ते समजावून सांगणार

पालघर : प्रकल्प नेमका काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. याउपर इथल्या सरकारला आणि जनतेला या प्रकल्पाला विरोध असेल तर आम्ही जनतेबरोबर राहू, असे भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केंद्राने वाढवण बंदराची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर सांगितले.

कोळी महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना आखण्यासाठी कोळी-मच्छीमार मेळाव्याचे आयोजन दांडी येथे मंगळवारी पार पडले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

या मेळावानिमित्ताने प्रसिद्ध केलेल्या आमंत्रण पत्रिकेवर असलेल्या १७ समस्यांपैकी अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न आ. रमेश पाटील यांनी केल्याचे सांगून मच्छीमारांच्या डिझेल परताव्याचे वाटप कालबद्ध पद्धतीने व्हावे अशा सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आ. दरेकर यांनी सांगितले. डिझेल परताव्याच्या निधीतील मोठी रक्कम दुर्दैवाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आल्याने पालघरला कमी निधी मिळाला. त्यामुळे एक मच्छीमार समाज बांधव म्हणून त्यांच्या जिल्ह्यातील प्रश्नाकडे संवेदनशीलतेने लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मच्छीमारांचे प्रश्न सुटावे यासाठी कोळी महासंघाचे पदाधिकारी दिवस-रात्र फिरून मेहनत घेत आहेत. शिवस्मारकाला आम्ही विरोध केला असून आमच्या ३०० मच्छीमारांची नुकसान भरपाई देत त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यास आमचा शिवस्मारकाला विरोध नसल्याचे आ. रमेश पाटील म्हणाले. अन्य राज्यातील मच्छीमारांचे प्रश्न सुटतात, मग आमचेच प्रश्न का सुटत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून तामिळनाडू, केरळ राज्यातील मच्छीमार महिलांसाठी राखीव फंड ठेवला जातो, मग इथे का नाही, असा सवाल त्यांनी केला. दांडी गावातील अनेक महिला रस्त्यावर मासे विक्रीसाठी बसतात, त्यांनी मागणी केल्यास मच्छीमार्केट उभारणीसाठी आपला आमदार निधी देण्याचे आश्वासन दिले. एनसीडीसीचे कर्ज, व्याज थकीत असल्यावर अन्य कर्ज मिळत नाही, मात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करून त्यांना नव्याने कर्ज दिले जाते. मग एका राज्यात वेगवेगळे न्याय का? असा सवाल त्यांनी केला.जबाबदारी आमचीमच्छीमारांना डिझेल परतावा मिळवून देण्याची जबाबदारी आता आ. दरेकर व माझी असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील सर्व खाड्या प्रदूषित झाल्या असून तारापूर, पालघरमधील कारखान्यातील प्रदूषित पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते पाणी कारखानदार सोडत असल्याने मत्स्यसंपदा नष्ट होत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.