शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार जिल्हा निर्मितीचे कागदी घोडे हलू लागले

By admin | Updated: August 18, 2015 00:20 IST

राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा

वसई : राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाच्या चर्चेला वेग आला आहे. या मध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार हा भाग वेगळाकरून हा नवा जिल्हा निर्माण करण्याची योजना विचाराधीन आहे, अशी माहिती आहे. अजून तरी हे सर्व कागदी घोड्यांच्याच स्वरुपात असले तरी, त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा आततायीपणाचा प्रकार असल्याचे सांगितले तर काही संस्था व उद्योजकांनी युती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.या प्रस्तावानुसार पालघर जिल्ह्यातील जव्हार वेगळे करून नवीन जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव असून या संदर्भात राज्य सरकार आमदारांचे मनोगत जाणून घेत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. त्यावेळी अनेक नागरीकांनी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे डोंगरी, सागरी, व नागरी असे तीन जिल्हे करण्यात यावेत अशी मागणी केली होती. परंतु तत्कालीन आघाडी सरकारने या मागणीचा विचार न करता सरसकट विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण केला. (प्रतिनिधी)