शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

शासनाचे कर्ज फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

बोट समुद्रात बुडाली : तांडेल यांचा सवाल

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : मत्स्य दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे शासनाकडून बोट बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ता भरणे शक्य नाही, त्यातच भाड्याने उत्तन येथे दिलेली ‘साई लक्ष्मी’ ही बोटही समुद्रात बुडाल्याने मालक अनिल काशीनाथ तांडेल यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा चढला असून हे लाखो रुपयांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत मालक सापडला असून आपल्यावर आत्महत्येची पाळी ओढवल्याने शासनाने आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे. दरम्यान, शासनाच्या २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे नैसर्गिक आपत्ती दरम्यान बोटीचे संपूर्ण नुकसान झाल्यास बोट मालकाला अवघे ९ हजार ६०० रुपयांच्या नुकसान भरपाईचे प्रयोजन आहे. इथे ३० ते ४० लाखाच्या रक्कमेची बोट आणि साहित्य असे नुकसान झाले असताना शासनाने आपल्यावरील कर्जाची रक्कम माफ करून पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणीही तांडेल यांनी शासनाकडे केली आहे.

सातपाटी येथे राहणारे अनिल काशीनाथ तांडेल यांनी शासनाच्या एनसीडीसी योजनेअंतर्गत २००७ मध्ये ११ लाख ५२ हजार १०० रुपयाांचे कर्ज घेतले. एकूण ९६ हप्त्यात दरमहा १२ हजार रु पये ८ वर्षात भरण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. बोटीला मासेच मिळत नसतानाही खलाशांचा वाढलेला पगार, डिझेल, जाळी, दोरखंड, बर्फाचे वाढते दर आदी बाबीमुळे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसतानाही त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे २ लाख ४४ हजार ९५३ रुपयांची रक्कम भरणा केली. त्यानंतर त्यांनी काही महिने आपली बोट बंदही ठेवली. त्यांच्या कर्जातील ९ लाख ७ हजार १४७ रु पयांची थकबाकी आणि भाग भांडवलाची ६ लाख २८ हजार ५०० अशी एकूण १५ लाख ३५ हजार ६४७ हजाराची निव्वळ थकबाकी बोट मालक अनिल तांडेल यांच्यावर असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी लोकमतला दिली. स्वत: पाटील यांनी आपल्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात ३३ वाव खोल पाण्यात घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आपदग्रस्त मच्छीमारांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले. १६ डिसेंबर रोजी ही बोट उत्तनच्या समोर समुद्रात मासेमारी करीत असताना वादळी वारे आणि महाकाय लाटेच्या तडाख्याने उलटली. तेव्हा ही बोट भाड्याने देण्यात आली होती. बोटीत असलेल्या तांडेल विजय बगाजी आणि विक्रमगडच्या दादडे पाड्यावरील १० आदिवासी खलाशी कामगारांनी समुद्रात उड्या घेतल्या.८ - १० लाखांचे नुकसानच्दुर्घटनेनंतर बोटीतील लाखो रुपयांची जाळी, ४०० लिटर्स डिझेल, ४५ हजाराचा वायरलेस सेट, ४० हजाराच्या बॅटऱ्या तसेच दुर्घटनाग्रस्त बोट आणण्यासाठी समुद्रात पाठविलेल्या बोटीच्या डिझेलचा दीड लाख खर्च असा सुमारे ८ ते १० लाखाच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती संगीता बगाजी यांनी लोकमतला दिली.शासनाने २०१७-१८ साली काढलेल्या नवीन शासन आदेशाप्रमाणे आपद्ग्रस्तमच्छीमारांचे सर्व कर्ज माफ करून त्याचे पुनर्वसन करावे.- राजन मेहेर, अध्यक्ष,सातपाटी मच्छिमार सहकारी संस्था