शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे कर्ज फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

बोट समुद्रात बुडाली : तांडेल यांचा सवाल

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : मत्स्य दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे शासनाकडून बोट बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ता भरणे शक्य नाही, त्यातच भाड्याने उत्तन येथे दिलेली ‘साई लक्ष्मी’ ही बोटही समुद्रात बुडाल्याने मालक अनिल काशीनाथ तांडेल यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा चढला असून हे लाखो रुपयांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत मालक सापडला असून आपल्यावर आत्महत्येची पाळी ओढवल्याने शासनाने आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे. दरम्यान, शासनाच्या २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे नैसर्गिक आपत्ती दरम्यान बोटीचे संपूर्ण नुकसान झाल्यास बोट मालकाला अवघे ९ हजार ६०० रुपयांच्या नुकसान भरपाईचे प्रयोजन आहे. इथे ३० ते ४० लाखाच्या रक्कमेची बोट आणि साहित्य असे नुकसान झाले असताना शासनाने आपल्यावरील कर्जाची रक्कम माफ करून पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणीही तांडेल यांनी शासनाकडे केली आहे.

सातपाटी येथे राहणारे अनिल काशीनाथ तांडेल यांनी शासनाच्या एनसीडीसी योजनेअंतर्गत २००७ मध्ये ११ लाख ५२ हजार १०० रुपयाांचे कर्ज घेतले. एकूण ९६ हप्त्यात दरमहा १२ हजार रु पये ८ वर्षात भरण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. बोटीला मासेच मिळत नसतानाही खलाशांचा वाढलेला पगार, डिझेल, जाळी, दोरखंड, बर्फाचे वाढते दर आदी बाबीमुळे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसतानाही त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे २ लाख ४४ हजार ९५३ रुपयांची रक्कम भरणा केली. त्यानंतर त्यांनी काही महिने आपली बोट बंदही ठेवली. त्यांच्या कर्जातील ९ लाख ७ हजार १४७ रु पयांची थकबाकी आणि भाग भांडवलाची ६ लाख २८ हजार ५०० अशी एकूण १५ लाख ३५ हजार ६४७ हजाराची निव्वळ थकबाकी बोट मालक अनिल तांडेल यांच्यावर असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी लोकमतला दिली. स्वत: पाटील यांनी आपल्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात ३३ वाव खोल पाण्यात घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आपदग्रस्त मच्छीमारांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले. १६ डिसेंबर रोजी ही बोट उत्तनच्या समोर समुद्रात मासेमारी करीत असताना वादळी वारे आणि महाकाय लाटेच्या तडाख्याने उलटली. तेव्हा ही बोट भाड्याने देण्यात आली होती. बोटीत असलेल्या तांडेल विजय बगाजी आणि विक्रमगडच्या दादडे पाड्यावरील १० आदिवासी खलाशी कामगारांनी समुद्रात उड्या घेतल्या.८ - १० लाखांचे नुकसानच्दुर्घटनेनंतर बोटीतील लाखो रुपयांची जाळी, ४०० लिटर्स डिझेल, ४५ हजाराचा वायरलेस सेट, ४० हजाराच्या बॅटऱ्या तसेच दुर्घटनाग्रस्त बोट आणण्यासाठी समुद्रात पाठविलेल्या बोटीच्या डिझेलचा दीड लाख खर्च असा सुमारे ८ ते १० लाखाच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती संगीता बगाजी यांनी लोकमतला दिली.शासनाने २०१७-१८ साली काढलेल्या नवीन शासन आदेशाप्रमाणे आपद्ग्रस्तमच्छीमारांचे सर्व कर्ज माफ करून त्याचे पुनर्वसन करावे.- राजन मेहेर, अध्यक्ष,सातपाटी मच्छिमार सहकारी संस्था