शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

शासनाचे कर्ज फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

बोट समुद्रात बुडाली : तांडेल यांचा सवाल

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : मत्स्य दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे शासनाकडून बोट बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ता भरणे शक्य नाही, त्यातच भाड्याने उत्तन येथे दिलेली ‘साई लक्ष्मी’ ही बोटही समुद्रात बुडाल्याने मालक अनिल काशीनाथ तांडेल यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा चढला असून हे लाखो रुपयांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत मालक सापडला असून आपल्यावर आत्महत्येची पाळी ओढवल्याने शासनाने आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे. दरम्यान, शासनाच्या २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे नैसर्गिक आपत्ती दरम्यान बोटीचे संपूर्ण नुकसान झाल्यास बोट मालकाला अवघे ९ हजार ६०० रुपयांच्या नुकसान भरपाईचे प्रयोजन आहे. इथे ३० ते ४० लाखाच्या रक्कमेची बोट आणि साहित्य असे नुकसान झाले असताना शासनाने आपल्यावरील कर्जाची रक्कम माफ करून पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणीही तांडेल यांनी शासनाकडे केली आहे.

सातपाटी येथे राहणारे अनिल काशीनाथ तांडेल यांनी शासनाच्या एनसीडीसी योजनेअंतर्गत २००७ मध्ये ११ लाख ५२ हजार १०० रुपयाांचे कर्ज घेतले. एकूण ९६ हप्त्यात दरमहा १२ हजार रु पये ८ वर्षात भरण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. बोटीला मासेच मिळत नसतानाही खलाशांचा वाढलेला पगार, डिझेल, जाळी, दोरखंड, बर्फाचे वाढते दर आदी बाबीमुळे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसतानाही त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे २ लाख ४४ हजार ९५३ रुपयांची रक्कम भरणा केली. त्यानंतर त्यांनी काही महिने आपली बोट बंदही ठेवली. त्यांच्या कर्जातील ९ लाख ७ हजार १४७ रु पयांची थकबाकी आणि भाग भांडवलाची ६ लाख २८ हजार ५०० अशी एकूण १५ लाख ३५ हजार ६४७ हजाराची निव्वळ थकबाकी बोट मालक अनिल तांडेल यांच्यावर असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी लोकमतला दिली. स्वत: पाटील यांनी आपल्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात ३३ वाव खोल पाण्यात घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आपदग्रस्त मच्छीमारांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले. १६ डिसेंबर रोजी ही बोट उत्तनच्या समोर समुद्रात मासेमारी करीत असताना वादळी वारे आणि महाकाय लाटेच्या तडाख्याने उलटली. तेव्हा ही बोट भाड्याने देण्यात आली होती. बोटीत असलेल्या तांडेल विजय बगाजी आणि विक्रमगडच्या दादडे पाड्यावरील १० आदिवासी खलाशी कामगारांनी समुद्रात उड्या घेतल्या.८ - १० लाखांचे नुकसानच्दुर्घटनेनंतर बोटीतील लाखो रुपयांची जाळी, ४०० लिटर्स डिझेल, ४५ हजाराचा वायरलेस सेट, ४० हजाराच्या बॅटऱ्या तसेच दुर्घटनाग्रस्त बोट आणण्यासाठी समुद्रात पाठविलेल्या बोटीच्या डिझेलचा दीड लाख खर्च असा सुमारे ८ ते १० लाखाच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती संगीता बगाजी यांनी लोकमतला दिली.शासनाने २०१७-१८ साली काढलेल्या नवीन शासन आदेशाप्रमाणे आपद्ग्रस्तमच्छीमारांचे सर्व कर्ज माफ करून त्याचे पुनर्वसन करावे.- राजन मेहेर, अध्यक्ष,सातपाटी मच्छिमार सहकारी संस्था