शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

पालघरसह वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:21 IST

विजेचा लपंडाव : वसईत ४० झाडे कोसळल्याच्या घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/पारोळ : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा पालघर जिल्ह्याला सर्वात मोठा धोका होता. मात्र हे वादळ पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेच नसल्याने येथील नागरिकांचे होऊ पाहणारे संभाव्य नुकसान टळले. या वादळाशी दोन हात करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली होती. दरम्यान, वादळ शमले असले तरी गुरुवारी सकाळपासूनच वसईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अनेक सखल परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.बुधवारपासूनच ग्रामीण व शहरी भागात चक्रीवादळाच्या भीतीने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता, तर ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू होता. वादळामुळे वसई तालुक्यात फारसे नुकसान झाले नसले तरी काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुधवारी दुपारपासून ते गुरुवारी संध्याकाळपर्यंत ४० ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन होणे बाकी आहे. त्यामुळे आत्ताचा पाऊस हा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पडल्याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. साहजिकच जोवर मृगाचा पाऊस कोसळत नाही तोवर शेतकरी नांगर धरणार नाहीत.यंदा कोरोनाच्या आपत्तीबरोबरच नैसर्गिक आपत्तीलाही शेतकºयांना तोंड द्यावे लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी असल्याने बºयाचशा शेतकºयांना यंदा शेतीकामासाठी मजूर मिळण्याची शक्यता कमी आहे. साहजिकच, कोरोनाचा यंदा शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.