शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कुपोषणाच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री उदासीन

By admin | Updated: November 7, 2015 00:14 IST

जव्हार-मोखाड्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण असून पालघर जिल्ह्णात ५ हजार १६२ पेक्षा अधिक आदिवासी बालके तीव्र कुपोषित आहेत. अशी धक्कादायक आकडेवारी असताना कुपोषीत

पालघर : जव्हार-मोखाड्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण असून पालघर जिल्ह्णात ५ हजार १६२ पेक्षा अधिक आदिवासी बालके तीव्र कुपोषित आहेत. अशी धक्कादायक आकडेवारी असताना कुपोषीत बालकासाठी सुरू असलेले ग्राम बालविकास केंद्र (वीसीडीसी) बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णु सवरा हे बघ्याची भुमीका घेत असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहासमोर ठिय्या आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. पालघर पोलीसांनी आंदोलनक र्त्यांना ताब्यात घेतले आहे.जव्हार-मोखाड्यातील भागाला शाप ठरलेला कुपोषणाचा प्रश्न अनेक वर्षापासून जैसे थे परिस्थितीत पडून असून कुपोषणाच्या निर्मूलनासाठी आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाने हजारो कोटी रू. चा खर्च केला आहे. मात्र योग्य नियोजन व शासन स्तरावरील उदासीनता यामुळे कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नाचे उच्चाटन करण्यात आजपर्यंत यश आलेले नाही. पालघर जिल्ह्णात आजही ५ हजार १६२ पेक्षा अधिक आदिवासी बालके तीव्र कुपोषीत आहेत. ही धक्कादायक आकडेवारी असताना जिल्ह्णात कुठेच कुपोषण नाही असा अजब शोध पालघर जिल्हापरिषदेमधील एका लोकप्रतिनिधीने लावून तसे एका कार्यक्रमात जाहीर केल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद उमटले होते. त्यावरून लोकप्रतिनिधींना कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नाचे किती गांभीर्य आहे हे दिसून आले आहे.कुपोषणासारख्या गंभीर प्रकाराचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने ग्रामबालविकास केंद्र उभारण्यात आली होती. ही केंद्रे निधीअभावी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेऊन तसेच पत्रही आरोग्य विभागाने काढले आहे. त्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून पालघर-ठाणे जिल्ह्णातील हजारो आदिवासी श्रमजीवी बांधव ९ नोव्हेंबर रोजी वाडा येथील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार आहे, असा इशारा बाळाराम भोईर यांनी सांगितले. (वार्ताहर)