शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

वाढवण बंदर : सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

By admin | Updated: October 12, 2015 04:32 IST

वाढवण बंदराचे भूत बाटलीमध्ये बंद झाले होते. परंतु, त्या बाटलीचे झाकण पुन्हा एकदा उघडल्याने वाढवण तसेच पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दीपक मोहिते, वसईवाढवण बंदराचे भूत बाटलीमध्ये बंद झाले होते. परंतु, त्या बाटलीचे झाकण पुन्हा एकदा उघडल्याने वाढवण तसेच पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९९६ मध्ये पी अ‍ॅण्ड ओ या आॅस्ट्रेलियन कंपनीला येथे वाढवण बंदर उभारण्यास परवानगी दिली होती, परंतु ग्रामस्थांनी उठाव केल्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला होता. परंतु, आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने पुन्हा हे बंदर व्हावे, याकरिता प्रयत्न सुरू केल्यामुळे येथील सर्व गावे आता संघर्षाच्या पवित्र्यात उभी आहेत. दुसरीकडे पालघर तालुक्यात जिंदाल उद्योग समूहाच्या जेटीला विरोध होत असून ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत.वाढवण, अर्नाळा, पुन्हा वाढवण व आता जेटी केंद्र सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे ग्रामस्थांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे. २० वर्षांपूर्वी ज्या राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केला होता, त्या पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची चांगलीच कोंडी झाली आहे. स्थानिकांचा रोष पत्करण्याऐवजी त्यांनी लोकांसमवेत राहण्याचा निर्णय घेतला व तेही आता आंदोलनात सहभागी झाले आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नावरून आजवर अनेक प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर चालवला आहे. उद्योगपतींसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पायघड्या पसरल्या असल्या तरी स्थानिकांना डावलून चालणार नाही. पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी असलेल्या गावांतील जमिनी सुपीक आहेत. या जमिनीवर भूमिपुत्र वर्षानुवर्षे विविध कृषी उत्पादने घेत असतो. त्या जमिनीची विल्हेवाट अशा प्रकारे लावण्यास तो सहजासहजी तयार होणार नाही. तसेच येथील समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मच्छीमार समाजाच्या भवितव्याचे काय, याचा विचार सरकारने करायला हवा. पण, तसा तो होत नाही. हे सरकारच्या वागण्यावरून स्पष्ट होत आहे. पहिले वाढवण व त्यानंतर अर्नाळा येथे आलेल्या अनुभवांवरून तरी सरकारने शहाणे व्हावे.लोकांनी या दोन्ही प्रकल्पांस कडाडून विरोध केला आहे. या विरोधामागची कारणे सरकारने तपासून पाहायला हवीत. या प्रकल्पांमुळे स्थानिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर सरकारने अशा प्रकल्पांबाबत फेरविचार करणे आवश्यक आहे. कारण, आपल्या राज्यघटनेनुसार विकासाचा केंद्रबिंदू हा कॉमन मॅन आहे. त्याला उद्ध्वस्त करून त्याच्या उरावर प्रकल्प उभारणे, हे नैतिकतेला धरून नाही. असे प्रकल्प राबवण्यापूर्वी सरकारने स्थानिक भूमिपुत्रांसमोर नफा तोट्याचा लेखाजोखा मांडायला हवा. त्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी. प्रकल्प राबवल्यानंतर विस्थापितांना वाऱ्यावर सोडले जाते, असा आजवरचा अनुभव आहे. गुजरात राज्यात जे शक्य झाले, ते महाराष्ट्रात होईलच, असे गृहीत धरून सरकारने प्रयत्न करू नयेत. भूमी अधिग्रहण कायद्यातील बदलाबाबत सरकारचे हात पोळले आहेत. वाढवण व नांदगाव येथील जिंदाल उद्योग समूहाची जेटी या दोन प्रकल्पांबाबतही सरकार माघार घेणार, यामध्ये शंका नाही. म्हणून सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. सर्वोच्च न्यायालयाने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या त्रुटीमुळे तसेच पर्यावरणाच्या प्रश्नावरून रेती व्यवसायावर कडक निर्बंध टाकले आहेत. तर, दुसरीकडे सरकार पर्यावरणाचे संतुलन बिघडवणाऱ्या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवत आहे. यावरून सरकारच्या हेतूबाबत संशय घेण्यास वाव आहे.