शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

श्रमदानाने आली शासनाला जाग

By admin | Updated: July 10, 2016 00:28 IST

‘आम्ही सातपाटीकर’च्या माध्यमातून शुक्रवारी ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधाऱ्याची भगदाडे बुजविण्याचे काम हाती घेतल्यानंतर आज राज्य शासनाच्या पतन विभागाला जाग आली असून कार्यकारी

पालघर : ‘आम्ही सातपाटीकर’च्या माध्यमातून शुक्रवारी ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधाऱ्याची भगदाडे बुजविण्याचे काम हाती घेतल्यानंतर आज राज्य शासनाच्या पतन विभागाला जाग आली असून कार्यकारी अभियंता आर.डी. मिसाळ यांनी बंधाऱ्याला भेट दिली. या वेळी बंधाऱ्याला पडलेल्या भगदाडीमध्ये मोठ्या आकाराच्या दगडासह मातीच्या मोठमोठ्या पिशव्या रचून समुद्राच्या लाटा थोपविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.सातपाटीचा संरक्षक बंधारा नव्याने उभारून त्याची उंची वाढविण्याच्या दृष्टीने १७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनदरबारी असून त्यातील ५ कोटी रुपयांच्या पहिल्या निधीच्या प्रस्तावाला लवकरच (दिवाळीपर्यंत) मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे कळते. तर दुसऱ्या टप्प्यातील १० कोटींचा प्रस्तावही मान्यतेसाठी शासनाकडे असून सातपाटीतील लोकप्रतिनिधी, संस्था शासनस्तरावर पाठपुरावा करीत असल्याचे राजन मेहेर यांनी सांगितले. शनिवारी सकाळीच राज्य शासनाच्या पतन विभागाचे अभियंते मिसाळ, भाकरू, सहसरपंच मेहेर, मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, संतोष मेहेर, भुवनेश्वर मेहेर, अनिल चौधरी, विठोबा चौधरी, जयप्रकाश मेहेर, भगतसिंग पागधरे, मुकेश मेहेर इ.नी दुरवस्था झालेल्या भागाची पाहणी केली. या वेळी ५०० ते १०० किग्रा वजनाचे मोठे दगड, भगदाडे पडलेल्या ठिकाणी रचून ठेवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सातपाटीकरांच्या घरात पाणी शिरत असतानां कुठलीही मदत उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त झाला. (प्रतिनिधी) निधी प्राप्त झाल्यानंतर बंधाऱ्याचे कामहा सर्व निधी प्राप्त झाल्यानंतर ५०० ते ६०० मीटर लांब आणि सुमारे सात मीटर उंचीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे काम प्रथम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन ही संस्था काम करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.अतिक्रमणे ठरणार अडचणीची : हे काम सुरू करताना बंधाऱ्यालगत वाढणारी अतिक्रमणे ही मोठी अडचणीची ठरणार असून ही अतिक्रमणे रोखण्याची कामे प्रथम स्थानिक प्रशासनाला करावी लागतील. नाहीतर बंधारा उभारणीचे काम सुरू करणे कठीण होईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.राज्यकर्त्यांवर गावकऱ्यांमध्ये नाराजी- सातपाटीच्या संरक्षक बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्यानंतर समुद्राची आक्र मणे किनाऱ्यावरील घरावर होऊन त्यांचे संसार उद्ध्वस्थ होऊ लागली होती. अशा वेळी शासन, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ युद्धपातळीवरून मदतकार्य उपलब्ध होईल, अशी माफक अपेक्षा होती. - दिवसेंदिवस समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन किनाऱ्यावरील घरांना महाकाय लाटा धडका देत असल्याने मिळेल त्या वस्तूंचा आधार आपल्या घरांना देत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक कुटुंब दिवसरात्र झटत होते. शासनाकडून मदत न मिळाल्याने शेवटी गावकरी मैदानात उतरले.