शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वसुलीबाबत शासन आग्रही हवे

By admin | Updated: October 5, 2015 00:13 IST

शासनाने गेल्या वर्षापासून ‘एक्स्टेंशन टू शेड्यूल्ड एरिया’ ही योजना सुरू केली आहे. आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, असा उद्देश ही योजना कार्यान्वित करण्यामागे आहे

दीपक मोहिते, वसईशासनाने गेल्या वर्षापासून ‘एक्स्टेंशन टू शेड्यूल्ड एरिया’ ही योजना सुरू केली आहे. आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, असा उद्देश ही योजना कार्यान्वित करण्यामागे आहे. या योजनेंतर्गत आदिवासी योजनेतून ५ टक्के निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. २०१४ या आर्थिक वर्षातील निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाचा निर्णय स्तुत्य असला तरी सध्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याची गरज आहे. घरपट्टी वसुली बंद असल्याने तमाम ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती ढासळली आहे. एखादा चांगला निर्णय घेताना या प्रश्नाचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे. केवळ ५ टक्के आर्थिक निधी जमा करून विकासकामे होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.राज्याच्या ग्रामीण भागातील शेती, पाणी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, कुपोषण असे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत, अशा प्रलंबित प्रश्नांमुळे ग्रामीण भाग स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही मागासलेला आहे. वित्त आयोगाकडून मिळणारा निधी, गावागावांतून जमा होणारी घरपट्टी व मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारा महसूल अशा आर्थिक स्त्रोतांमधून ग्रामपंचायती ग्रामीण भागामध्ये विकासकामे करीत असतात. परंतु, काही महिन्यांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे घरपट्टी वसुलीला स्थगिती देण्यात आली. या माध्यमातून ग्रामपंचायतींना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांना निधी देणे ग्रामपंचायतींना सहज शक्य होत असते. परंतु, हा स्रोतच बंद पडल्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक संकटात सापडल्या आहेत. पेसा गाव योजनेतून मिळणारा निधी हा तुटपुंजा असून त्यामधून भरीव विकासकामे होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.शासनाने घरपट्टी वसुलीवरील स्थगिती उठवण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. या स्थगितीमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सध्या वेतन मिळणे कठीण झाले आहे. चार महिन्यांपासून हे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. पेसांतर्गत मिळणारा आर्थिक निधी, घरपट्टी वसुली पुन्हा सुरू झाल्यास ग्रामीण भागातील ठप्प झालेली विकासकामे मार्गी लागू शकतील. घरपट्टी वसुली नसल्याने ग्रामपंचायतींना सध्या दैनंदिन खर्चही भागवणे शक्य होत नाही. तर, दुसरीकडे कर्मचारीवर्ग या प्रश्नी लवकर निर्णय लागेल, अशा अपेक्षेत विनावेतन काम करीत आहे. पंचायतराज व्यवस्था स्वीकारणाऱ्या पुरोगामी राज्याला हे शोभेसे नाही.