शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

घरपट्टी वसुलीबाबत शासन आग्रही हवे

By admin | Updated: October 5, 2015 00:13 IST

शासनाने गेल्या वर्षापासून ‘एक्स्टेंशन टू शेड्यूल्ड एरिया’ ही योजना सुरू केली आहे. आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, असा उद्देश ही योजना कार्यान्वित करण्यामागे आहे

दीपक मोहिते, वसईशासनाने गेल्या वर्षापासून ‘एक्स्टेंशन टू शेड्यूल्ड एरिया’ ही योजना सुरू केली आहे. आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, असा उद्देश ही योजना कार्यान्वित करण्यामागे आहे. या योजनेंतर्गत आदिवासी योजनेतून ५ टक्के निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. २०१४ या आर्थिक वर्षातील निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाचा निर्णय स्तुत्य असला तरी सध्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याची गरज आहे. घरपट्टी वसुली बंद असल्याने तमाम ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती ढासळली आहे. एखादा चांगला निर्णय घेताना या प्रश्नाचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे. केवळ ५ टक्के आर्थिक निधी जमा करून विकासकामे होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.राज्याच्या ग्रामीण भागातील शेती, पाणी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, कुपोषण असे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत, अशा प्रलंबित प्रश्नांमुळे ग्रामीण भाग स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही मागासलेला आहे. वित्त आयोगाकडून मिळणारा निधी, गावागावांतून जमा होणारी घरपट्टी व मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारा महसूल अशा आर्थिक स्त्रोतांमधून ग्रामपंचायती ग्रामीण भागामध्ये विकासकामे करीत असतात. परंतु, काही महिन्यांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे घरपट्टी वसुलीला स्थगिती देण्यात आली. या माध्यमातून ग्रामपंचायतींना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांना निधी देणे ग्रामपंचायतींना सहज शक्य होत असते. परंतु, हा स्रोतच बंद पडल्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक संकटात सापडल्या आहेत. पेसा गाव योजनेतून मिळणारा निधी हा तुटपुंजा असून त्यामधून भरीव विकासकामे होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.शासनाने घरपट्टी वसुलीवरील स्थगिती उठवण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. या स्थगितीमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सध्या वेतन मिळणे कठीण झाले आहे. चार महिन्यांपासून हे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. पेसांतर्गत मिळणारा आर्थिक निधी, घरपट्टी वसुली पुन्हा सुरू झाल्यास ग्रामीण भागातील ठप्प झालेली विकासकामे मार्गी लागू शकतील. घरपट्टी वसुली नसल्याने ग्रामपंचायतींना सध्या दैनंदिन खर्चही भागवणे शक्य होत नाही. तर, दुसरीकडे कर्मचारीवर्ग या प्रश्नी लवकर निर्णय लागेल, अशा अपेक्षेत विनावेतन काम करीत आहे. पंचायतराज व्यवस्था स्वीकारणाऱ्या पुरोगामी राज्याला हे शोभेसे नाही.