शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

मच्छीमारांचा मंगळवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:11 IST

आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी आपले किनारे बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात २५ जुलै रोजी विधानभवनावर मच्छिमारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने हा मोर्चा आयोजित केला असून जनजागृतीसाठी किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील सर्व गावे ढवळून काढण्यात आली आहेत. १० जुलैपासून डहाणू तालुक्यातील झाई गावापासून सुरुवात करण्यात येऊन डहणू, वाढवण, वरोर, चिंचणी, तारापूर, उच्छेली, दांडी, नवापूर, मुरबे, खारेकुरण, सातपाटी, वडराई, केळवे, एडवण, कोरे, दातीवरे, अर्नाळा, खोचिवडे, नायगाव, वसई पाचू बंदर, किल्ला, उत्तन, चौक, डोंगरी, पाली, गोराई, मनोरी, मालवणी, भाटी, मढ, वर्सोवा, मोरागाव, जुहूतारा, खारदांडा, माहीम, वरळी, कुलाबा, कफपरेड या मच्छीमारांच्या सर्व गावात जाऊन मच्छीमारांच्या अस्तित्वावर आलेली संकटांची व ती दूर करण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चाची माहिती देण्यात आली आहे. या प्रचार दौऱ्यात एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलॅसो कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस, किरण कोळी, अशोक नाईक, अशोक आंभिरे, फिलिप मस्तान, मोरेश्वर वैती, पौर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, मोरेश्वर पाटील, परशुराम मेहेर, रमेश मेहेर, कुमार मेहेर, जयेश भोईर, जयश्री भांजी, रेखा किणी सहभागी झाले होते.सर्वच राजकीय नेते मच्छीमारी हा शेती समान व्यवसाय असल्याचे सांगत असले तरी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती, कर्जमाफी, अल्प व्याजदराचे कर्ज देते वेळी मात्र आपले हात आखडते घेत आहेत.