शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

मच्छीमारांचा मंगळवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:11 IST

आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी आपले किनारे बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात २५ जुलै रोजी विधानभवनावर मच्छिमारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने हा मोर्चा आयोजित केला असून जनजागृतीसाठी किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील सर्व गावे ढवळून काढण्यात आली आहेत. १० जुलैपासून डहाणू तालुक्यातील झाई गावापासून सुरुवात करण्यात येऊन डहणू, वाढवण, वरोर, चिंचणी, तारापूर, उच्छेली, दांडी, नवापूर, मुरबे, खारेकुरण, सातपाटी, वडराई, केळवे, एडवण, कोरे, दातीवरे, अर्नाळा, खोचिवडे, नायगाव, वसई पाचू बंदर, किल्ला, उत्तन, चौक, डोंगरी, पाली, गोराई, मनोरी, मालवणी, भाटी, मढ, वर्सोवा, मोरागाव, जुहूतारा, खारदांडा, माहीम, वरळी, कुलाबा, कफपरेड या मच्छीमारांच्या सर्व गावात जाऊन मच्छीमारांच्या अस्तित्वावर आलेली संकटांची व ती दूर करण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चाची माहिती देण्यात आली आहे. या प्रचार दौऱ्यात एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलॅसो कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस, किरण कोळी, अशोक नाईक, अशोक आंभिरे, फिलिप मस्तान, मोरेश्वर वैती, पौर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, मोरेश्वर पाटील, परशुराम मेहेर, रमेश मेहेर, कुमार मेहेर, जयेश भोईर, जयश्री भांजी, रेखा किणी सहभागी झाले होते.सर्वच राजकीय नेते मच्छीमारी हा शेती समान व्यवसाय असल्याचे सांगत असले तरी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती, कर्जमाफी, अल्प व्याजदराचे कर्ज देते वेळी मात्र आपले हात आखडते घेत आहेत.