शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वसईत खंडणीचे चार गुन्हे, माहिती अधिकारामुळे अनेकजण रडारव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:12 IST

वसई : माहितीच्या अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात एकाच रात्री चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली असून शिवसेना नगरसेवकाविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा ...

वसई : माहितीच्या अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात एकाच रात्री चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली असून शिवसेना नगरसेवकाविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्याविरोधात पाच लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिक्षण संस्थेच्या बांधकामाची तक्रार करून गुंजाळकर यांनी खंडणी मागितल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. याप्रकरणी गुंजाळकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.शिवसेना नगरसेवक धनजंय गावडे यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात दोन आणि विरार पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विरार येथील बिल्डरने दिलेल्या तक्रारीवरून गावडे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपींनी पत्तीस लाख रुपयांची खंडणी घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात गावडे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी अरुण सिंग यांच्याविरोधातही तुळींज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, माहिती अधिकारात मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वसई विरार परिसरात खळबळ उडाली आहे.माहिती अधिकारामुळे अनेकजण रडारवरवसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक बिल्डर गत काही वर्षांमध्ये भरडले गेले आहेत. त्यांच्या विरोधात माहिती मागवून त्यांना ब्लॅकमेल करण्याच प्रकारही उघड झाले असल्याने हा विषय संवेदनशिल बनला आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी या प्रकरणी आवाहन करुन ज्यांच्याकडून खंडणी घेतली आहे. अशांची चौकशी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विरार, नालासोपऱ्यातून तक्रारी होऊ शकतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार