शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पालकमंत्र्यांचे लक्ष फक्त चार तालुक्यांवर

By admin | Updated: August 24, 2015 23:19 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील

- हितेन नाईक,  पालघरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ७० लाख २९ हजारांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पालघरसह अन्य तीन तालुक्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून या दुजाभावामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या तालुक्यामध्ये सर्वात जास्त रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. यातील सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. डहाणू, तलासरी, वसई तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा हे चार तालुके पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघात येतात. या चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरित पालघर, डहाणू तलासरी, वसई या तालुक्यांना निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विक्रमगड तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाडा तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४२ लाख २० हजार रुपयांचा निधी देण्यात आला असून जव्हार तालुक्यातील सात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४१ लाख १९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर, मोखाडा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३९ लाख रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर करून घेतला आहे. डहाणूची आमदारकी धनारेंच्या रुपाने भाजपाकडे असूनही या तालुक्याची उपेक्षा झाली आहे.हे आहे वास्तव...पालघर तालुक्यातील पारगावनाका ते सोनावे, दारशेत, सफाळा ते घाटीम, मासवण ते नागझरी, धुकटणफाटा ते बहडोली, दहिसर, एडवण, कोरे, रातिवरे, आगारवाडी ते निघरे, नवापूर ते मुरसे, बोईसर ते शिगाव, सेटेगाव ते माकडचोळा, नागझरी ते नानिवली, आदिवासी स्टॉप ते गिरनोली आदी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकही रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था असून त्या तालुक्यांच्या तोंडालाही पाने पुसण्यात आली आहे.