शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पालकमंत्र्यांचे लक्ष फक्त चार तालुक्यांवर

By admin | Updated: August 24, 2015 23:19 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील

- हितेन नाईक,  पालघरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ७० लाख २९ हजारांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पालघरसह अन्य तीन तालुक्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून या दुजाभावामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या तालुक्यामध्ये सर्वात जास्त रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. यातील सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. डहाणू, तलासरी, वसई तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा हे चार तालुके पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघात येतात. या चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरित पालघर, डहाणू तलासरी, वसई या तालुक्यांना निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विक्रमगड तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाडा तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४२ लाख २० हजार रुपयांचा निधी देण्यात आला असून जव्हार तालुक्यातील सात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४१ लाख १९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर, मोखाडा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३९ लाख रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर करून घेतला आहे. डहाणूची आमदारकी धनारेंच्या रुपाने भाजपाकडे असूनही या तालुक्याची उपेक्षा झाली आहे.हे आहे वास्तव...पालघर तालुक्यातील पारगावनाका ते सोनावे, दारशेत, सफाळा ते घाटीम, मासवण ते नागझरी, धुकटणफाटा ते बहडोली, दहिसर, एडवण, कोरे, रातिवरे, आगारवाडी ते निघरे, नवापूर ते मुरसे, बोईसर ते शिगाव, सेटेगाव ते माकडचोळा, नागझरी ते नानिवली, आदिवासी स्टॉप ते गिरनोली आदी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकही रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था असून त्या तालुक्यांच्या तोंडालाही पाने पुसण्यात आली आहे.